आठवणं...

तुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही

कधी स्वतःला विचारलं मी
पण मन मला बोललंच नाही
तुझ्या राज्यातुन ते कधी
परत माझ्याकडे आलंच नाही

माझेच मला परके व्हावे
इतके शब्द ही ऐकत नाहीत
माझ्या कविते मधुन ते
तुला बोलणं सोडतं नाहीत

बेधुंद त्या मनास कधी
सुर ते भेटतं नाही
तुला भेटावंस वाटल तरी
ती वाट कुठे दिसत नाही

सांग कसे समजावु मला
मन काही ऐकत नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता काही येतं नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...