सहवास !!(कथा भाग ४)

जळत्या दीव्या सोबत ती रात्र अखंड जळत राहिली. सुमेधा त्या रात्री कित्येक अश्रुंशी बोलत होती. पण ऐकणार ते कोण! मनातल्या विचारांचं  गाठोड उघडायचं तरी कुठे !! कित्येक आणि कित्येक विचार.
सकाळ होताच सुमेधा सगळं घर नीट आवरून घेऊ लागली. कोणत्याही क्षणी मनोज येईल आणि मग!! या विचारांनी ती काम करत होती. सायली कित्येक वेळ खोलीतून बाहेर आलीच नाही. सुमेधा  अखेर तिला उठवायला गेली.
"सायली !! सायली!! उठ आता चल !!"
कित्येक वेळ हाक मारल्या नंतर सायली उठून बाहेर आली.
"आई !! " सायली सुमेधा कडे पाहत म्हणाली.
"काय ग??" सुमेधा काम करत करतच तिला बोलत होती.
"आई !! काल जे झालं त्याबद्दल मला माफ कर !! "
"अरे !! त्यात काय एवढं !! जा बर आवरून घे !! मनोज सर कधीही येतील !! "
"हो आई !! पण मला माफ कर !! आयुष्यात आपण कोणावर प्रेम करावं की करू नये !! हे सांगण्याचा अधिकार किंवा त्याबद्दल बोलायचा हक्क आपल्याला नसतोच !! "
सुमेधा हातातलं काम बाजूला ठेवून सायलीकडे बघू लागली.
"बाळ !! कोणावर प्रेम होईल हे जस आपल्या हातात नसतं !! तसच कोणावर प्रेम कर हे पण आपण नाही सांगू शकत !! सगळं मनच ते बोलत! "
सायली एक हास्य देत सुमेधाकडे पाहू लागली.
"जा आवर पटकन !! "
सायली आईकडे पाहत निघून गेली.
"आज कदाचित मनातलं सारं बोलून मोकळं व्हावं असं का वाटतं. मनोज कधीही येईल!! आणि कित्येक जुन्या आठवणींना घेऊन येईल. त्या बागेतील त्याची आणि माझी पहिली भेट आणि बाबांना मी त्याच्यावर प्रेम करतेय हे सांगणं !! किती ते धाडस होत न माझ!! अखंड प्रेम करत राहिले मी त्याच्यावर !! लग्न केलं रमण सोबत पण हे मन त्याचंच राहील !! शेवट पर्यंत !!! "  सुमेधा कित्येक विचार करत सारं काम करत होती.
अचानक दरवाजा वाजला. सुमेधा चमकुण दरवाज्याकडे पाहू लागली. आणि लगबगीने दरवाजा उघडायला गेली.समोर मनोज होता. एक स्मित हास्य करत तो म्हणाला.
"खूप वेळ लागला तुझ घर शोधायला!!"
"होका !! येणा !! "
मनोज घरात येत म्हणाला.
"थोडा उशीरच झाला !!
"बस ना !! मी पाणी आणते तुझ्यासाठी!! "
मनोज समोरच्या सोफ्यावर बसला. सुमेधा पाणी आणायला आत गेली. शेजारच्या टेबलावर सुमेधा आणि रमणचां फोटो तो बघू लागला. तितक्यात सुमेधा जवळ येत म्हणाली.
"२० वर्षां पुर्वीचा आहे फोटो!! "
"हो !! ते कळलं मला !! वय बोलत माणसाचं !! फोटोतही!! "
मनोज पाण्याचा ग्लास घेत म्हणाला.
तितक्यात सायली तिथे आली. आपल्या सरांना समोर पाहून गोंधळली.
"ये ना !! " सुमेधा तिच्याकडे पाहत होती.
"सर तुम्ही माझ्या आईला ओळखता हे माहीतच नव्हतं मला !! काल आई म्हणाली मला !! "
सायली अगदी सहज मनोजला बोलू लागली.
"आम्ही दोघे जुने मित्र आहोत !! आम्ही दोघेच कित्येक वर्षानी भेटतोय !! दोन दशकं गेली आणि पुढे ५ वर्ष !! "
मनोज सायलीकडे पहात बोलला.
तिघे कित्येक वेळ बोलत होते. सोबत जेवणही केलं.जेवण झाल्यानंतर सायली आपल्या खोलीत निघून गेली.सुमेधा आणि मनोज घराच्या अंगणात बसून बोलू लागले.
"खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! " सुमेधा मनोजकडे बघू लागली.
"आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर बर वाटत !! नाहीतर एकांत कधीही गोडच वाटतो !! माझ्यासारखा !! "
सुमेधाला या बोलण्यात कित्येक दुःख साचल्याच जाणवलं.
"खरंय तुझं !! आवडत्या व्यक्तीचा सहवास असेल तर आयुष्य छान वाटतं !! नाहीतर सहवासात असेन तरी मन एकटच राहत !! माझ्यासारखं !! " सुमेधा मनोजकडे एकटक पाहू लागली.
"इतकंच एकटं होत हे मन तर कधी आपल्या लोकांना शोधावं अस वाटल नाही ??"
"मन अडकून पडलं होत!! रक्ताच्या नात्यात !! "
"म्हणजे आजही मी शून्यच आहे !! " मनोज अगदी भरल्या मनाने म्हणाला.
"काही गोष्टी बांधून ठेवतात रे मनोज !! "
"मला त्या गोष्टी ऐकायच्या आहेत !! " मनोज अगदी निर्धाराने बोलला.
सुमेधा कित्येक क्षण अबोल राहिली. मनाशी कित्येक विचार करून ती बोलली लागली.
"तुला ऐकायचे आहे ना!! मी रमण सोबत का लग्न केले ते !! "
मनोज होकारार्थी मान डोलावु लागला.
"तर ऐक मग !! " सुमेधा आता मनमोकळे बोलू लागली.
"तुझ्या आणि माझ्या प्रेमाबद्दल मी जेव्हा घरी सांगितल तेव्हा बाबांचा साफ नकार होता!! तुझ्याकडे मला द्यायला काहीच नाही असं त्यांना वाटत होत!! त्याच काळात रमणच स्थळ माझ्यासाठी आल. मुलगा श्रीमंत आहे !! खूप कमावतो असे वाटून बाबांना स्थळ आवडल.!!" मनोज सगळं मनापासून ऐकत होता.
"पण माझा लग्नाला साफ नकार होता!! बघायचाही कार्यक्रम झाला!! मला बघताच मी रमणला आवडले!!  पण काही दिवसात बाबांनी त्यांना नकार कळवून टाकला!!  रमणला हे खरच वाटेना !! आणि तो मला पाहताच प्रेमात पडला होता!! त्याला हा नकार नको होता!! नंतर कित्येक दिवस तो माझ्या मागे होता!! सुमेधा भरल्या डोळ्यांनी सांगू लागली.
"पुन्हा एक दिवस तो मला बाहेरच भेटला!!  मला बळजबरी करत त्याच्या घरी घेऊन गेला.!! घरी त्यावेळी कोणीच नव्हते !! २ दिवस माझ्यावर अत्याचार करत होता. इकडे आई आणि बाबा दोघेही माझा शोध घेत होते!! पुन्हा घरी आल्यावर सगळी हकीकत मी दोघांनाही सांगितली!! पण समाज !! लाज !! आणि इज्जत !! या गोष्टीत तो माझ्यावरचा बलात्कार माझ्या घरच्यानीच झाकून घेतला!! " मनोजला काय बोलावे कळत नव्हते. तो फक्त ऐकत होता.
"तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम होते!! अशात काही महिने गेले !! माझ्या पोटात बाळं आहे असं कळताच बाबां गप्प झाले !! पण आई मला कित्येक विनवण्या करू लागली. अखेर मी लग्नाला होकार दिला !! "
सुमेधा शांत झाली.
"पण तू त्याचवेळी पोलीसात तक्रार का केली नाहीस ??"
"समाजात काय इज्जत राहील !! माझ्यावर बलात्कार झालाय हे जर बाहेर कळाल तर काय होईल अशा कित्येक भीती मला घरच्यांनी दाखवल्या !! आणि असही रमण लग्नासाठी चालून आलेल स्थळ होतच ना!! अस म्हणून २५  वर्षाचा त्याचा आणि माझा नरक सहवास सुरू झाला!! !!"सुमेधा डोळ्यातले अश्रू पुसून म्हणाली.
"तुला माहितेय मनोज !! एक गोष्ट आजही माझ्या मनात आहे !! स्मरणात आहे !! माझ्यावर नाहीतर माझ्या दिसण्यावर प्रेम करणाऱ्या रमणे मला आपलस केल्या नंतरचे ते हास्य!! आजही मला लक्षात आहे !! "सुमेधा   उठतं म्हणाली.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

सहवास!! (कथा भाग ३)

सुमेधा रात्रभर सायली जवळ बसून होती. तिथेच ती झोपी गेली होती. सकाळी दरवाजाची कडी वाजल्याचां आवाज झाला आणि तिला जाग आली. सकाळी सकाळी सुमेधाची सासू तिला भेटायला आली होती. दरवाजा उघडत सुमेधा म्हणाली.
"सासूबाई तुम्ही सकाळी सकाळी ??"
"गावाकडे मनच लागेना!! तुला भेटावसं वाटलं म्हणून आले परत !! " सुमेधाची सासू  घरात येत म्हणाली.
"बरं झालं तुम्ही आलात !! " सुमेधा आत जात म्हणाली.
कित्येक वेळ ती घरातलं सगळ आवरत होती. एक चहाचा कप ती सासुबाईकडे देत म्हणाली.
"गावाकडे कसे आहेत सगळे !! "
"मजेत आहेत !! रमण बद्दल कळालं म्हणून विचारपूस करत होते!! "
सुमेधा हातातल्या चहाचा घोट घेत फक्त पाहात होती.
"इतकं चागलं पोर माझं !! त्या दारू पायी गेलं !! की मारलं कोणास ठाऊक!! " सासू पदराने डोळे पुसत म्हणाल्या.
"म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला ??"सुमेधा अचानक बोलून गेली.
"जिवंतपणी मारलं माझ्या पोराला तू !! त्याची बायको झालीस !! पण फक्त शरीराने!! "
"काय बोलताय तुम्ही सासूबाई ??" सुमेधा हातातला चहाचा कप खाली ठेवत म्हणाली. तिला हे सगळं अनपेक्षित होत.
"२५ वर्षांपूर्वी झाल त्याची शिक्षा तू त्याला प्रत्येक क्षणाला दिलीस !! मारलस माझ्या पोराला !! "
"सासूबाई मी कशाला मारू त्यांला !!बायको म्हणून सारी कर्तव्य पार पाडलीचना मी !! " सुमेधाला खूप काही बोलायचं होत पण ती शांत झाली.
"फक्त कर्तव्यच केलीस तू !! " सासूबाई तिरस्काराने सुमेधाकडे पाहत म्हणाल्या.
त्या दोघींच्या आवाजाने सायलीला जाग आली. ती लगबगीने बाहेर आली. आजीला समोर पाहून ती आई जवळ जाऊन उभी राहिली.
"माझच चुकलं !! तुझ्यासारख्या रांडेच्या पदरात माझ पोर टाकलं!! आणि मारल मी !! क्षणाक्षणाला !! २५ वर्ष !! "
"सासूबाई !! तोंडाला येईल ते काय बोलताय!! " एव्हाना आता सुमेधाचा ही पारा चढला होता.
आईचं हे रूप पाहून सायली थोडी घाबरली होती.
"नाही माझच चुकलं!! चुकलचं माझं !! " अस म्हणत सुमेधाची सासू तडक बाहेर निघून गेली.
सायली आजीच्या मागे जाणार तोच.
"सायली !! कुठेही जाऊ नकोस !! जाऊ दे त्यांना !! " सुमेधा राग शांत करत बोलली.
सायली काहीच न बोलता आत निघून गेली. सुमेधाने घराचं दार बंद करून घेतलं.
"तुम्हाला झाकायला जागा आहे म्हणून तुम्ही पुरुष !! माझ्या आयुष्याची लाज काढली तरी तुमचंच पुरुषपण जपत राहायचं आम्ही !! कशासाठी रे !! फक्त लाज राखायला!! करा हवा तेवढा छळ करा !! वाटेल तेव्हा अंगा खाली घ्या !! आणि पुन्हा आमच्याच लाजेचे लखतर आमच्याच मढ्यावर ओढून मोकळे व्हा!! २५ वर्ष या माणसाने दुसर केलं तरी काय!!" सुमेधा डोळ्यातून ओघळत्या अश्रूनसोबत त्या तिच्याच नशिबाशी बोलत होती.
"एक बायको म्हणून मी त्यांची राहिलेच ना !! परपुरूषाचा स्पर्शही या देहाला कधी माहीत नाही !! आज मला कळतेय की काल एवढी लगबग का होती माझी!! मनोजला भेटायची !! कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं !! मनसोक्त प्रेम केलं!! फक्त प्रेम केलं !! कोणतीही अपेक्षा न ठेवता !! " सुमेधा डोळ्यातले अश्रु पुसत उठू लागली.
सायली स्वयंपाक घरात आवरत होती. सुमेधा तिथे येताच ती एकदम सावरली.
"आई !! आजी एवढी का चिडली होती !! "
"काही नाही ग !! असच !! " सुमेधा सायलीकडे पाहतही नव्हती.
"आई !! मला एवढं तरी कळतं की नक्की काय झालंय ते !!! आजी जे काही म्हणत होती ते !! "
"बाळा !! आयुष्यात कितीही श्रीमंत झालात तरी प्रेम नाही विकत घेता येत !! त्यासाठी समोरच्याला जीव लावावा लागतो !!"
सायली सुमेधाकडे पाहत म्हणाली.
"म्हणजे तुझ बाबांवर प्रेम नव्हतं ??"
"एक पत्नी म्हणून मी सारी कर्तव्य केली !! पण एक स्त्री म्हणून कधीच नाही !! मी फक्त त्यांची पत्नी होते !! "
"म्हणजे तुझ बाबा वर प्रेम नव्हतं तर!! "
सुमेधा काहीच न बोलता गप्प राहिली.
पण सायली मनातून पुरती गोंधळली.  तिच्यासाठी हे आईचं नवीनच रूप होत. आईच्या मनात बाबा बद्दल प्रेमचं नाही हे ऐकुन ती अबोल झाली.
सुमेधा मात्र या सगळ्या गोष्टीतून आता सावरण्याचा प्रयत्न करत होती.
"माझ्याही अश्या असण्याला काही कारणे आहेत बाळं !! एक स्त्री मनातून खूप कठोर असते !! कारण तिने स्त्रित्वाचे कित्येक घाव सोसलेले असतात!! अंतरीच्या या पटलावर कित्येक गोष्टी आहेत ज्या तुला मी वेळ आल्यावर नक्की सांगेन !! बाळ तुझ्या आईला वाईट समजू नकोस !! " सुमेधा आपल्या मना सोबतच व्दंव्द करत होती.
सायली मात्र आता सुमेधाला जास्त बोलत नव्हती. मोजकेच पण तुटक बोलत होती.
"बाळ सायली !! तुझे ते शिक्षक आहेत ना मनोज देसाई ते उद्या आपल्या घरी येणार आहेत !! " सुमेधा सायलीकडे बघत म्हणाली !
"ठीक आहे !! " सायली खाली मान घालून काहीतरी लिहिण्यात व्यस्त होती.
"विचारलं नाहीस का ते ??"
"का ??" सायली वर सूमेधाकडे पहात म्हणाली.
"ते माझे जुने मित्र आहेत !! परवा तुला सोडायला आले होते तेव्हा भेट झाली माझी !! "
"बरं !! "
"सायली काय झालंय तुला !! माझ्याशी नीट बोलत नाहीस !! तुटक तुटक वागतेस !! काय झालं आहे तुला ??"
"कुठ काय?? काही नाही !!!
"तुला याचाच राग आलाय ना की मी तुझ्या बाबांवर प्रेम का केलं नाही ते !!  बाळा प्रेम मनातून होत !! आणि जे मन, दुसऱ्याच प्रेम प्रेमाने जिंकत ना !! त्याला प्रेम म्हणतात !! यापुढे मी काही बोलू शकत नाही !! तुझे बाबा आहेत ते!! तू नक्कीच त्याच्यावर प्रेम कर आणि करत राहा !! मला त्याविषयी काहीच बोलायचा हक्क नाही!!" सुमेधा अगदी मनापासून बोलत होती. डोळ्यातले अश्रू पुसत होती.
ती काहीच न बोलता खोलीत निघून गेली. सायली कित्येक वेळ बाहेरच बसून होती. आपण आईशी अस वागायला नव्हतं पाहिजे अस मनातून तिला वाटत होत.
सुमेधा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दीव्याकडे पहात होती .

अखंड जळत राहिले मी
माझेच मला विसरून
अखेरच्या क्षणी उरले
ते कलकांचे काजळ जगी

क्रमशः..

✍योगेश खजानदार

सहवास ..!! (कथा भाग २)

"आज अचानक मनोज भेटला आणि मनाला थोड बर वाटल! किती वर्षाने भेटला मला तो. पहिले तर वाटत होते कधी समोर आलेच त्याच्या तर बोलणारच नाही मला !!पण बोलला मला ! असंख्य विचार क्षणासाठी येऊन गेले!! २५ वर्षांपूर्वी रागावून गेला होता माझ्यावर!! रमणशी लग्न करते हे कळाल्यावर पुन्हा कधी भेटलाही नाही मला तो!! की विचारायला आला नाही कधी मला!! की ज्या व्यक्तीचा, ज्याच्या कृत्यांचा नेहमी मी तिरस्कार करत आले त्याच्याशी मी का लग्न केले!! पण काही असो सगळं विसरून तो कधी काही घडलच नाही अश्या भावात मला सामोरा आला." सुमेधा दिवसभर कित्येक विचार करत होती.
घड्याळातल्या काट्यानकडे सतत बघत होती. आणि संध्याकाळ होताच मनोजच्या आधी आपण तिथे पोहचायच हे मनाशी ठरवत होती.
"खरतर त्याच रागावणं योग्यच होत!! चुकले ती मीच !! पण खरंच मी चुकले का ??  मलाच कधी कळतं नाही हे !!  ज्या व्यक्तीला मला बोलायचही नव्हतं कधी!! त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवल मी !! पुरती २५ वर्ष म्हणजे तारुण्याचा सगळा काळ !! ज्या काळात आपल्या हव्याहव्याशा व्यक्तीसोबत आयुष्याची , तारुण्याची मजा घ्यायची तो काळ मी त्याच्यासोबत घालवला !! रमण सोबत !! " अनेक विचारात गुंग असलेली सुमेधा अचानक घड्याळाकडे पाहू लागली. एव्हाना घड्याळात ६ वाजून गेले होते.
सुमेधा लगबगीने उठली. आज जरा घाईतच ती ऑफिस मधून बाहेर पडली. गाडीच्या वेगासोबत तिच्या मनातल्या विचारांचं वेग जरा जास्तच होता.
"घाई आणि गडबड कशासाठी?? २५ वर्षे ज्या व्यक्तीला माझी साधी आठवणही आली नाही त्याच्यासाठी!! की मनात आजही ती सल आहे त्यासाठी?? माहीत नाही पण ही ओढ कदाचित पुन्हा त्याला पाहण्यासाठी असेनही!! " सुमेधा त्या जुन्या कट्ट्या जवळ पोहचली. मनोज आजही तिच्या आधी तिथे येऊन तिची वाट पाहत बसला होता.सुमेधा त्याच्या जवळ येत म्हणाली.
"थोडा उशीरच झाला मला !! ऑफिसच्या कामात वेळ कसा गेला कळलंच नाही !! "
"ठीक आहे ग !! बस आता !! "
"आज अचानक भेटलास आणि मला खरंच काय बोलावं ते कळलंच नाही!! " सुमेधा मनोजकडे पहात होती. डोळ्यात आज तिच्या एक वेगळीच चमक होती.
"होका !! पण मला तू भेटशील हे कधी वाटलेच नव्हतं !! तुझी मुलगी ??""
"सायली!! सायली नाव आहे तिचं !! "
"सायली ज्या कॉलेज मध्ये शिकते तिथेच मी प्राध्यापक आहे !! " मनोज सुमेधा कडे एकटक पाहत होता. सुमेधा मात्र आता नजर चोरत होती.
"खरंच !!" सुमेधा आश्चर्य वाटतं म्हणाली.
"हो !! किती वर्षाने भेटतोय ना आपण !! मला तर वाटलंच नव्हतं तू कधी मला अशी भेटशील म्हणून !! " मनोज शेजारच्या फुलांकडे पहात म्हणाला.
"मलाही कधी भेटशील अस वाटल नव्हत !! त्यावेळी मला काहीच न बोलता गेलास आणि मनात राग धरून बसलास !! तुझ्या आजच्या या वागण्याने खरंच मला पूर्वीच्या त्या गोष्टींकडे पुन्हा पहावसं वाटलं !! की तो तूच होतास की दुसरच कोणी!! " सुमेधा शांत बोलत होती.
"काळाने रागाची सगळी टोके बोथट करून टाकली बघ !! तू समोर दिसताच फक्त तुला बोलावं एवढंच वाटलं मला !! बाकी पूर्वीच काहीच मनात ठेवलं नाही !! पण एक राग आजही मनात कुठेतरी हळूच कधी बोलतो मला !! तुझ्यावर रागावतो ही !! पण तेवढ्याच पुरते !! " मनोज फक्त बोलत होता.
"माहितेय मला !! तुझ्या मनात आजही थोडा राग आहेच ना माझ्याबद्दल !! आणि तो चुकीचा नाहीच !! तू रागवलास माझ्यावर तो तुझा हक्क होता !! कारण माझ्यावर प्रेम करणारा तूच एक होतास!! " सुमेधा मनोजकडे पहात होती.
"पण त्या प्रेमाला तू कधीच ओळखल नाहीस !! माझ्यापेक्षा तो रमण श्रीमंत आहे आणि मी गरीब !! म्हणून सगळं प्रेम विरून गेलं !! " मनोज असे म्हणताच सुमेधाचा डोळ्यात एक अश्रू दिसू लागला.
"अस काही नाहीरे मनोज !! पैसाच जर सर्वस्व असतं तर त्यावेळी मी तुला लग्नाच वचन दिलच नसतं ना!! "  सुमेधा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"जाऊदे !! वचन आणि कित्येक गोष्टी आता पुन्हा कशाला!! रमण कसा आहे ?? " मनोज विषय बदलत म्हणाला.
"महिन्याभरपूर्वी गेला तो!!" सुमेधा एकदम म्हणाली.
मनोजला काय बोलावे तेच कळेना. तो निशब्द होऊन फक्त सुमेधाकडे पाहत होता.
"खूप दारू प्यायचा तो!! त्याचाच परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला!! शेवटी शेवटी डॉक्टर म्हटले जर यांनी दारू सोडली नाही तर मरण अटळ आहे !! आणि अखेर तेच झाल!! " सुमेधा खाली पाहत बोलत होती.
"खरंच खूप वाईट झाल !! त्याला तुझ्यापेक्षा !! तुझा मुलीपेक्षा !! ती दारू जवळची होती!! " मनोजला काय बोलावं कळेना.
"आपली व्यक्ती जवळ असूनही आपली नाही !! याचच दुःख खूप होत त्याला !! " सुमेधा मनोजला एकटक पाहत म्हणाली.
"बरं चल मी निघते आता !! "
"आलीस काय आणि चाललीस पण लगेच !! " थांब तर थोडा वेळ !! कित्येक दिवसांनी भेटते आहेस!" मनोज विनंती करत बोलत होता.
"सायली आली असेन रे घरी !! मी नाही म्हटल्यावर जरा काळजी करेन ती!! अस कर ना!! या रविवारी घरीच ये !! तुझ्या बायकोला घेऊन !! " सुमेधा घड्याळाकडे पहात म्हणाली.
"मी लग्न नाही केलं !! " मनोजच्या या वाक्याने सुमेधाला काय बोलावे तेच कळेना.
" बरं तू तरी ये !! सायली शी भेट पण होऊन त्या निमित्ताने !!
"बरं !!ठीक आहे !! मनोज.
सुमेधा घरी जायला निघाली. मनोज ती गेली तरी कित्येक वेळ तिथेच बसून होता. जुन्या आठवणी आणि कित्येक गोष्टी आठवत होता. सुमेधा मात्र लगबगीने घरी जायला निघाली. आपल्या मुलीच्या ओढीने. मनोजला रविवारी पुन्हा भेटण्याचे वचन देऊन.
सायली इकडे घरी केव्हाच येऊन बसली होती. आई कुठे नाही म्हणून दरवाज्यात बसून होती. अंधार पडत आला तरी आई कुठे नाही या काळजीने तिचा चेहरा रडका दिसत होता. आईच्या गाडीचा आवाज येताच ती लगबगीने उठली आणि पाहू लागली.
सुमेधा चालत दरवाज्यात आली. तोच सायलीने तिला घट्ट मिठी मारली.
"कुठे गेली होतीस आई तू ?? "
"बाळा !! जरा काम होत म्हणून उशीर झाला !! " चल बर आत.
सायलीला आत घेत सुमेधा तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत होती.
"जेवलीस का ??" सुमेधा सायलीला म्हणाली.
काहीच न बोलता तिने नुसती नकारार्थी मान डोलावली.
"चला बर पटकन मग !! आधी जेवण करूयात !! "
सुमेधा सायलीला घेऊन स्वयंपाक घरात गेली. आपल्या हाताने तिला भरवत तिला कित्येक वेळ बोलत होती. रमण गेल्यानंतर सायली आज पहिल्यांदाच घरात एकटी होती.
"आई !! मला एकटं सोडून नको ना जात जाऊस कुठे!! "
"नाही हा बाळा कुठेच जाणार नाही मी तुला एकट सोडून !! " सुमेधा.
"बरं झोपा चला आता !! "
सुमेधा कित्येक वेळ सायली जवळ बसून होती. अंतरीच्या कित्येक विचारांशी बोलत होती. जणू मनाला म्हणतं होती.

"एकांत मनाच्या तळाशी जणू
माझेच मला का दिसतो आहे
सगळीकडे पसरला तो प्रकाश
पण माझ्याच वाट्यास का अंधार आहे ?? " सुमेधा सायलीकडे कित्येक वेळ पहात होती.

क्रमशः ...

✍ योगेश खजानदार

सहवास !! (कथा भाग १)

    "सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत  पण अखेर रागचं मनात का ?? त्या एका गोष्टीने पुढच्या २५ वर्षाच  काहीच मोल केलं नाही? मी जळून खाक झाले तेव्हाच! मग आज तिरस्कारही का वाटू नये !! कदाचित मेलेल्या माणसाच्या सर्व भावना तुटतात आणि उरतो तो फक्त देह !! फक्त जाळण्यासाठी!! पण हा देह जिवंतपणी जळतो त्याच काय ??" सुमेधा जळत्या चीतेकडे एकटक पहात होती. मनात असंख्य विचार जळत होते.
"आई !! चल आता !! " सायली आईकडे, सुमेधाकडे पहात म्हणाली.
"नको ग!! थांबते आजुन मी थोडावेळ !! " सुमेधा एकटक त्या चितेकडे पहात होती.
"वाऱ्यासारखी मी , बेफाम मी , पण आयुष्याची कोंडी सोडवताना पूर्ण भांबावून गेले! आपल्या मनात कित्येक गोष्टी तशाच राहून गेल्या !! त्याच्याही आणि माझ्याही!! तो संसार होता की बळजबरी मलाच काही कळले नाही !! पण केला मी !! २५ वर्षे !! न चुकता !! पण माझी वाट कोणती होती हे मी पाहिलच नाही कधी !! " अचानक सरणातून  आवाज झाला आणि सुमेधा घरी जायला निघाली.
"आई !! बाबांची आठवण खूप येते मला !! " सायली सुमेधाकडे पाहून रडु लागली.
सुमेधा सायलीला मिठी मारुन शांत करत होती. पण काही केल्या सुमेधा रडत नव्हती. तिच्या डोळ्यातील अश्रू काहीच का बोलत नव्हते?
"सूमे !! या पोरीला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही बरं !! काळजी घे तिची !! रमण असा अचानक जाईल असे कोणालाच वाटले नव्हते !! तुझ्यासारखी करती स्त्री तिच्या पाठीशी आहेच!! पण बापाचं छत्र हारवंल की  आयुष्य उघड होत !! " सुमेधाची सासू घरात येत बोलत होती.
"त्याच्या प्रत्येक चुका पदरात घातल्यास पोरी तू !! तुझ्यासारखी पोरगी या वेळी डगमगणार नाही  मला माहितेय !! रमण गेला तरी तू सायलीला बापाची कमी भासू देणार नाहीस!!" सुमेधा फक्त ऐकत होती.
  आपला नवरा गेला तरी सुमेधा अचल होती.अंतरीच्या शोधात होती. मनात काहीतरी राहून गेलं आहे त्याचा शोध घेत होती.
रमण गेला म्हणून सुमेधा कित्येक दिवस कामावर गेलीच नाही. त्याच्या जाण्याने तिलाही खूप आघात झाला होता. सायलीच्या मनाला अजूनही तो धक्का सहन होत नव्हता..पण सुमेधा आता या सगळ्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.
"आई !! आज तू कामावर जाणारं आहेस ना ??" सायली सूमेधाकडे पहात म्हणाली.
"हो !! का बरं ??"
"मला सोडना कॉलेज मध्ये जाता जाता!! "
"बरं चल पटकन!" सुमेधा गाडीत बसत म्हणाली.
"आई !! तुला बाबांची आठवण येते ??" सायली सहज बोलून गेली.
"हो !! येते ना !! खूप येते !! " सुमेधा चा चेहरा कित्येक भावनांनी बदलून गेला. दुःख ही होत आणि बरंच काही.
"बर थांब थांब!! जाते मी इथूनच !! आणि आई आज मला यायला वेळ लागेल !! " सायली गाडीतून उतरत बोलली.
"बरं ठीक आहे !! सुमेधा सायलीला सोडून निघत होती
"1 मिनिट थांबता  का?? "एका अनोळखीच व्यक्तीने सुमेधाला हटकले.
"कोण आपण?? " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली पण पुढच्याच वेळी तिच्या आणि त्याच्या दोघांचे चेहरेच बदलून गेले.
"सुमेधा तू ?? "
"मनोज ?? " सुमेधा प्रश्नार्थक चेहरा करून बोलत होती.
"हो!! मनोजच आहे मी !! आणि इकडे काय करतेयस तू ?? "
"मुलीला सोडायला आले होते !! " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"पण असा अचानक भेटशील अस वाटल नव्हत बर मला !! " सुमेधा त्याच्याकडे अगदी मनसोक्त बोलत होती.
"बरं इथेच बोलणार आहेस की !!"मनोज अगदी मनमोकळेपणाने बोलला.
"आता मी थोडी घाईत आहे !! पण आज संध्याकाळी भेटुयात का नक्की ?? "
"ठीक आहे !! काहीच हरकत नाही !! पण कुठे भेटायचं ??" मनोज तिच्याकडे पहात म्हणाला.
"आपल्या पूर्वीच्या जागी ?"
"नक्कीच !! तुझ्या आधी येऊन बसेन बर मी!!"  मनोज सुमेधाकडे पाहून मिश्किल हसला.
"होरे!! येईल मी वेळेत !! बरं येते मी !!
या अचानक घडलेल्या भेटीत सूमेधाला एक सुखद धक्का दिला. तिला कधी एकदा संध्याकाळी मनोजला भेटेन अस झाल होत.

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...