मुख्य सामग्रीवर वगळा

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते. 



प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत असतो. मुळात त्यात चूक असे काहीच नाही. पण त्या विचारांना त्या तत्वांना आपल्या विचारांनी पाहण्याची आपली स्वतः ची बाजू मांडण्याची ताकत ज्या व्यक्तीत असते तो खरा तत्वनिष्ठ असतो असे मला वाटते. यामध्ये सखोल विचार करून पाहिले तर असे जाणवून येते की एखाद्या व्यक्तीच्या तत्वांना पाहताना आपण आपले अस्तित्व विसरता कामा नये याला म्हणावे आपल्या विचारां सोबत जगणे.



मुळात यामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा आहे की आपल्या आयुष्यात नक्कीच आपल्याला कोणी ना कोणी व्यक्ती, गुरु अथवा मार्गदर्शक आवश्य आहे. तो नकळत आपल्याला भेटतो ही. आणि ते हवेच असते. कारण योग्य मार्ग दाखवणार जीवनात हवाच. पण यावेळी आपण स्वत्वाला विसरून फक्त त्याच्याच विचारांवर चालणे याला आंधळे विचार असे म्हणता येईल. कारण आपण ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी अनेक प्रसिद्ध लेखकांचे विचार , त्यांचे नियम , त्यांची तत्व वाचतो. त्यांच नकळत अनुकरण ही करतो. पण त्यातून प्रेरणा घेऊन आपले स्वत्व जो जपतो. आपले प्रखर विचार निर्भिड मांडतो. तोच पुढे नेतृत्वाची क्षमता ठेवतो अस मला वयक्तिक वाटत. असो पण यामध्ये आपल्या विचारात जर काहीच वेगळं मत येत असेल तर त्याला हसून जो स्वीकारतो जर ते योग्य असेल तर त्यात बदल करतो तो पुढे आपल्या विचारांची पेरणी नव तरुणाईत करतो हेही तितकेच खरे आहे. 


माणूस शेवटी शिकतो ते आपल्या अनुभवातून आणि त्याला योग्य मार्ग दाखवणारे त्याच्या तत्वांना फुंकर घालणारे योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याला चूक दाखवणारे खरे व्यक्ती आपल्या सोबत असावे ही खरी मोठी बाब आहे. कारण स्वामी विवेकानंद हेही रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. पण पुढे त्यांनी आपल्या विचारांनी आपल्यातील स्वस्त्व जागृत करून नव्या तत्वांची नव्या विचारांची पेरणी केली. म्हणजे काय तर माणसाने व्यक्तिनिष्ठ असावे पण अश्या व्यक्तीस की त्यांच्या सोबतीने माणूस तत्वनिष्ठ होईल. खरतर यामध्ये आपण खूप गुरु शिष्यांची उदाहरणे घेऊ शकतो जिथे गुरूने आपल्या शिष्यास त्यांच्या स्वत्वाची जाणीव करून दिली आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना तत्वनिष्ठ बनवले. आणि तेही पुढे येणाऱ्या व्यक्तिनिष्ठ लोकांना मार्ग सांगणारे त्यांच्यातील तत्वांना जागृत करणारे बनले. 



विचारांचा डोंगर ज्यावेळी उभा राहिला तेव्हा मला एक गोष्ट नक्की जाणवली. की जेव्हा मी या विचारांचा डोंगर रचत होतो तेव्हा तत्व आणि व्यक्ती दोघेही सोबतच वर चढत होते. यामध्ये कोणीच कुठे थांबले नाही. जिंकले ते दोघेही , कारण विचारांशी झुंजत असताना असे जाणवले की व्यक्ती हा कुठे ना कुठे व्यक्तिनिष्ठ असतोच आणि तो जिथे आपल्या तत्वाने चालतो तिथे तो तत्वनिष्ठ होतो फक्त गल्लत  ती अशी होऊ नये की व्यक्तिनिष्ठ होताना आपल्या तत्त्वाना विसरू नये आणि आपल्या तत्वांनी चालताना व्यक्तिनिष्ठ गुरुजनांचा आदर , त्यांचे विचार कधी विसरू नये. हेच खरे मार्ग आपल्याला आपले स्वत्व मिळण्याचे प्रमाण. 


✍🏼 योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi lekh ||

दरवर्षी वाढदिवस येतो आणि कित्येक आठवणी देऊन जातो. त्याची सुरूवात नवे वर्ष सुरू झाले की आपल्या जन्म दिवशी कोणता वार येतो तिथून केली जाते आणि दरवर्षी हे नक्की होत. हल्ली तर लहान मुलांचे महिन्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात. पण पूर्वी तस काहीच नसायच, जन्म दिलेल्या आईलाही आपलं मूल केव्हा जन्मल हे नीटसं आठवत नसायचं. अगदी लांब कशाला माझ्या आईच तसच काहीस आहे. तिला तिची जन्म तारीख नक्की कधी आहे हेच माहित नाही. आज्जीला विचारलं की आज्जी एवढंच सांगायची की मोठी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुझ्या आईचा जन्म झाला, १९६७ की ६८ ते नीटसं सांगता येत नाही, पण त्यादिवशी मंगळवार होता. बस्स एवढंच ते काय माहिती आईच्या वाढदिवसाबद्दल. मग काय गेली कित्येक वर्ष आईचा वाढदिवस आम्ही द्वादशीला साजरा करू लागलो. पण नक्की तारीख ती काय जाणुन घ्यायची इच्छा मला काही शांत बसू देईना. या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुल...