मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक वचन || Marathi Sad Poems ||

बरंच काही, बोलायचे होते तुला,  पण सारे मनातच राहून गेले !! तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तेव्हा, सगळे काही विरून गेले !! तु सोबत होतास माझ्या, एवढंच मन सांगून गेले !! तुझ्या सहवासात तेव्हा जणू, कित्येक दुःख हरवून गेले !! राहिले काही कळलेच नाही, सारे काही घडून गेले !! एका क्षणात तेव्हा जणू, सारे आयुष्य जगून गेले !! ती सांज आणि ती लाट, खुप काही सांगुन गेले !! तुझ्या आणि माझ्या सोबतीची, तेव्हा ती वेळ थांबून गेले !! नकळत का उगाच मग मी, एक वचन मागून गेले !! माझ्या आयुष्याची वाट एकटी, तुझा सहवास मागून गेले !! बरंच काही, बोलायचे होते तुला, पण सारे मनातच राहून गेले ..!! ✍️© योगेश खजानदार

स्वप्नातली परी || Abol Prem Kavita ||

न भेटली इथे, न भेटली तिथे !! स्वप्नातल्या परी, तुज पाहू तरी कुठे ?? कधी शोधले तिथे, कधी शोधले इथे !! सांग तुझा ठाव, आहे तरी कुठे !! भास होता जसे, कधी आभास दिसे !! तुझ्या नसण्याचे दुःख, बोलू तरी कुठे !! हे होता जरी असे, होते का पुन्हा तसे !! तुझ्या जवळ येण्या वाट, आहे तरी कुठे !! मला न कळे, कळले ना कसे ?? नकळत ही तू मज, बोलते तरी कुठे !! हो आहे आजही तिथे, एकटा मी जिथे !! पुढे जाण्या पुन्हा, सोबती ना तु कुठे !! राहिल्या पुन्हा इथे, आठवणी विरल्या जिथे !! अश्रू पुन्हा विचारता ,त्यांना लपवू तरी कुठे ?? वचन दिले जेव्हा जिथे, क्षण पुन्हा भेटले तिथे !! त्यास सांगण्या मनातले, शब्द लिहू तरी कुठे ?? न भेटली इथे, न भेटली तिथे !! स्वप्नातल्या परी, तुज पाहू तरी कुठे ?? ✍️©योगेश खजानदार

आई बाबा तुम्ही अडाणी आहात ?? || Prashn Uttar ||

  आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना ?? मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड  आहेत का ?? तर नाही !! तेही रमले त्याच्या पिढीत जसे पुढे जाऊन आपणही रमु!!   Fashion , lifestyle या गोष्...

कधी कधी || best Marathi poem ||

कधी हळूवार वाऱ्यासवे, तुझाच गंध दरवळून जातो !! देतो आठवण तुझी आणि,  तुलाच शोधत राहतो !! उगाच वेड्या मनास या, तुझ्या येण्याची हुरहूर देतो!! हळूवार तो वारा कधी, नकळत स्पर्श करून जातो!! कधी बोलतो तो एकांत, तुझ्याच गोष्टी सांगतो !! तुलाच रंगवतो चित्रात आणि, तुझ्यातच रंगून जातो !! अधुऱ्या त्या पानावरती, तुलाच शोधत राहतो !! बोलतो एकांत उगाच कधी,  नकळत मन ओले करून जातो !! कधी त्या उरल्या अश्रुसवे, तुझाच चेहरा दिसत राहतो !! हसतो कधी माझ्यासवे आणि, उगाच लाजून जातो !! बहरल्या फुलासारखे मग, मनात बहरून जातो !! पाहून त्या उरल्या अश्रुस कधी, नकळत तो अलगद टिपून जातो!! कधी हळूवार वाऱ्यासवे, तुझाच गंध दरवळून जातो..!! ✍️© योगेश खजानदार

घरटे मराठी कविता || घर एक इवलसं ||

वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ?? सांग तू माय एकदा !! वाट कोणती त्या पाखरांची ?? उजाड वाटे घरटे तुझे, मग सलगी कर तू स्वतः शी !! गडबड आणि गोंधळ कसला ?? विचार तुझ्या मनाशी. हरवलेल्या शोधता येई, पण शोधावे कसे त्या देशी !! आपुले न दिसती त्यात मग, कसली ओढ त्यांच्याशी !! भरल्या डोळ्यांनी पाहत बसते, मग बघ एकदा स्वतःशी !! फाटक्या या घरट्यात तुझ्या, बोलते तू कोणाशी ?? हातात तुझ्या बळ होते, तेव्हा गरज होती त्यास तुझी !! पंखास बळ येता त्यांच्या, आठवण तुझी राहील कशी ?? नकोस करू उगाच दुःख, पुन्हा जग त्या आठवांशी !! आठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची !! काडी काडी जमवून बांधले, घरटे हे आपुल्यासी !! आहे दुःख कळते मना, पण बोलू नको परक्यांशी !! चुकल्या वाटा येतील पुन्हा, ओढ राहते घरट्याची !! थरथरत्या हातांस तुझ्या, नको साथ देऊ आसवांची !! वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ?? सांग तू माय एकदा, वाट कोणती त्या पाखरांची ?? ✍️©योगेश खजानदार

अनोळखी नाते || अबोल प्रेम कविता ||

"नकोच आता भार आठवांचा, नकोच ती अधुरी नाती !! नकोच ती सावली आपुल्यांची, नकोच त्या अधुऱ्या भेटी !! बरेच उरले हातात त्या, रिक्त राहिली तरीही नाती !! डोळ्यातल्या आसवांना विचारे, वेदनेची गोष्ट ती कोणती !! ताणले तरी सुटे न आता, थांबले तरी का क्षणासाठी !! परतून येता इथे असे मग, भेटले सारेच का अनोळखी !! कसे नाते शोधावे इथे आज, साऱ्याच नव्या गोष्टी !! शोधले तरी भेटले न आपुले, जुन्या चेहऱ्यास व्यर्थ शोधती !! पुन्हा नव्याने भेटली का ती, दोन अनोळखी नाती !! न त्यास नीट समजली, न त्याने जाणून घेतली !! निर्थक सारे मनात असता, कशी जपणार मग ती नाती !! या शब्दास न कळेच काही, बोलण्यास उरलेच न इथे बाकी !! नात्यात हवी आपुलकी जरा, नात्यास हवी माणुसकी !! नात्यात असावा विश्वास तेव्हा, नात्यास भेट व्हावी आपुली !! कडव्या मनात न भेटते कोणी, जुन्या दुःखात न होते सोबती !! नव्याने भेटली ती जुनी नाती , मग तरी ही का होती अनोळखी !! म्हणून, मन बोलते, नकोच आता भार आठवांचा, नकोच ती अधुरी नाती !! नकोच ती सावली आपूल्यांची, नकोच त्या अधुऱ्या भेटी ..!!" ✍️©योगेश खजानदार

समांतर || भयकथा || Horror Stories ||

  "मी मरूनही माझ्या मागे का लागलास तू ?? काहीच का कळतं नाहीये !! सोड मला!! जा !! निघून जा इथून ..!! " त्या खोलीतून कसलातरी आवाज येत होता. "आयुष्यभर फसवलस मला तू !! असा कसा सोडेल तुला मी!! तुला याच्यासोबत जाऊ नाही देणार मी !!! " "पण मी जाणार !! बरोबर जाणार त्याच्या !! काय करायचं ते कर !! "त्या स्त्रीचा मोठ्याने आवाज आला. घराच्या बाहेर पोलिसांचा ताफा येऊन थांबलेला इन्स्पेक्टर शिंदे यांना त्या घरात काहीतरी घडलंय अशी बातमी कळलेली होती.पण ते काय !! हे पाहण्यासाठी ते तिथे आलेले, आणि त्या आवाजाने त्यांना काहीच कळलं नाही. "तावडे !! काय झालंय रे !! "  शिंदे घराच्या बाहेर उभे राहून त्यांच्या कॉन्स्टेबलला विचारत होते. "कांड झालाय साहेब !! " "बघुयात तरी !! चला !!"  शिंदे आतमध्ये जात म्हणाले. ""साहेब ! मी कंट्रोल रूमला कळवतो !!" अस म्हणून तावडे निघून गेला.    इन्स्पेक्टर शिंदे येणाऱ्या आवाजाकडे चालत राहिले. त्या समोरच्या खोलीत कोणीतरी आहे. "काय चाललं आहे रे!! " "कोण !! कोण आहे ?" आतून आवाज आला. "मी इ...