नादान सा ये दिल !!!

नादान सा जो दिल है
ये आज भी कुछ मांगता है
कहीं नीले आसमान के नीचे
खुद ही को क्यों धुंडता है

मिले सन्नाटे की ये पंक्तियां
जिसे कोन लिखता है
कहीं शोर मिले तो ये
क्यों अनसुना सा करता है
ना जाने ये दिल क्या पूछता है

बेवक्त की बारिश हो तो
भीग जाता है
दर्द मिले राह मै कहीं
तो दो पल ठहर जाता है
ना जाने क्या चाहता है

खुद को भूल जाता है
अपनोको ही याद करता है
जो देख कर भी अनदेखा करदे
उन्हिसे क्यों प्यार करता है
ये दिल बहुत सताता है

फिर भी ये संभल जाता है
अपनोके दर्द को भूल कर
अपनोसे प्यार करता है
रूठकर भी हसता है
ये दिल ये क्यों करता है

बाते ये बहुत करता है
फिर भी अपनी बात ये
अपनोसे क्यों न कहता है
ये दिल तू बहुत रुलाता है
आंखो से बहुत कुछ कहता है

हवा का झोका है ये  दिल
जो इस नीले आसमा के नीचे
चंचल होके घूमता है
कहीं हल्का सा झोका होके गुजरता है
तोह कहीं यादों का तूफ़ान उठा देता है

क्यों नादान सा ये दिल है
जो आज भी कुछ मांगता है

-योगेश खजानदार

राहुन गेलं काही!!

राहून जातंय काहीतरी म्हणून
मागे वळून पहायचं नसतं
शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा
आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं

मन ऐकणार नाही हे माहित असतं
पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत
पण त्या वेड्या मनाला सांगूनही
कळूनही काही कळत नसतं

कारण काहीतरी पहायचं असतं
सावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतं
हरवून गेलेल्या क्षणांना शोधताना
उगाच स्वतःही हरावयच  नसतं

तिथे अबोल कोणी सापडत ही असतं
त्याला उगाच बोलायच असत
विसरून गेलेल्या नात्याला तेव्हा
उगाच आसावत पहायचं नसतं

कुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतं
कधी हसू तर कधी रडु ही असतं
काही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हा
हिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतं

शेवटी उरले काय पाहत असतं
मन वेड फिरत असतं
फिरून फिरून थकलेल्या मनाला
आठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं
-योगेश खजानदार


कधी कधी ...!!

कधी कधी मनाच्या या खेळात
तुझ्यासवे मी का हरवतो
तुला शोधण्याचा हट्ट इतका का?
की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो

तुला यायचं नाही माहितेय मला
तरी मी तुझी वाट का पाहतो
जणु कित्येक गोष्टींचं ओझ हे
कवितेत मी का हलके करतो

बघ ना एकदा येऊन पुन्हा माझ्याकडे
तुझ्याच आठवणीत मी कसा जगतो
तुझ्याच जगात राहून, तुझ्याच विना
तुलाच या वहीत कसा आठवतो

खरं खरं सांगू तुला सखे एक
तुला बोलण्याचे बहाणे मी कित्येक करतो
पण गालावरच्या तुझ्या रुसव्याचे
उगाच नखरे मी पाहत बसतो

तेव्हा सांग सखे येऊन एकदा त्या क्षणास
पुन्हा अश्रूंचे तो उगाच रिन करतो
पण तिथेच तु माझी आहेस हे
तोच मला पुन्हा पुन्हा सांगत असतो

भेटेशील मला कधी तू जणु
वाटेवरती उगाच मी वाट पाहत असतो
विचारून बघ त्या वळणानाही एकदा
तुझ्याचसाठी मी रात्रं दिवस जागत असतो

हे प्रेम कळेन कधीतरी तुला म्हणून
मी उगाच या वहीत लिहीत असतो
तुझ्या मनाच्या तळाशी तेव्हा मी
स्वतःलाच का शोधत असतो

-योगेश खजानदार

दिवाळी आणि बार्शी .. 😊

  दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी. दिवाळी जवळ आली की बार्शीला जायची ओढ व्हायची. मग काय दिवाळीच्या 4 ,8 दिवस आधी तिकडे जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन असा अनुभव ही सुट्टी द्यायची. थंडीची सुरुवात अलगद या दिवाळीचा सुखद आनंद द्यायची.
  या सुट्ट्या मधे कित्येक जुन्या मित्रांना भेटन व्हायचं. कोण पुणे , कोण कोल्हापूर,कोण मुंबई कुठे कुठे असायचे. त्यांचे तिथले अनुभव गोष्टी ऐकायला मिळायचे. आमचे भेटायचे अड्डे सुधा ठरलेले , भगवंत मैदानवर सगळ्यांनी यायचं आणि तेही न चुकता. मग काय कित्येक गप्पा गोष्टी व्हायच्या , सगळ्यांचे कुठे काय चालू तेही कळायचे. गप्पा आणि चेष्टा मस्करी यात हे दिवाळीचे 8दिवस कसे जायचे ते कळतही नसायचे.
  आईला मात्र हे दिवस म्हणजे मुलाला किती खायला देऊ असे. फराळाचं खायचं , आणि तिकडे मेस मधे नीट खायला मिळत नाही म्हणून रोज नवीन पदार्थ. असे हे दिवाळीचे दिवस म्हणजे नुसते मस्ती आणि धमाल. आधी लहानपणी सुट्ट्या मिळाल्या की मामाच्या गावाला जायचो आता स्वतच्या गावाला जाण होत. पण हे दिवस तितकेच आठवणीत राहणारे असतात. परत जाताना कित्येक गोष्टी सोबत घेऊन जातात. मनात एक ओल या सुट्ट्याची  नेहमीच राहते.
  आजही ह्या दिवाळीचे दिवस म्हणजे मनात पुन्हा आठवणीचा दिवा लावण्या सारखं असत.  आता कित्येक मित्र आपल्या कामात व्यस्त झालेत. काही मित्र तर बार्शीकडे येतही नाहीत असं कळलं.  दिवस बदलत गेले पण आठवणी मात्र तशाच आहेत. आज आता पहिल्या सारखे फटाके वाजवावे वाटत नाहीत. पण दिवयांची आरास आजही मनात त्या मित्रास आठवते हे मात्र नक्की. कोण कुठे आहे हे आता शोधावं लागत. काळा नुसार सर्व बदलत जाते. तसेच झाले आज दिवाळीच्या सुट्टीत मित्र ते जुने भेटले पण काही कुठेतरी हरवले हे मात्र नक्की.
    पुन्हा परत जाताना यांच्या आठवणी सोबत असतीलच. तिकडे पुण्याला गेल्यावर पुन्हा पुढचे महिनाभर ही सुट्टी डोळ्या समोर राहते. मित्रांची उणीव भासत राहते. आईने दिलेला फराळ या पुण्यातल्या मित्रांसोबत खाताना पुन्हा त्या सगळ्या आठवणी आठवल्या जातात आणि मित्रही पुण्यातले त्यांच्या आठवणी सांगत कधी महिना उलटून जातो कळतच नाही. प्रत्येकाच्या आठवणी त्याला अनमोल असतात. मला माझ्या बार्शी आणि दिवाळीच्या आठवणी मनात सतत बोलत राहतात. तर मित्रांना त्यांच्या गावाकडच्या ,मग काय इकडेही या दिवाळीच्या सुट्टीचे  चर्चे होत होत दिवस असेच जायचे. आईने दिलेले फराळ कधी संपून जायचे कळतं ही नाही. मित्र भेटतात पण whatsapp नाहीतर facebook वर .. पण जोपर्यंत ही सुट्टी चालू आहे तोपर्यंत ती मनसोक्त आनंदात घालायची... हो ना !!!
-योगेश खजानदार

आली दिवाळी ...!!!

चकली गोलच का करायची
म्हणून पोट्टे विचारत होते
दिवाळी जवळ आली आता म्हणून
घरात फराळ बनत होते

शंकरपाळी मध्ये शंकर कुठे आहे
पोट्टे उगाच शोधत होते
आणि ताटभर चिवडा खाऊन
किल्ला बनवत होते

चिंगी, मंगी सगळेच आता
घरात दंग झाले होते
दिवाळी जवळ आली म्हणून
आकाशकंदील बनवू लागले होते

कुठे आजीची लगबग सुरू नी
खमंग वास दरवळू लागले होते
दिवाळीची सुट्टी लागली म्हणून
अंगणात पोट्टे नाचत होते

राजे तयार झाले किल्ल्यावर यायला
मावळे पाहणी करु लागले होते
किल्ले पुरंदर नी रायगड ही आता
दिव्याने उजळून निघाले होते

कोणती रांगोळी काढायची म्हणून
चिंगी नी मंगी भांडत होते
दिवाळीच्या सुरवातीस घर नुसते
भरून गेले होते

आईने तुळशीवृंदावन रंगवून
त्याला नवीन केले होते
बाबांनी पोट्ट्यासाठी तेव्हा
फटाके आणून दिले होते

दिवाळीचा सण हा आला
घर साऱ्या आनंदाने उजळत होते
दिवांच्या प्रकाशात ही न्हावून जाण्यास
हे आकाशही तयार होत होते!!!
-योगेश खजानदार

एकदा तु सांग ना!!!

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना
मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना
ती पावलं माझी घरभर फिरतील
मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना

बाबा म्हणणारी ती त्याच्यावर मनसोक्त जीव लावणारी ती
तुझ्यातील एक मी तु हरवतेस का सांग ना
तूही एक स्त्रीच आहेसं मग एका स्त्रित्वाला
प्रत्येक वेळी हरताना पहायचंय का सांग ना

हीच खुडणारी हाते लक्ष्मी देखील म्हणतात मला
दुर्गा म्हणून उगाच पूजतात का सांग ना
त्याचं देवीचा गळा घोटून त्याचं हाताने मग
कोणती लक्ष्मी पूजनार आहेस सांग ना

बरं पण गुन्हा काय माझा तो तरी सांग ना
मुलगी झाले हाच गुन्हा का माझा
जन्मास येताना दोन घराचं नात जोडताना
अधिकारच काय यांचा माझ्या पावलांना खुडायचा, तो तरी सांग ना

नात्यांमध्ये येताना कित्येक रूप आहेत माझी सांग ना
मी आई आहे,मी बहीण आहे , मी बायको ही आहे
मी प्रेम आहे , मी माया आहे , मी आठवण ही आहे
मग माझा सगळे तिरस्कारच का करतात सांग ना

माझ्या सोबत राहून तु माझी साथ देशील का सांग ना
माझ्या स्वप्नांना आता पंख देशील का सांग ना
तुझ्यातील मी एक स्त्री जणु हाक देत आहे तुला
मला आता मनसोक्तपणे बहरू देणार आहेस का सांग ना
-योगेश खजानदार

तुला लिहिताना !!

मनातल्या तुला लिहिताना
जणु शब्द हे मझ बोलतात
कधी स्वतः कागदावर येतात
तर कधी तुला पाहुन सुचतात

न राहुन स्वतःस शोधताना
तुझ्या मध्येच सामावतात
कधी तुझे नाव लिहितात
तर कधी कवितेत मांडतात

का असे वेडे नयन हे
शब्दा सवे हरवतात
कधी मलाच न भेटतात
तर कधी तुलाच न शोधतात

सांग सखे काय करु
तुलाच न सांगतात
कधी वही मध्ये लिहितात
तर कधी ह्रदयात कोरतात

मनातल्या तुला लिहिताना
जणु भाव हे मझ बोलतात
कधी क्षणात तुला पाहतात
तर कधी तुझी साथ मागतात
-योगेश खजानदार



आई -बाबा

आई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळीतला रंग असतात

आई देवासमोर लावलेली निरांजन असते
बाबा त्याची ज्योत असतात
आई घरभर पसरलेली धूप असते
बाबा त्यातील सुगंध असतात

आई मनावरचा संस्कार असते
बाबा ते घडवणारे असतात
आई आयुष्याची वाट असते
बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात

आई एक वाक्य असते
बाबा वाक्यातील शब्द असतात
आई एक कविता असते
बाबा त्याचा भाव असतात

सूर्याचे तेज म्हणजे आई असते
बाबा त्यांची किरणे असतात
आई असते आपली माऊली
त्या माऊलीची साथ बाबा असतात

जिद्द म्हणजे काय हे आई असते
मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात
आई हे जग असते
बाबा हे जणू सारे विश्व असतात
-योगेश खजानदार

अंतर...!!(कथा भाग -५) (अंतिम भाग)

मनातल सगळ सांगायचं म्हणून योगेश प्रियाला दुसऱ्या दिवशी भेटायला निघाला. आज योगेश येईन तिला घेऊन जायला म्हणून प्रिया ही सकाळपासून आवरत होती.  क्षणाची गती थोडी कमी झाली होती अस तिला वाटत होत. दुपारच्या वेळी अचानक योगेश प्रियाच्या घरी आला.
"सकाळ पासुन वाट पाहतेय तुझी मी!!" प्रियाला मनातली ओढ लपवताच आली नाही.
"सॉरी यायला थोडा उशीरच झाला!"योगेश ही गमतीने म्हणाला.
"आई मी येते!!"
"योगेशला घरात तरी येऊ दे!!"प्रियाशी आई एकदम म्हणाली.
"नको काकू!! असही बाहेरच जायचं होत आम्हाला!!"
दोघे आज कित्येक वर्षांनी एकत्र होते. प्रियाचा तो योगेश पासुन झालेला दुरावा आज स्पष्ट दिसत होता. कित्येक वर्षांच अंतर हळूहळू कमी होत होते. योगेश प्रियाला एका सुंदर समुद्र किनारी घेऊन गेला. त्या लाटांचा आवाज दोघान मधील शांतता भंग करत होती.
"तुझ्या मनातली ओढ, मला भेटण्याची का बरं जाणवते!! योगेशने प्रियाला विचारलं.
तो आता बोलायला होता मनातल सगळ सांगायला होता.
"तुषारने एवढ मनापासुन प्रेम करूनही माझ्यासाठी तुझ्या मनात जागा का आहे ?" योगेश भावनेच्या भरात बोलत होता.
"कारण तुझ्या अबोल मनानेही तेवढच प्रेम केलं आहे माझ्यावर!! तुला आठवत तु मला एकदा तुझी काविता ऐकवली होतीस!!
अबोल मनातले माझ्या
शब्द किती बोलके
सांगू कसे तुला मी
ओठांवर का विरते !!!
तेव्हाच तुझ माझ्यावरचं प्रेम मला कळलं होत!!
"पण तूही कधी मला तुझ प्रेम नाही सांगितलस !!" योगेश प्रियाला म्हणाला.
"कारण माझेही शब्द ओठांवरच विरून जायचे!!" प्रिया योगेशच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
"तूषारला कधी विसरून जाशील??"
"कधीच नाही!! त्यानेच तर प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितले मला!!"एखाद्यावर जीवापाड प्रेम करायचं, इतकं की आपला शेवटचा श्वास त्याला द्यायचा!!" प्रिया अश्रू पुसत बोलत होती.
"खरंच मी तुषारला ओळखूच शकलो नाही!! माझ्या मनाची ती अवस्था मला सांगता ही येत नाही! तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत असतानाही तु तुषार सोबत का गेलीस याने मी पुरता हरवून गेलो!! तुझा तिरस्कार करावा म्हटल तर तेही जमल नाही! त्या दिवशी तु अचानक coffee shop मध्ये मला विचारलस आणि मी गोंधळून गेलो!! त्या लाटांचा आवाज आता विरून गेला होता योगेश प्रियाला बोलत होता. तिही आता सगळं मनापासुन ऐक होती.
"पण आता नाही!! प्रिया मला तुझी साथ हवी आहे!! अगदी कायमची!!  हे अंतर आपल्यातलं मला संपवून टाकायचं !!! तु ही अबोल नसाविस आणि मीही अबोल न रहावा !! तुझ्या प्रत्येक क्षणावर मला प्रेम करायचं आहे !! तुषारने तुला प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितलं आणि मला तू !! योगेश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणत होता. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते.
"माझ्या डोळ्यातली ओढ तुला कधीच कळली नाही! तरीही मी तुझी वाट पहायचे!! ती या क्षणासाठीच !!की कधीतरी तू येशील आणि मला माझी साथ मागशील!! पण आज तूषारच्या आठवणीच घरचं आता मला छान वाटतेय ! " प्रिया योगेशकडे पाहतच न्हवती.
"तुषारला विसरून जा अस मी कधीचं म्हणार नाही तुला  !! "
"पण पुन्हा अबोल होऊन निघून गेलास तर मी क्षणभर ही जगू नाही शकणार!!"
"आता अबोल रहावस वाटत नाही प्रिया !! एक एक क्षण तुझ्याचसाठी द्यावा अस मन बोलतेय !! देशील माझी साथ कायमची ??? योगेश अगदी शांत विचारत होता.
कित्येक वेळ प्रिया काहीच बोली नाही. तो समुद्र किनारा आता सांजवेळी गुलाबी किरणांनी नाहून निघाला होता!! मंद वारा जणु पुन्हा पुन्हा घिरट्या घालत होता जणु दोघांचं बोलणं चोरून ऐकत होता.
"मला कधीच सोडून नाहीस ना जाणार योगेश?? मी अबोल झाले तर माझी समजूत काढशील ना?? तुझ्या आणि माझ्या मधील या अंतराचा शेवट त्या सूर्यास्तात जणु होतोय अस मला वाटतं आहे!!  प्रिया मंद हसत योगेशकडे पाहत होती आयुष्यभराची साथ द्यायचं वचन जणु देत होती.
"या प्रत्येक क्षणावर तुझाच नाव असेन आता प्रिया!!  तुझा हात कधीच मी सोडणार नाही !! योगेश तिच्याकडे पाहत म्हणाला.
कित्येक वेळ प्रिया योगेशच्या मिठीत तशीच बसून राहिली. तिकडे तो सूर्यास्त झाला , जणु दोन जीवांच मनाच अंतर अस्तास गेलं. अगदी कायमचं. जणु तो समुद्र किनारा त्याच्याकडे पाहून म्हणत होता..

"ओढ मनाची या
खूप काही बोलते
कधी डोळ्यातून दिसते
तर कधी शब्दातून बोलते

वाट पाहून त्या क्षणाची
खूप काही सांगते
कधी अश्रून मधुन वाहते
तर कधी ओठांवर विरून जाते

न राहवून कधी
बेभान जेव्हा होते
मनातले जणु तेव्हाच
अंतर ही ते मिटते!!

ओढ मनाची या
दोन जीवास बोलते !!! "

ती सांजवेळ ही जणु दोघांसाठी क्षणभर थांबली होती.....

*समाप्त*

-योगेश खजानदार







अंतर...!!(कथा भाग-४)

"कवितेत लिहिल कित्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं.  या चार ओळी गुणगुणत नाही मी तर माझ मन तस बोलतेय. तुझ्या प्रेमाची सावलीही मी का ओळखु शकलो नाही हेच मला सांगता येत नाही. प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणे नाही तर प्रेम म्हणजे साथ असते, प्रेम म्हणजे आपल्या माणसाच्या हाकेला दिलेली साद असते!!" योगेश त्या रविवारच्या सकाळी फक्त प्रियाचा विचार करत होता. मनातल्या विचारांशी नुसता भांडत होता. प्रियाच्या घरी जाण्यासाठी तोही तितकाच आतुर होता.
प्रिया कित्येक दिवसांनी स्वताला सावरत होती. योगेश कधीही येईल म्हणून सगळं काही व्यवस्थित करत होती. प्रियाची आई तिला मदत करत होती. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आतुरतेने दरवाजा उघडला आणि समोर योगेशला पाहून तिला खूप आनंद झाला. कित्येक वेळ दोघे दरवाज्यात घुटमळत होते.
"येणा!! "प्रियाने योगेशला घरात येत म्हटले.
"किती दिवसांनी भेटतोय योगेश!! मला वाटलं विसरूनच गेलास आम्हाला!! प्रियची आई योगेशकडे पाहत म्हणाली.
"कसा विसरेन काकू !! आयुष्यात काही नाती विसरावे म्हटलं तरी नाही विसरता येतं!!" योगेश प्रियाकडे बघत म्हणाला.
तेवढ्यात प्रिया किचन मधेन निघून गेली. योगेश कित्येक दिवसाने घरी आला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला आवडते ती कॉफी करायला.
"तुझ्या अस रागावू जाण्याने खूप मनातून कोसळली होती प्रिया!!" आई टेबलावर ठेवलेल्या तुषरच्या फोटो कडे पाहत म्हणाली.
"रागाला घर नसतं ते कुठेही सैरावैरा धावत जात!!" आणि मध्ये येणाऱ्या आपल्या लोकांनाही उध्वस्त करून जात!! मला हे सगळं कळलं पण वेळ तेव्हा निघून गेली होती!!" योगेश प्रियाच्या आईला मनापासुन बोलत होता.
"तूषारच्या आठवणींत प्रिया पुरती कोलमडून गेली होती. एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड किती प्रेम करू शकते याची सतत आठवण करून देत होती. पण तुला पुन्हा भेटण्यासाठीची ओढ काही वेगळीच होती. प्रियाची ती आजची ओढ तिला त्या आठवणीतून दूर घेऊन जात होती!! प्रियाची आई योगेशला पुन्हा प्रियाला सावरायला सांगत होती.
"पण एखादी व्यक्ती आपल्यावर इतकं प्रेम कसकाय करू शकते हेच मला कळेना. एखादया व्यक्तीला कवितेत किवा वहीत लिहन सोप असत पण त्याच्या आयुष्यात येऊन गोड आठवणी देणं खरंच खूप सुंदर असत!!" योगेश कित्येक शब्दाच्या गुंत्याना सोडवायचा प्रयत्न करत होता पण नात्यात ते पुन्हा गुंतत होते.
"श्र्वासांच्या अखेरच्या क्षणात सुधा तुषार फक्त प्रियावर प्रेमच करत होता!!मी गेलो तरी माझ्या आठवणीत रडायचं नाही म्हणून वचन मागत होता!!" प्रियाची आई अश्रू आवरत म्हणाली.
योगेश कित्येक वेळ फक्त निशब्द होता. एखाद्यावर रागावून रुसून जाणं किती सोप असत अस त्याला वाटू लागलं पण एखाद्यावर कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करण किती अवघड असत हे कळू लागलं. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती किती अवघड असते मिळणे अस मन सतत बोलू लागल.
"तुझ्या आवडती coffee!!!" प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली.
"थॅन्क्स!!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला हवी होती. तिचा निर्णय चुकला नाही तर बरोबरच होता.  आपण कोणावर प्रेम करतो याहीपेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा आपल्यावर पहिला हक्क असतो अस मनात योगेशला वाटू लागलं.
"कित्येक दिवसाने तुझ्या हातची कॉफी पितोय!!"
"आजही याची चव तशीच आहेना ??" प्रिया योगेशला म्हणाली.
"हो !! चव आहे तशीच आहे !! काही फरक नाही!
  कदाचित प्रियाला आपल्या नात्यातली चव तशीच आहे का विचारायचं असेन.अंतर पडतात नात्यात पण त्याची चव बेचव झाली की नाती चागली वाटत नाहीत.उरतात ती फक्त आठवणीची घर. तीपण रिकामी.
कित्येक वेळ योगेश प्रियाच्या घरी थांबला. प्रियाशी तिच्या आईशी मनमोकळेपणाने गप्पा मारत होता. जुन्या कित्येक आठवणी आठवत होता.
"बरं मी निघू आता!!" योगेश प्रियाला विचारत होता.
"वेळ किती आणि कसा गेला कळलच नाही!" प्रिया घड्याळाकडे पाहून म्हणाली.
"होना आपली माणसं जवळ आसले की वेळ कशी जाते कळतच नाहीना !!"
"होना!! उद्या तुला न्हायला येईन मी ..!! मला तुला काही बोलायच आहे प्रिया !!! भेटशील ना??
"नक्की भेटेन !!" प्रिया मनापासुन हो म्हणत होती.
योगेश आता प्रियाच्या घरातून बाहेर पडला होता. प्रिया योगेश नजरेआड होईपर्यंत दरवाज्यात उभीच होती .

क्रमशः

-योगेश खजानदार

अंतर...!!(कथा भाग -३)

"नाती अबोल राहिली की अंतर वाढत जात, योगेश तु नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपल नात नेहमीच अपूर्ण राहिल. माझ्या निर्णया नंतरही तु खूप उदास झालास. माझ्याशी बोलाच नाहीस." प्रिया मनापासून योगेशला बोलत होती.
"त्यावेळी काय बोलावं तेच कळेना. तुझ्या माझ्या मध्ये तुषार कधी आला तेच मला कळले नाही." योगेश मनातल सांगत होता.
"एकदा बोलायचं होतेस माझ्याशी!!"
"त्यावेळी मला राग आला होता,काय बोलावं तेच कळेना!! बरं ,  तुषार कसा आहे आता?" योगेश एकदम बोलला.
"तुषार आता नाहीये!! पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तो निघून गेला!! प्रियाला पुढचे बोलवेना.
  योगेशला काय बोलावे तेच कळेना. तो थोडा अडखळला कित्येक शब्द ओठांवरच विरले.
"आयुष्याच्या संध्याकाळी फक्त साथ मागितली त्याने मला!! आणि मला नाही म्हणता नाही आले रे योगेश!!
प्रिया स्वतःला सावरत म्हणाली.
"पण, पण हे कधी आणि कसे झाले?"
"तुषारच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होते हे मला माहीत होते!! तो मित्र होताच पण आपल्या दोघांच्या नात्यात तिरहाईत म्हणूनच होता. हे मीही मान्य करते !! जेव्हा त्याला कळले की आपल्या आयुष्याची काहीच दिवस राहिले आहेत तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे साथ मागितली!! पण या काळात त्याने फक्त माझ्यावर प्रेमच केलं!" प्रिया आता सगळं काही बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रू मध्ये तुषार.
"पण मी स्वताला हरवून गेलो प्रिया!! तुझ्या आणि तुषारच्या मध्ये मी येऊ नये म्हणून मी निघून गेलो!! पण तुषारच्या बद्दल जे झाले ते खरंच मला माहित न्हवते."
"म्हणूनच म्हटलं होत योगेश तुला मी!! की नात नीट नाहीना चाललं की refill बदलायची नात नाही बदलायच!!"
"पण नात राहिलाच नाहीतर काय करायच?"
"त्या नात्याला आयुष्यभर आपल्या मनात जपत राहायचं!! "
"आणि म्हणूनच तूषारच आणि तुझ नात आजही तु जपते आहेस तर!!"
"हो!!कारण ते नात खूप सुंदर होत. तुषार माझ्या आयुष्यात आला पण जितक्या दिवस होता ते माझे सगळ्यात सुंदर दिवस होते.!!"
"पण यामध्ये मला मी कुठेच दिसत नाही आता प्रिया!!!" योगेश अगदिक होऊन म्हणाला.
"नात्यात अंतर वाढलं की माणूस फक्त स्वत:लाचं शोधतो योगेश तेही स्वतःहच्या मनात नाही. समोरच्या वक्तीच्या मनात!"
कित्येक वेळ योगेश आणि प्रिया मनातल सगळं सांगत होते. आपण अबोल राहिलो म्हणून योगेशला वाईट वाटत होत. आणि आपल्या नात्यात पडलेलं हे अंतर मिटवण्याचे प्रियाचे प्रयत्न. यात coffee नक्कीच गोड झाली होती.
"आईने तुला भेटायला पण बोलावलं आहे!! प्रिया अगदी सहज म्हणाली.
"नक्की येईन!! कित्येक वर्ष झाली काकूंना भेटलोच नाही!!
"मग या रविवारी येशील??"
"प्रयत्न करेन!!"
"प्रयत्न नाही,यायलाच पाहिजेस!! मी वाट पाहीन तुझी.
"ठीक आहे !! नक्की येतो.
त्या भेटीत खूप काही मनाचा भार कमी झाला होता. प्रिया कित्येक दिवसनंतर मनमोकळेपणाने बोलली होती. काही नाती सहज तुटत नसतात. तर काही नाती अगदी सहज जोडली जात असतात. प्रिया आणि योगेशच हे अधुर नात पुन्हा एकदा बोलत होत. त्या रविवारची वाट पाहत होत.
ती ओढ मनात प्रियाच्या आता वेड लावत होती. त्या दिवसापासून ती फक्त रविवारची वाट पाहत होती. योगेशला ही आता प्रियाला भेटायचं होत. आपण नक्कीच चुकलो अस त्याच मन बोलत होत. कुठेतरी त्याच्या मनातही एक तिच्यासाठी लिहिलेल्या ओळी आठवत होत्या, त्या जुन्या वहीच्या पानातून जणु तो सतत त्या गुणगुणत होता..
"सखे असे हे वेड मन का
सैरावैरा फिरते
तुझ्याचसाठी  तुलाच पाहण्या
अधीर होऊन बसते
कधी मनाच्या फांदिवराती
उगाच जाऊन बसते
कधी आठवणीच्या गावाला त्या
उगाच फिरून येते

सखे असे हे वेडे मन का
सैरावैरा फिरते !!!

क्रमशः ...

-योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...