एक वचन || Marathi Sad Poems ||


बरंच काही, बोलायचे होते तुला, 
पण सारे मनातच राहून गेले !!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तेव्हा,
सगळे काही विरून गेले !!

तु सोबत होतास माझ्या,
एवढंच मन सांगून गेले !!
तुझ्या सहवासात तेव्हा जणू,
कित्येक दुःख हरवून गेले !!

राहिले काही कळलेच नाही,
सारे काही घडून गेले !!
एका क्षणात तेव्हा जणू,
सारे आयुष्य जगून गेले !!

ती सांज आणि ती लाट,
खुप काही सांगुन गेले !!
तुझ्या आणि माझ्या सोबतीची,
तेव्हा ती वेळ थांबून गेले !!

नकळत का उगाच मग मी,
एक वचन मागून गेले !!
माझ्या आयुष्याची वाट एकटी,
तुझा सहवास मागून गेले !!

बरंच काही, बोलायचे होते तुला,
पण सारे मनातच राहून गेले ..!!

✍️© योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...