"अडगळीतली वही !" आज जुन्या पुस्तकात मला माझी जुनी वही सापडली. धुळीत पडलेली ती वही नकळत हातात आली आणि त्यातील एक एक ओळ वाचताना माझ्यातच मी हरवून गेलो. मनापासून लिहिलेल्या त्या ओळी, अडगळीत त्या वहीत कुठेतरी पुसट होत चालल्या होत्या. क्षणभर मीही पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून गेलो आणि नकळत जुन्या क्षणाना पुन्हा आपलस म्हणू लागलो पण तिथेच मन क्षणभर सावध झालं आणि पुन्हा मला वर्तमानात घेऊन आल. अस म्हणतात जूनं जितक दिसायला सुंदर असत तितकच ते वेदना सुद्धा देत आणि म्हणूनच की काय कित्येक वेळा जून आठवलं की आपसुक डोळ्यातून पाणी येतं. कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे सुद्धा. म्हणूनच जुन्या वहीच पान उघडताना तेवढचं सावधही असाव लागत. कारण त्यात किती वाहत जायचं हे आपणच आधी ठरवावं लागत, नाहीतर आठवाचा पाऊस पडायला लागल्यावर भिजण्या शिवाय पर्याय नसतो. म्हणूनच मी हल्ली जुन्या आठवणींन पासून जरा दूरच असतो पण ती आठवण जर अचानक समोर आली तर मात्र त्याला काही पर्याय नसतो. माणूस नजरेला बंधन घालू शकतो, पण मग मनाच काय? असाही प्रश्न कधीकधी पडतो आणि सगळच चित्र बदलायला लागत. कारण नकळत मग नजरे समोर एखादी आठवण आलीच त...
खूप दिवस झाले लेखणी बंद झाली आणि आतल्या आत कुठेतरी विचार कोंडल्या सारखे झाले. रोजच्या आयुष्यात जगताना आपण पूर्वीचे कुठेतरी हरवून गेल्याची जाणीव मनाला झाली. या विचाराना कुठेतरी वाट द्यावी वाटू लागल आणि सहजच विचारांचा वेग वाढत गेला. पूर्वी कॉलेज लाइफ मध्ये कविता लिहाव्या वाटायच्या एखाद ओळ सुचली तरी पूर्ण कविता व्हायची पण आता रोजच जगताना ते शब्द कुठेतरी हरवून गेलेत अस वाटू लागल आणि पुन्हा जमेल तस जमेल तेव्हा लिहाव हा निर्धार आज केला. खरतर खुप दिवस बंद असलेली गाडी चालू करताना जशी मेहनत घ्यावी लागते तशी लिखाण करतानाही माझी अवस्था झाली. विषयच सापडत नव्हता. आता पूर्वी सारखं प्रेमावर कविता लिहावी तर तेही अडगळीत कुठेतरी धुळ खात पडल होत आणि त्यावरची धूळ झटकली की पुन्हा नव्याने तिथेच यावं अशी अवस्था. पण मग लिखाण करावं तरी काय हा यक्ष प्रश्न होताच मग म्हटल विषय जाऊदे जे सुचेल ते लिहाव आणि हा विषय लिहायला घेतला जसे सुचेल तसे. बर आता पूर्वी सारखं अगदी वाचनही होत नाही, अगदी नाही अस नाही पण जरा कमीच, पण त्या बदल्यात माणूस रूपी पुस्तक मात्र भरपूर वाचायला भेटतात आणि त्यातले कित्येक लाख मोलाचे...