मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Featured Post

अडगळीतली वही !

​ "अडगळीतली वही !" आज जुन्या पुस्तकात मला माझी जुनी वही सापडली. धुळीत पडलेली ती वही नकळत हातात आली आणि त्यातील एक एक ओळ वाचताना माझ्यातच मी हरवून गेलो. मनापासून लिहिलेल्या त्या ओळी, अडगळीत त्या वहीत कुठेतरी पुसट होत चालल्या होत्या. क्षणभर मीही पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून गेलो आणि नकळत जुन्या क्षणाना पुन्हा आपलस म्हणू लागलो पण तिथेच मन क्षणभर सावध झालं आणि पुन्हा मला वर्तमानात घेऊन आल. अस म्हणतात जूनं जितक दिसायला सुंदर असत तितकच ते वेदना सुद्धा देत आणि म्हणूनच की काय कित्येक वेळा जून आठवलं की आपसुक डोळ्यातून पाणी येतं. कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे सुद्धा. म्हणूनच जुन्या वहीच पान उघडताना तेवढचं सावधही असाव लागत. कारण त्यात किती वाहत जायचं हे आपणच आधी ठरवावं लागत, नाहीतर आठवाचा पाऊस पडायला लागल्यावर भिजण्या शिवाय पर्याय नसतो. म्हणूनच मी हल्ली जुन्या आठवणींन पासून जरा दूरच असतो पण ती आठवण जर अचानक समोर आली तर मात्र त्याला काही पर्याय नसतो. माणूस नजरेला बंधन घालू शकतो, पण मग मनाच काय? असाही प्रश्न कधीकधी पडतो आणि सगळच चित्र बदलायला लागत. कारण नकळत मग नजरे समोर एखादी आठवण आलीच त...
अलीकडील पोस्ट

​शून्यातल विश्व !

खूप दिवस झाले लेखणी बंद झाली आणि आतल्या आत कुठेतरी विचार कोंडल्या सारखे झाले. रोजच्या आयुष्यात जगताना आपण पूर्वीचे कुठेतरी हरवून गेल्याची जाणीव मनाला झाली. या विचाराना कुठेतरी वाट द्यावी वाटू लागल आणि सहजच विचारांचा वेग वाढत गेला. पूर्वी कॉलेज लाइफ मध्ये कविता लिहाव्या वाटायच्या एखाद ओळ सुचली तरी पूर्ण कविता व्हायची पण आता रोजच जगताना ते शब्द कुठेतरी हरवून गेलेत अस वाटू लागल आणि पुन्हा जमेल तस जमेल तेव्हा लिहाव हा निर्धार आज केला.  खरतर खुप दिवस बंद असलेली गाडी चालू करताना जशी मेहनत घ्यावी लागते तशी लिखाण करतानाही माझी अवस्था झाली. विषयच सापडत नव्हता. आता पूर्वी सारखं प्रेमावर कविता लिहावी तर तेही अडगळीत कुठेतरी धुळ खात पडल होत आणि त्यावरची धूळ झटकली की पुन्हा नव्याने तिथेच यावं अशी अवस्था. पण मग लिखाण करावं तरी काय हा यक्ष प्रश्न होताच मग म्हटल विषय जाऊदे जे सुचेल ते लिहाव आणि हा विषय लिहायला घेतला जसे सुचेल तसे. बर आता पूर्वी सारखं अगदी वाचनही होत नाही, अगदी नाही अस नाही पण  जरा कमीच, पण त्या बदल्यात माणूस रूपी पुस्तक मात्र भरपूर वाचायला भेटतात आणि त्यातले कित्येक लाख मोलाचे...

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

न भेटले मज कोणी || एकांत मराठी कविता || Marathi Ekant kavita ||

न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !! न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !! बंदिस्त घर हे दिसे, बंदिस्त मी या घरा !! न मला कोण आठवे, न आठवलो मी कोणा !! न नाते कोणी जपले, न जपले मी कोणा !! न कोणी वाट पाहे, न पाहिले मी कोणा !! अबोल घर हे दिसे, अबोल मी या घरा !! न मला गृहीत धरले, न धरले मी कोणा !! न प्रेम कोणी केले, न झाले मज कोणा !! न लिहिले पत्र कोणी, न लिहिले मी कोणा !! रिक्त घर हे दिसे, रिक्त मी या घरा !! न मला कळले ते, न कळलो मी कोणा !! न हाक कोणी दिली, न दिली मी कोणा !! न कोणी हरवुन गेले, न हरवलो मी कोणा !! उनाड घर हे दिसे, उनाड मी या घरा !! न मला दिसले ते, न दिसलो मी कोणा !! न साथ कोणी दिली , न दिली मी कोणा !! न जगले कोण मजसाठी, न जगलो मी कोणा !! एकटे घर हे दिसे, एकटा मी या घरा !! न मला सापडे ते, न सापडलो मी कोणा !! © योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•