किनारा ...

"पावलं चालतात त्या समुद्र किनारी
आठवणीत आहे आज कोणी
सुर्य ही अस्तास जाताना
थांबला जरा मझं जवळी

ती लाट पुसते मज काही
आठवण असते तरी काय ही?
मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना
ओलावते का मन ती

तो बेफान वारा बोलतो काही
आठवण म्हणजे विचारतो काय ती?
मझं सारखे मुक्त फिरताना
जाणवते का मनास ती

ती शुभ्र चांदणी येते आकाशी
सांग म्हणते आठवण काय ती?
मझं सारखे लुकलुकताना
तुटते का अचानक ती

कसे सांगावे काय ती
आठवण असते जाणीव ती
मनातुन चांदणे तुटताना
ओलावते डोळे ती
-योगेश खजानदार


कवितेतुन ती...

ती मला नेहमी म्हणायची
कवितेत लिहिलंस का कधी मला
माझ्यासाठी लिही म्हटलं तर
सुचतंच नाही का रे तुला

इतक सार लिहिताना
आठवलंस का कधी मला
वाटतं एकदा डोकावून
मनातुन वाचावं तुला

तुझ्या शब्दाच्या दुनियेतुन
मनसोक्त पहावं मला
माझेच मी हरवुन जाताना
कवितेतुन मिळावे तुला

तुझ्या डोळ्यांत दिसते ती
मी पहायची आहे मला
शब्दांना सोबत घेऊन
मनातलं बोलायचं आहे तुला

कवितेत तुझ्या एकदा तरी
लिही ना रे मला
का ? माझ्यासाठी लिही म्हटलं तर
सुचतंच नाही का रे तुला ...






आठवणं...

तुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही

कधी स्वतःला विचारलं मी
पण मन मला बोललंच नाही
तुझ्या राज्यातुन ते कधी
परत माझ्याकडे आलंच नाही

माझेच मला परके व्हावे
इतके शब्द ही ऐकत नाहीत
माझ्या कविते मधुन ते
तुला बोलणं सोडतं नाहीत

बेधुंद त्या मनास कधी
सुर ते भेटतं नाही
तुला भेटावंस वाटल तरी
ती वाट कुठे दिसत नाही

सांग कसे समजावु मला
मन काही ऐकत नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता काही येतं नाही

हरवलेले क्षण ...

विस्कटलेल हे नातं आपलं
पुन्हा जोडावंस वाटलं मला
पण हरवलेले क्षण आता
पुन्हा सापडत नाहीत

कधी दुर अंधुक आठवणीत
तु दिसली होतीस मला
वाटलं होतं पुन्हा भेटावं
पण धीरच झाला नाही

वाटा त्या जुन्या आजही
खुनावत होत्या मला
पण त्या वाटांवर चालताना
मला तुच दिसली नाही

एकांतात राहुन आजही
बोलतं ते ह्रदय मला
पण व्यक्त करायला तेव्हा
मला तुच सापडत नाही

डोळ्याच्या कडा आजही
सांगतात ते अश्रुही मला
हरवलेले ते क्षण आता
पुन्हा सापडत नाही
- योगेश खजानदार

बार्शी आणि ... !!

   मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्थी पुरवणी मागितल्या शिवाय राहणार नाहीत. एकंदरीतच काय तर आमच्या बार्शीकरांना बोलण्याची प्रचंड हौस. मग तो विषय कोणताही असो.
मित्रां सोबत चर्चा करणे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकत्र जमल्याचा अनुभव तुम्हाला इथे आल्या शिवाय राहणार नाही. अगदी सुभाषनगरला चालु असलेली चर्चा पांडे चौकात ऐकू आली तर त्यात नवलं ते काय वाटायचं. मग त्यात राजकारण आलं , समाजकारण आलं आणि चेष्टा मस्करी तर काय विचारु नका. असं एकंदरीतच बार्शी म्हणजे स्वतःतच रमलेल छोटं शहर आहे. इथे विविध प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील आणि विरंगुळा मिळेल असे एकही ठिकाण नसले तरी तुम्हचा विरंगुळा झाल्या शिवाय राहणार नाही.
इथे भाषा जरा वेगळीच सापडते !!  त्याचे पण जरा प्रकार आहेत एवढंच. काही दिवस पुण्यात राहुन आलेला एखादा बार्शीकर जर अगदीच शुद्ध आणि सात्विक बोलतोय असं वाटलं तर म्हणायचं याला पुण्याची हवा लागली मग बार्शीचा अत्यंत अभिमान असणारे काही विचारवंत त्याची चेष्टा केल्या शिवाय राहत नाहीत.. काय बेट्या बदलला तु तिकडं जाऊन असे म्हटल्यावर आपल्या रांगड्या बार्शीच्या दोन शिव्या बसल्या की यांची गाडी कुर्डूवाडी रोडचे खड्डे सहन करत बार्शीत येऊन पोहचते.
  प्रेम , जिव्हाळा बार्शीत अगदी पोतं भरेल इतकं मिळेल.  पण भांडण म्हटल की हम किसीसे कम नही !! ची भाषा इथे नक्कीच वापरली जाते. भाषा जरा वरच्या स्वरात असते पण त्यातही एक आपुलकी नक्कीच असते. आपले लोक आपली बार्शी याबद्दल प्रत्येक बार्शीचा माणुस भरपुर सांगेन आणि बार्शीत कधीही न आलेला माणुस कोणालाही न विचारता सारी बार्शी फिरुन येईल यात काही शंका नाही.
  बाकी संध्याकाळच्या वेळी भगवंत मैदानावर विविध खाण्याच्या पदार्थावर ताव मारतं कित्येक बार्शीच्या लोकांची मने तृप्त होतात. नवविवाहित जोडप्यांच तर हे आवडीच स्थळ म्हणायला ही हरकतं नाही. अगदी खुप दिवसांनी भेटणारे मित्र ही पाणीपुरीवर ताव मारताना इथे भेटतात. काही बोलतात तर काही चेहरा 180 अंशाने फिरवुनही जातात मग हा देह फक्त बार्शीत आहे बाकी मेंदु बाहेरगावीच ठावुन आला आहे असं वाटतं बाकी हवा कुठली लागली त्याला विचारायलाच नको..
  बार्शीचं वेगळेपण तस खुप सांगण्या सारखं आहे. इथे तरुण पिढी समाजकारणात मनापासून भाग घेते आणि तेच सशक्त लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. विविध विषयांवर चर्चा होते , शिवकार्यात तर बार्शीचं कौतुक करावं तेवढं मला कमी वाटतं. एकंदरीतच काय तर बार्शी जरी छोटे शहर असले तरी त्याची विविधता खुप आहे. इथल्या भाषेची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे काही शब्द मराठी भाषेत बार्शीतल्याच लोकांनी दिले असणार हे नक्की. इथले वारे जरा वेगळ्याच दिशेने वाहतात हेही तितकेच खरे आहे. . .. !!

एकांतात बसुन ...!!

एकांतात बसुनही कधी
एकट अस वाटतंच नाही
घरातल्या भिंतींही तेव्हा
बोल्या वाचुन राहत नाही

तु एकटाच राहिलास इथे
सोबत तुझ्या कोणीच नाही
आयुष्यभर दुसर्‍यासाठी जगुन
हाती तुझ्या काहीच नाही

मागुन तरी काय मागितलंस
दोन क्षण बाकी काही नाही
तेवढ देण्यासाठी ही तुला
आपल्या लोकांकडे वेळच नाही

बघ एकदा आमच्याकडे
आज ही आम्ही वेगळया नाही
ऊन पावसाच्या खेळां मध्ये
नातं आमच तुटलं नाही

खरंच सांगतो तुला
बरंच झालं आम्ही माणुस नाही
सहज नातं तोडायची
आमच्यात खरंच ताकद नाही

एकांत तुझा आम्हाला
आता पाहावतं नाही
घराशी जोडलेल नातं तुझं
आम्ही कधीच विसरू शकत नाही

म्हणुनच एकांतात बसूनही कधी
एकटं अस वाटतंच नाही
- योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...