मुख्य सामग्रीवर वगळा

मनातलं प्रेम


"मनातलं प्रेम"

   तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त्याने रिप्लाय केला 'मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! ' .. आणि दोघांच संभाषण सुरु झालं. हळुहळु दोघांच बोलणं वाढलं.. सहज बोलन रोजच झालं. सकाळी गुड मॉर्निंग पासुन ते रात्री गुड नाईट पर्यंत बोलन चालु लागलं. दोघांच्या आवडी निवडी एकमेकांना कळु लागल्या. प्रत्येक चांगली वाईट गोष्ट तिला कधी सांगतोय अस त्याला वाटु लागलं .. आज दिवसभर काय घडल हे त्याला सांगावंस तिला वाटु लागलं. मेसेज नंतर फोनवर रोज बोलणं होऊ लागलं.. दोघांच एक छोटस जग तयार झालं,  सहजच बोलणं त्याला प्रेम वाटु लागलं. पण तिला कस व्यक्त करावं हे मनातल सगळं म्हणुन तो रोज 'तुला काहीतरी सांगायचंय मला!' अस म्हणुन पुन्हा 'काही नाही, जाऊ दे!' अस म्हणुन टाळु लागला. तिलाही ते कळत होतं सहजच बोलणं आता सहजं राहिलं नव्हतं. त्यात प्रेमाची चाहुल लागली होती.
   पण एक दिवस त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलताच कोणी एक बोलु लागला. मनाच्या पटलांवर जोरदार घात झाला. तिच्या प्रियकराने त्याला खुप काही सुनावलं होतं. तो ही सगळ निमुटपणे ऐकत होता. बोलायला काहीच राहिल नव्हतं. उरले होते ते फक्त मनातल्या प्रेमावर घात होऊन विस्कटलेले आठवणींचे तुकडे. ती सहज म्हणुन आली होती की सहजच बोलली होती. प्रेम आणि मैत्री यात गल्लत करुन तो कुठे चुकला होता का? .. की मला तुला काहीतरी सांगायचंय! ते काय हे तिला कळुनही तिने ते अंतर जाणलंच नाही कधी.
   तिचा प्रियकर होता ती निघुन गेली. नंतर 2 4 साॅरीचे मेसेजेस त्याला करुन ती विसरुनही गेली. मैत्री आणि प्रेम यातलं अंतर तरी काय असतं हे न सांगताच गेली. मग चुक ती कोणाची होती. सहजच म्हणुन सुरू झालेल हे तितकेस सहज नाही राहील हे तिला कळत होतंच ना. की फक्त बोलावंस वाटतं म्हणुन झालेला संवाद होता तो?. पण संवाद कुठेतरी थांबतो .. पण जिथे संवाद थांबतच नाही ते प्रेम असतं
  कित्येक गोड गोष्टींच गाठोडं घेऊन तो शांत होता. ती निघुन गेली तरी तिच्यावर न रागावत तिच्या साठी जगतं होता. मनातल्या प्रेमाला शब्दात लिहितं होता .. आणि कवितेत तिला आपलंस करत होता .. ते प्रेम होतं की मैत्री याची गल्लत करत होता .. चुक तिची होती की माझी हे विसरूनही आजही तो तिच्यावरच प्रेम करत होता .. अगदी मनातुन. .
@योगेश खजानदार

#योगेश_खजानदार

#मी_आणि_माझी_कविता

Yogeshkhajandar.blogspot.com

Yogeshkhajandar.wordpress.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...