मन

शब्दांची गरज नाहीये
नातं समजण्या साठी
भावना महत्वाची
समजलं तर आकाश छोटे
सामावले तर जगही कमी पडेल
नातं जपण्यासाठी
अशी व्यक्ती असावी मज पाशी
ही एकचं ओढ त्यासाठी
भुतकाळात अडकलेल्या
गरज आहे आजच्या हाकेची
ओढुन आपल्या मिठीत घेण्याची
जाऊच नये बंध तोडुन
पुन्हा गरज आहे त्या बंधनाची
नातं जपण्याची
सगळं विसरून आपलस करण्याची
चुक ती विसरण्याची
बोलणार्‍या नात्यांना
साद देण्याची
मनमोकळं एकदा बोलण्याची
अगदी भांडण्याची
डोळ्यांची कडा पुसण्याची
गरज आहे ती
नातं फुलवायची
नातं जपण्याची
अगदी मनापासून. ..

- #योगेश_खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...