एक वचन || Marathi Sad Poems ||


बरंच काही, बोलायचे होते तुला, 
पण सारे मनातच राहून गेले !!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तेव्हा,
सगळे काही विरून गेले !!

तु सोबत होतास माझ्या,
एवढंच मन सांगून गेले !!
तुझ्या सहवासात तेव्हा जणू,
कित्येक दुःख हरवून गेले !!

राहिले काही कळलेच नाही,
सारे काही घडून गेले !!
एका क्षणात तेव्हा जणू,
सारे आयुष्य जगून गेले !!

ती सांज आणि ती लाट,
खुप काही सांगुन गेले !!
तुझ्या आणि माझ्या सोबतीची,
तेव्हा ती वेळ थांबून गेले !!

नकळत का उगाच मग मी,
एक वचन मागून गेले !!
माझ्या आयुष्याची वाट एकटी,
तुझा सहवास मागून गेले !!

बरंच काही, बोलायचे होते तुला,
पण सारे मनातच राहून गेले ..!!

✍️© योगेश खजानदार

स्वप्नातली परी || Abol Prem Kavita ||


न भेटली इथे, न भेटली तिथे !!
स्वप्नातल्या परी, तुज पाहू तरी कुठे ??

कधी शोधले तिथे, कधी शोधले इथे !!
सांग तुझा ठाव, आहे तरी कुठे !!

भास होता जसे, कधी आभास दिसे !!
तुझ्या नसण्याचे दुःख, बोलू तरी कुठे !!

हे होता जरी असे, होते का पुन्हा तसे !!
तुझ्या जवळ येण्या वाट, आहे तरी कुठे !!

मला न कळे, कळले ना कसे ??
नकळत ही तू मज, बोलते तरी कुठे !!

हो आहे आजही तिथे, एकटा मी जिथे !!
पुढे जाण्या पुन्हा, सोबती ना तु कुठे !!

राहिल्या पुन्हा इथे, आठवणी विरल्या जिथे !!
अश्रू पुन्हा विचारता ,त्यांना लपवू तरी कुठे ??

वचन दिले जेव्हा जिथे, क्षण पुन्हा भेटले तिथे !!
त्यास सांगण्या मनातले, शब्द लिहू तरी कुठे ??

न भेटली इथे, न भेटली तिथे !!
स्वप्नातल्या परी, तुज पाहू तरी कुठे ??

✍️©योगेश खजानदार

आई बाबा तुम्ही अडाणी आहात ?? || Prashn Uttar ||

  आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना ?? मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड  आहेत का ?? तर नाही !! तेही रमले त्याच्या पिढीत जसे पुढे जाऊन आपणही रमु!!




  Fashion , lifestyle या गोष्टी सतत बदलतं राहता. आपल्यापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता advance झाल्या तर आई बाबा अडाणी कसे होतील ?? नाही का !! त्यामुळे आई बाबा नेहमीच advance असतात हे लक्षात येतं, कारण , आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेजची तयारी केलेली असते. आपण धडपडतो तेव्हा त्यांनी सावरायची तयारी केलेली असते. ते गुरफटलेले असतात आपल्याला advance आणि up-to-date ठेवण्यासाठी. कधी कधी राहून जातं शिकायचं कारण आपल्याला पुढे शिकवण्यासाठी. त्यामुळें मग या गोष्टी राहूनच जातात. तुम्ही त्यांना अडाणी म्हणाल पण हे कधी विसरू नका की आपल्याला शिक्षित करायलाही तेच कारणीभूत असतात. कुठे परिस्थिती थोडी वेगळी असते , आई आणि बाबा त्यांच्या गरिबीमुळे , त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे शिकुच शकत नाहीत. पण त्यांनीं आपल्याला शिकवलं मग ते अडाणी आहेत हे म्हणून कसे चालेल. शाळा शिकली, दोन पुस्तकं वाचली तर माणूस शिक्षित होतो, अस जर वाटत असेल तर हा गैरसमज पहिला मनातून काढून टाका. कारण शिक्षण आणि जीवन यात खूप अंतर असतं. शिक्षण तुम्हाला जगण्याचा मार्ग देतो तर अनुभव तुम्हाला या मार्गावर चालण्याची ताकद, आणि अशावेळी कित्येक अनुभवातून शिकत गेलेली पिढी आपल्या मुलांना शिकून फक्त माणूस नाही तर एक चांगला माणूस कसा असावा हे बनवते. त्यामुळे आई आणि बाबा अडाणी कधीच नसतात कारण त्यांच्या सोबत शिक्षण नसेल तरी संकटाना सामोरे जाण्याचा अनुभव असतो.

जेव्हा अगदी आपण मनापासून या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतो तेव्हा आईचा तो साधेपणा , त्या outdated गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात. बाबांचा तो जुना चष्मा अगदी आपल्याला ऊर्जा देऊन जातो. कारण या गोष्टी आपल्याला सांगत राहतात की भलेही कितीही आपण advance झालो, तरी आपण आपल्या जिथे आठवणी जोडल्या जातात त्यांपासून दूर नाही जाऊ शकत. मग हेही कळायला लागतं की बदल तर होतच राहतात पण यात आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला up-to-date ठेवण्याची जास्त गरज आहे. मग एक वय अस येत की बदल म्हणजे नकोसा वाटायला लागतो.  शेवटी आपणही आई बाबा झाल्याशिवाय ह्या गोष्टी कळतच नाही. आईचं ओरडणं, बाबांचा धाक या गोष्टी अगदी नव्याने भेटाव्या अस वाटत. पण वय जसं वाढत जात तसे बाबा आपले मित्र कधी झाले आणि आई एक चांगली मैत्रीण हे कळतही नाही. म्हणजे कालपर्यंत अगदी धाक म्हणून दिलेला दम आणि आज अगदी कित्येक वैचारिक गोष्टींवरती चर्चा कधी झाली कळलही नाही. मग जाणवायला लागत की, अरे !! आई बाबा पण advance आहेतच की !!

Advance आणि up-to-date च्या गोष्टी पाहताना वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आई बाबा आता म्हातारपणात आले. आपल्याला ही आता मुले झाली, सगळं काही advance आहे, पण काहीतरी राहून गेलं आणि आपलेच मुल आपल्याला काय हो बाबा !! किती outdated आहे तुमची कार !!अस म्हणायला लागत, त्यावेळी नवल वाटावे ते काय ??? कारण काही वर्षांपूर्वी आपणच आपल्या बाबांना त्यांच्या सायकलमुळे हेच वाक्य बोललेलो असतो. पण या नव्या पिढीला कस सांगायचं की, अरे !! ही गाडी outdated नाही ,तर त्या गाडी सोबत एक date जोडली आहे ! कोणती बर ?? तुझ्या आईच्या वाढदिवसा दिवशी घेतली आहे !! तेव्हा स्वतः ला advance समजणारी ती पिढी चटकन म्हणून जाते ,  काय हो बाबा !! काय हे अडण्यासारख !!! शेवटी आपणही आउटडेटेड आणि अडाणी होऊ बसलो ना !!हे वाटायला लागत, हेच चालायचं. कारण बदल तर होतच जाणार आणि आपणच केलेले बदल उद्या आपल्यालाच outdated म्हणणार.

काही दिवसापूर्वी ज्यांना आपण अडाणी म्हटलो, ते आई बाबा आता आजी आजोबा कधी झाले हे आपल्याला कळतही नाही. त्या लहान नातवाला कित्येक श्लोक , गोष्टी सांगुही लागले ते, आणि मग त्यांच्याकडे बघून म्हणावंसं वाटत की , आई बाबा तुम्ही अडाणी अजिबात नाही !! आणि आमच्यापेक्षा तुम्ही advance आहात , कारण मी एक पाऊल पुढे टाकले तेव्हा तुम्ही माझ्या पुढच्या दहा पावलांची ताकद झालात, आम्ही जेव्हा नव्याने काही शिकलो तेव्हा तुम्ही त्याची सुरुवात झालात. अगदी प्रत्येक वेळी नव्याने भेटलात , जुन्याची सांगड घालून ..!!

✍️©योगेश खजानदार

कधी कधी || best Marathi poem ||


कधी हळूवार वाऱ्यासवे,
तुझाच गंध दरवळून जातो !!

देतो आठवण तुझी आणि, 
तुलाच शोधत राहतो !!

उगाच वेड्या मनास या,
तुझ्या येण्याची हुरहूर देतो!!

हळूवार तो वारा कधी,
नकळत स्पर्श करून जातो!!

कधी बोलतो तो एकांत,
तुझ्याच गोष्टी सांगतो !!


तुलाच रंगवतो चित्रात आणि,
तुझ्यातच रंगून जातो !!

अधुऱ्या त्या पानावरती,
तुलाच शोधत राहतो !!

बोलतो एकांत उगाच कधी, 
नकळत मन ओले करून जातो !!

कधी त्या उरल्या अश्रुसवे,
तुझाच चेहरा दिसत राहतो !!

हसतो कधी माझ्यासवे आणि,
उगाच लाजून जातो !!

बहरल्या फुलासारखे मग,
मनात बहरून जातो !!

पाहून त्या उरल्या अश्रुस कधी,
नकळत तो अलगद टिपून जातो!!

कधी हळूवार वाऱ्यासवे,
तुझाच गंध दरवळून जातो..!!

✍️© योगेश खजानदार

घरटे मराठी कविता || घर एक इवलसं ||



वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ??
सांग तू माय एकदा !! वाट कोणती त्या पाखरांची ??

उजाड वाटे घरटे तुझे, मग सलगी कर तू स्वतः शी !!
गडबड आणि गोंधळ कसला ?? विचार तुझ्या मनाशी.

हरवलेल्या शोधता येई, पण शोधावे कसे त्या देशी !!
आपुले न दिसती त्यात मग, कसली ओढ त्यांच्याशी !!

भरल्या डोळ्यांनी पाहत बसते, मग बघ एकदा स्वतःशी !!
फाटक्या या घरट्यात तुझ्या, बोलते तू कोणाशी ??

हातात तुझ्या बळ होते, तेव्हा गरज होती त्यास तुझी !!
पंखास बळ येता त्यांच्या, आठवण तुझी राहील कशी ??

नकोस करू उगाच दुःख, पुन्हा जग त्या आठवांशी !!
आठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची !!

काडी काडी जमवून बांधले, घरटे हे आपुल्यासी !!
आहे दुःख कळते मना, पण बोलू नको परक्यांशी !!

चुकल्या वाटा येतील पुन्हा, ओढ राहते घरट्याची !!
थरथरत्या हातांस तुझ्या, नको साथ देऊ आसवांची !!

वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ??
सांग तू माय एकदा, वाट कोणती त्या पाखरांची ??

✍️©योगेश खजानदार

अनोळखी नाते || अबोल प्रेम कविता ||


"नकोच आता भार आठवांचा,
नकोच ती अधुरी नाती !!
नकोच ती सावली आपुल्यांची,
नकोच त्या अधुऱ्या भेटी !!

बरेच उरले हातात त्या,
रिक्त राहिली तरीही नाती !!
डोळ्यातल्या आसवांना विचारे,
वेदनेची गोष्ट ती कोणती !!

ताणले तरी सुटे न आता,
थांबले तरी का क्षणासाठी !!
परतून येता इथे असे मग,
भेटले सारेच का अनोळखी !!

कसे नाते शोधावे इथे आज,
साऱ्याच नव्या गोष्टी !!
शोधले तरी भेटले न आपुले,
जुन्या चेहऱ्यास व्यर्थ शोधती !!

पुन्हा नव्याने भेटली का ती,
दोन अनोळखी नाती !!
न त्यास नीट समजली,
न त्याने जाणून घेतली !!

निर्थक सारे मनात असता,
कशी जपणार मग ती नाती !!
या शब्दास न कळेच काही,
बोलण्यास उरलेच न इथे बाकी !!

नात्यात हवी आपुलकी जरा,
नात्यास हवी माणुसकी !!
नात्यात असावा विश्वास तेव्हा,
नात्यास भेट व्हावी आपुली !!

कडव्या मनात न भेटते कोणी,
जुन्या दुःखात न होते सोबती !!
नव्याने भेटली ती जुनी नाती ,
मग तरी ही का होती अनोळखी !!

म्हणून, मन बोलते,

नकोच आता भार आठवांचा,
नकोच ती अधुरी नाती !!
नकोच ती सावली आपूल्यांची,
नकोच त्या अधुऱ्या भेटी ..!!"

✍️©योगेश खजानदार

समांतर || भयकथा || Horror Stories ||


  "मी मरूनही माझ्या मागे का लागलास तू ?? काहीच का कळतं नाहीये !! सोड मला!! जा !! निघून जा इथून ..!! " त्या खोलीतून कसलातरी आवाज येत होता.
"आयुष्यभर फसवलस मला तू !! असा कसा सोडेल तुला मी!! तुला याच्यासोबत जाऊ नाही देणार मी !!! "
"पण मी जाणार !! बरोबर जाणार त्याच्या !! काय करायचं ते कर !! "त्या स्त्रीचा मोठ्याने आवाज आला.
घराच्या बाहेर पोलिसांचा ताफा येऊन थांबलेला इन्स्पेक्टर शिंदे यांना त्या घरात काहीतरी घडलंय अशी बातमी कळलेली होती.पण ते काय !! हे पाहण्यासाठी ते तिथे आलेले, आणि त्या आवाजाने त्यांना काहीच कळलं नाही.
"तावडे !! काय झालंय रे !! "  शिंदे घराच्या बाहेर उभे राहून त्यांच्या कॉन्स्टेबलला विचारत होते.
"कांड झालाय साहेब !! "
"बघुयात तरी !! चला !!"  शिंदे आतमध्ये जात म्हणाले.
""साहेब ! मी कंट्रोल रूमला कळवतो !!" अस म्हणून तावडे निघून गेला. 
  इन्स्पेक्टर शिंदे येणाऱ्या आवाजाकडे चालत राहिले. त्या समोरच्या खोलीत कोणीतरी आहे.
"काय चाललं आहे रे!! "
"कोण !! कोण आहे ?" आतून आवाज आला.
"मी इन्स्पेक्टर शिंदे !! " शिंदे दरवाजा जोरात उघडत आत गेले.
"साहेब !! मला वाचवा !! नाहीतरी हा माणूस मला सुखाने जाऊ पण नाही देणार !! " अस म्हणत एक पंचवीस- तीस वर्षाची स्त्री शिंदे इन्स्पेक्टर जवळ जाऊन उभा राहिली.
"ये !! गप उभा राहा तिथं !! नाहीतर लॉकअप मध्ये नेऊन कुत्र्यासारखा तुडवल तुला!!" तो माणूस मिश्किल हसत मागे सरकला.
"हसायला काय झालं रे भाड्या !" शिंदे हातातील बंदूक त्याच्याकडे दाखवून म्हणाले.
"नाव काय तुझ ?" शिंदे रागात बोलत बंदूक खाली घेत म्हणाले.
"गिरीश राज्याध्यक्ष!!" तो तीस पस्तिक वयाचा माणूस म्हणाला.
"आणि हीच ??"
"श्वेता राज्याध्यक्ष !!" ती घाबरत घाबरत म्हणाली.
"काय प्रोब्लेम काय तुमचा ?? नवरा बायकोचना तुम्ही ??" शिंदे दोघांकडे बघत म्हणाले.
दोघेही तिरस्काराने एकमेकांकडे बघत हो..!! म्हणाले.
"मग एवढं काय भांडताय !! दहा लोकांच्या कंप्लेंट आहेत तुमच्याबद्दल !!झाल काय एवढं !!तू!! तू सांग रे !! "
"काय राहिलाय काय आता साहेब !! पण एक सांगतो साहेब जे काही केलं ते स्वत: साठी नाही !! सगळ्यांसाठी !!! या या मला धोका देणाऱ्या बायको साठी सुद्धा केलंय !!!"
"मग एवढं भांडतो कशाला?? हे बघ घरातलं प्रकरण घरातच मिटवयच असतं !! कशाला परत आमचं काम वाढवताय!!"
"काम तर वाढवून ठेवलंय साहेब याने !! याच्यामुळे सगळं बिघडलंय !! मला याच्यापासून सुटका द्या !! "श्वेता मोठ्याने म्हणाली.
"काळजी करू नका madam याला तर आता सरळच करतो!! " शिंदे जोरात काठी वर घेतो. पण तेवढ्यात मागून कोणीतरी येतानाचा भास झाला.शिंदे मागे वळून पाहू लागले.
"मारा साहेब त्याला !! नका सोडू !! माझ्या स्वप्नांची दुनिया या हरामखोराण डोळ्या देखत संपवून टाकली!!" एक गिरीशच्या वयाचा माणूस शिंदेच्या मागे उभारून बोलत होता.
शिंदे मागे फिरून बघू लागले. आश्चर्याने त्यांनी विचारलं.
"आता तू कोण ?आणि आत कधी आलास !!! "
"साहेब मी इथंच होतो !! तुमच्या मागे !! "
"मग मला दिसला कसा नाही ??"
"साहेब तुम्ही त्या दोघांना बोलत होतात ना!! म्हणून माझ्याकडे लक्ष गेलं नाही तुमचं !! "
"हो !! पण तू आहेस कोण??"
"मी !! श्वेताचा boyfriend !! "
"याच्या तर आता !!!" गिरीश मारायच्या हेतूने उठला. ते शिंदेनी पाहिलं आणि ते लगेच म्हणाले.
"ये बस !! बस तिथं !!"
गिरीश गप्प बसला.
"म्हणजे प्रकरण अस आहे तर !! म्हणजे तुझ प्रेम ह्या !! नाव काय रे तुझ??"
"सतीश साठ्ये !!" शिंदेकडे पाहत तो म्हणाला.
"हा !! या सतीश वर आहे तर !! "
"हा पण !! हे boyfriend वैगेरे आधी ओ!!! लग्ना आधी !! आता असल हे तोंड फाडून जर तुमचा boyfriend म्हणत असलं!!तर या गिरीशरावला राग येणारच ना !! काय गिरीशराव !!!" शिंदे थोड हसत बोलले.
"काल रात्री मी दुबई वरून आलो तर ही निर्लज्ज बाई या हरामखोर माणसा सोबत बेड वर होती."
"बरोबर आहे साहेब !! राग कोणाला येणार नाही !! " शिंदे शांत करत बोलले.
"तुम्ही पोलिस चौकीवर चला !! तुमचा सगळा मॅटरच close करतो आज..!!"
"नाही साहेब !! मला नाही यायचं !! " श्वेता नकारार्थी मान हलवत म्हणाली.
"येणार नाही !!! " श्वेता रागात येत म्हणाली.
"याव लागलं मॅडम !!! " शिंदे रागात बघत म्हणाला.
"साहेब !!या माणसानं खूप त्रास दिलाय मला !! " सतीश मोठ्यान म्हणाला.
"अरे भाड्या !! एकतर या बाईला फसवून !! यांच्या संसराच वाटोळं करून !! वरून अजुन तूच म्हणतोय मला !! की यान त्रास दिलाय !!! तू तर गेलाच रे आता !! आत घालून third डिग्री लावतो बघ तुला..!!"
"गिरीश शेठ चला तुम्ही !! बघतो मी हे सगळं!"
"नाही !! याला तर मी संपवणारच आता !! " गिरीश रागात म्हणाला.
"साहेब !! त्याला सांगा माझ त्याच्यावर प्रेम नाहीये !! मला त्याच्यापासून divorce हवाय !! "
"हो !! म्हणजे दोष सगळा माझाच ना !! " गिरीश रागात बोलला.
"साहेब थोड शांत व्हा !!"शिंदे त्याच्याकडे बघत म्हणाले.
"नाही साहेब !! तुम्ही मध्ये येऊ नका आता !! याला मी संपवणार !!! " गिरीश मागून बंदूक काढून सतीशवर रोखत म्हणाला.
"साहेब हे असलं काही करू नका.!! कायदा हातात घेऊ नका ....!!! "
"नाही साहेब !! याला तर मी संपवणार !! " अस म्हणताच गोळी गिरिशणे झाडली.
सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. शिंदे सुन्न झाले.
"नालायका !!! माझ्या सतीशला तू मारलं !!तुला मी सोडणार नाही !! " श्वेता रागात त्याच्याकडे धावून गेली.
गिरीशने दुसरी गोळी श्वेतावर झाडली. शिंदे दुसऱ्या गोळीच्या आवाजाने भानावर आले.
"गिरीश !! हात वर !! हे बघ !!असा मूर्खपणा चांगला नाही !!!
" मूर्खपणा तर आहेच साहेब हा !! "
"बंदूक खाली ठेव गिरीश !! "
"नाही साहेब !! त्यावेळेस विचारलं होत साहेब मी तिला !! तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर मला सांग मी तुझ्याशी लग्न करणार नाही !! पण सालीला माझ्यासारखा श्रीमंतही सोडू वाटला नाही !! आणि तो तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सतीशही !! मग याचा अंत असच होणार ना साहेब !! लग्न करून घरी आली ती !! माझी झाली ती !! तिच्यावर जिवापाड प्रेम केलं मी !! आणि खोट बोलली मला !! " गिरीश जवळच्या खुर्चीवर बसून राहिला. हातात बंदूक तशीच होती. शिंदे पुढे येत येत बोलू लागले.
"गिरीश शांत हो!! ती बंदूक दे माझ्याकडे आणि सोबत चल माझ्या !! "
"कसा येऊ सोबत साहेब मी ?? माझा अंत तर केव्हाच झालाय !! "
"काय ?" शिंदे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाले.
तेवढ्यात हातातील बंदूक स्वतःचा डोक्यावर ठेवत गिरीश शिंदेकडे पाहू लागला.
"नाही !!  गिरीश !!! "
त्या बंदुकीच्या गोळीने गिरीशच्या डोक्याचा भुगा केला. गिरीश जागेवर पडला.
  शिंदेंला काय बोलावं तेच कळेना. खिशातला मोबाईल काढून ते तावडेला फोन लावू लागले.
खोलीतून बाहेर येत झाल्या गोष्टीबद्दल विचार करू लागले. तेवढ्यात तावडे समोरून येताना दिसला.
"तावडे !! तिथं कांड झालाय !! दोघांचा खून आणि खून करणाऱ्याने suicide केलंय !! Just !!"सुन्न होऊन शिंदे बोलत होते.
"हा माहितेय ना साहेब !! "तावडे शिंदेकडे पाहत म्हणाला.
"अरे !! आता माझ्यासमोर कांड झालाय तुला कस माहिती!! " शिंदे कुतूहलाने म्हणाले.
"काय साहेब !! आहो !! कांड झालाय !! पण तो काल रात्री!! आता नाही !!! "
"म्हणजे !! "
"काय साहेब !! On duty आज !! " तावडे दारू पिल्याची खून करत बोलू लागला.
"तावडे !!" एवढंच बोलून शिंदे आत पळत आले.
आत येताच समोर आताच आलेल्या कॉन्स्टेबलला विचारू लागले.
"ये !! त्या बॉडी कुठे आहेत !! "
"हे काय साहेब !! इकडच्या खोलीत !! " शिंदे सुन्न झाला.
आत जाऊन पाहतो तर कित्येक वेळापूर्वी मरून पडलेल्या त्याच माणसांची देह तिथे होती. अगदी तशीच जशी त्या गिरीश ने मारली होती.
शिंदे एका जागी सुन्न बसले. मागून कॉन्स्टेबल बोलत होते तेवढं काही ऐकू येत होत.
"नाव काय रे यांची !!! " एक कॉन्स्टेबल रजिस्टर घेऊन येत म्हणाला.
"लिही रे !!  गिरीश राज्याध्यक्ष ..!! श्वेता राज्याध्यक्ष !! आणि याच काही कळलं नाहीरे !! कोण आहे हे !!!लफड्याची केस दिसतेय !!
"सतीश साठ्ये !! " शिंदे त्या कॉन्स्टेबलकडे पाहत म्हणाले.
सुन्न झालेल्या मनाने शिंदे तिथून बाहेर आले. त्यांचा डोक्यात गिरीशचे ते शेवटीच वाक्ये घोळू लागली
" सालीला माझ्यासारखा श्रीमंत ही सोडू वाटला नाही !! आणि तो तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सतीश ही !! मग याचा अंत असच होणार ना साहेब ! असाच होणार ..!!!लग्न करून घरी आली ती !! माझी झाली ती !! तिच्यावर जिवापाड प्रेम केलं मी !! आणि खोट बोलली मला !!खोट बोलली मला ..!!!! "

*समाप्त*

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...