मुख्य सामग्रीवर वगळा

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करतात असच वाटत. आजोबापण खूप छान असतं हे तेच सांगतात आणि मनात असंख्य भावनांचा कल्लोळ होतो. 'आजोबा' अश्या कित्येक हाक कानावर पडतात आणि धावत येणार ते निरागस रोपट या वठलेल्या झाडास येऊन बिलगतं. घरात छोट्या पावलांनी फिरणार ते बाळ मला स्वतः सोबत घेऊन जात. अगदी राजा राणीच्या कथेथही, आणि मन अगदी पुन्हा माझ्याही बालपणात जातं.
  या आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोप येई पर्यंत आजोबा आणि आजी याच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेलं आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आल. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार  या चिमुकल्या मनावर करताना मी आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. ही जाणीव कदाचित मला माझ्यातील आजोबाला पुन्हा पुन्हा बोलायला भाग पाडते. इकडून तिकडे धावणारी ती छोटी पावले कदाचित माझ्यासारख्या थकलेल्या पावलास स्वतः सोबत धावायला लावतात पण शेवटी वय बोलत आणि थकलेल्या या हाताला त्याचा आधार मागतात. आधार कदाचित कधी थकलेल्या शरीराला नाही तर मनालाही मागतात. त्या छोट्या पावलांनी घरभर फिरताना या आजोबा आणि आजी भोवती फिरावं अस सतत वाटत राहतं.
  हे म्हातारपण एकटं असल तर किती भयाण वाटत हे कधी कधी कळून जातं. एकांतात बसल्यावर कित्येक विचार येतात आणि या नातवाच्या कित्येक खोडकर गोष्टी आठवल्या की सारं काही विसरून जात. आजच्या काळाशी जुळवून घेताना कदाचित आमच्या सारख्या म्हाताऱ्यांची दमछाक होत असेलही पण या नव्या फुलांना कित्येक संस्कारांचा ठेवा द्यायचा आहे ही जाणीव मनात कुठे तरी असते. एक आजोबा किंवा एक आजी ही घरातली वयस्कर व्यक्तीचं नाही तर एक अनुभवी व्यक्तीही असते. आयुष्याच्या शर्यती मध्ये कुठेतरी गुंतल्यावर आपल्या मुलांस योग्य संस्कार झालेच पाहिजेत असे सगळ्याचं आई वडिलांना वाटत पण कदाचित घरातल्या गरजाच इतक्या असतात की वेळ कुठल्या कुठे निघून जाते कळतही नाही. अगदीच दूर जाऊन पहायची गरजही नाही. आज आजोबापण कधी आणि कसे आले कळलेही नाही. कालपर्यंत एक वडील म्हणून भूमिका करताना कित्येक कठोर निर्णय मी घेतले पण आज एक आजोबा झाल्यावर कदाचित तो कठोरपण कुठेतरी राहून गेला आणि त्या नातवां सोबत आपणही पुन्हा लहान व्हावं अस वाटू लागलं आणि ते निरागस चेहरे या आजोबाला अगदी हसत हसत आपलस करून घेऊ लागले. कधी आम्ही कित्येक जुन्या दंतकथा मध्ये हरवून जावू लागलो, कधी नकळत कित्येक उत्तम संस्कार मी त्याच्यावर घडवू लागलो. मग कधी कधी वाटतं की इतकं सुंदर हे आजोबाच  आणि नातवाच नात असताना कुठेतरी ते का विरून जात. वृद्धाश्रमात आपल्या म्हातारपणावर कुढत का बसावं लागत, तर कदाचित तिथे या नात्याला कधी मुक्त अस फुलूचं दिलं नाही अस वाटत.
प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात हे नक्कीच नात फुलू दिलं तर ते सुंदर फुलतं पण फुलयाच्या आधीच जर ते खुडून टाकलं तर कदाचित त्याचं सौंदर्य आपल्याला कळलंच नाही अस म्हणाव लागेल. आजच्या काळात सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसणारी लहान मुले कदाचित आजी आणि आजोबा या सुंदर नात्याला मुकतात हे तितकंच खर आहे.  खरतरं त्यांना सांगावसं वाटत की बाळा त्यापेक्षा आपण सुंदर कथेतल्या एखाद्या राजकुमाराला भेटून येऊयात. पण सारच राहतं आणि आजी आणि आजोबा म्हणजे एक म्हातार माणूस एवढीच संकल्पना उरते.
  आजी आणि आजोबा घरात असणारी घरं ही तितकीच सुंदर भासतात हे मात्र नक्की. आपल्याला या वयातही एकही आजार नाही यापेक्षा नातवाने आपल्याला आजोबा म्हणून मारलेली हाक सर्वात जास्त आनंद देऊन जाते यात तिळमात्र ही शंका नाही.त्याच्या दुडक्या पावलांनी घरभर केलेला दंगा कदाचित रेडिओ वर जुनी गाणी लागल्यावर होणाऱ्या आवजापेक्षा ही सुंदर वाटतात हे मात्र खरं. अगदीच अखेर सांगायचं तर आजी आणि आजोबा नावाचं सुंदर पान सर्वांच्याच आयुष्यात असावं हेही तितकंच खरं,

घरभर छोट्या पावलांनी
अगदी मनसोक्त फिरावं
माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच
दुसरं टोक त्यांनी धरावं

कधी द्यावा आधार म्हातारपणात
तर कधी कुशीत यावं
या म्हाताऱ्याला फक्त आता
आपलसं करून घ्यावं

होतील कित्येक संस्कार मनावर
आजोबांचं बोलणं त्यांनी ऐकावं
कधी राजकुमाराच्या कथेत
अगदीच हरवून जावं

चार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा ...!!! एका आजी आणि आजोबाची !!!

✍योगेश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...