मुख्य सामग्रीवर वगळा

देशाच्या मनातले...

प्रिय माझ्या नागरीका ...

    हो मित्रा , मी तुझा देश भारत बोलतो आहे. खूप काही बोलायचं आहे म्हणून हा प्रपंच. सध्या तू इतका व्यस्त असतोस की माझ्याकडे पाहायला कदाचित तुझ्याकडे वेळ नाही म्हणून पत्राद्वारे बोलण्याचा एक छोटा प्रयत्न, कित्येक दिवस झाले काही गोष्ट मनात आहेत आणि त्या तुला सांगायचा आहेत. तर मन लावून वाच ,
   १५ ऑगस्ट १९४७ रोजी मला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करून माझ्या क्रांतिवीरांनी मला एका नव्या मुक्त श्र्वासांची दिशा दिली. त्यावेळी ती उमेद खूप छान होती. मी भारतीय आहे या भारत देशाचा पुत्र आहे असे गर्वाने इथली जनता माझ्या या कुशीत गुण्या गोविंदाने राहू लागली. त्या नंतर २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक देश म्हणून माझी नवीन ओळख झाली.  तुझ्या या भारत देशाची नवीन आयुष्याला सुरुवात झाली. पण हे स्वातंत्र्य एवढ सोपं नव्हतं मिळवणं. त्यासाठी कित्येक आंदोलने , कित्येक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर , भगत सिंग, राजगुरू , सुखदेव, सुभाष चंद्र बोस अश्या कित्येक भारतीय महापुरुषांनी मोलाची वाट दाखवली. पण आता तू म्हणशील की हे सगळं मी का सांगत आहे तुला. पण तुझ्या मनावरची धूळ थोडी पुसली गेली असेन याने.
  आज मी स्वातंत्र्या नंतरच्या कित्येक काळात खूप गोष्टी पाहिल्या आणि पुन्हा तुला बोलायचं ठरवलं. आज मी कित्येक भागात विभागलो गेलो आहे ,कोणी इथे गुजराती आहे ,कोणी मराठी , कोणी पंजाबी तर कोणी तामिळ. ज्याला त्याला आपल्या गोष्टींचा आभिमान. कोणी ब्राह्मण आहे , कोणी मराठा , कोणी दलित आहे तर कोणी राजपूत ,कोणी पटेल आहेत तर कोणी जाट. अरे माझा भारतीय कोठे दिसेल का रे ?? मला शोधायचं आहे त्याला माझ्यातच मी हरवून गेलो आहे त्याला. दंगली भडकतात कोणी जातीवरून दंगल करत , कोणाच्या भावना दुखावल्या जातात तर कोणाला आजही स्वातंत्र्य हवं आहे!! पण लक्षात ठेव प्रत्येक वेळी जळतो तो देशच.  अरे!! कुठे गेली देशभक्ती ??की स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर त्याची काहीच किंमत राहिली नाही. मला आजही पुन्हा सांगावस वाटत कित्येक उपोषण केली तेव्हा भारत स्वतंत्र झाला , कित्येक चळवळी केल्या तेव्हा भारत स्वतंत्र झाला , कित्येक सशत्र उठाव झाले तेव्हा हा भारत स्वतंत्र झाला. आणि हा स्वातंत्र्याचा अट्टाहास का ?? की आज कित्येक वर्षानंतर माझा भारतीय नागरिक मला विसरून लढेन फक्त स्वतः साठी!! की विचार करेन आपल्या प्रांताचा , आपल्या जातीचा ?? आपल्या धर्माचा ?? नाहीना !! मग कोणती ही विचारांची प्रेरणा की तुम्ही आज मला प्रत्येक क्षणाला अंतरीतून फक्त जाळतच राहाल.  मला अभिमान ही काही गोष्टींचा आहे ,त्या लोकांचा आहे, ते भारतीय आहेत याचा गर्व आहे, असे लोक म्हणजे , दिन दुबळ्याची मदत करणारे , मला अभिमान आहे त्याचा ज्यानी भारताला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात यशस्वी केलं. मला अभिमान आहे अशा लोकांचाही ज्यांनी माझ्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मला अभिमान आहे या देशातील इमानदार सेवकांचा अशाच लोकांसाठी मी आजही पुन्हा पुन्हा नव्या चेतनेने उभा राहतो.
   स्वातंत्र्य मिळाल्या नंतर मला नव्या वाटा मुक्त दिसू लागल्या. खरतर त्या दाखवल्या कित्येक महान पुरुषांनी , मी आजही माझ्या मनात त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. मग आज माझा भारतीय का भरकटतो आहे , ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी कधी कोणती जात पाहिली नाही त्यांना तुम्ही धर्मात आणि जातीय का वाटून टाकलं ?? त्यांचं कर्तुत्व यापेक्षा खूप मोठं आहे !!  या देशाला चंद्रशेखर आजाद ही तितकेच प्रिय आहे जितके अश्फाक उला खान !! माझ्या कुशीत कित्येक धर्माची जातीची लोक गुण्या गोविंदाने राहतात , त्यांचा मला अभिमान आहे! पण विचारांची दिशा भरकटलेल्या काही लोकांनी मला फक्त जाती धर्मात वाटलं. पण मी अभेद्य आहे !! आज मी कित्येक स्वप्न बाळगून आहे , भारत मोठी सत्ता होण्याच्या वाटेवर! आणि माझे कित्येक भारतीय यासाठी आजही झटत आहेत, त्याचा मला अभिमान आहे.
  माझ्या पायाशी अखंड समुद्र जलाभिषेक करत आहे आणि मस्तकी आकाश मुकुट होऊन राहिले आहे. या भूमीला महान पुरुषांचे आदर्श लाभले आहेत पण कदाचित आज आदर्श , विचार यांची भाषा  बदलून गेलेली वाटते , कित्येक चोर , गावगुंड , आरोपी सहज मंत्री होतायत , कोणी आमदार खासदार होतायत मग येणाऱ्या भावी पिढीने आदर्श घ्यायचा तो यांचाच का ?? हो भारतीयांचा हा विचार करण्या सारखा विषय आहे !! थोर पुरुष आता पुतळ्या पुरते उरले आहेत आणि त्यांच्या नावे असलेली ग्रंथालये धुळीत जाऊन पडली आहेत !! माझ्या मनातली ही खूप दुःखाची गोष्ट आहे!!  आमची मुलं शिकतात पण फक्त स्वतःच पोट भरण्याचा एक मार्ग म्हणून! मग कसली आली भारतीय असल्याची शान आणि कसले काय ?? सगळेच नुसते दिखावे !! ज्या इंग्रजांनी माझ्या भगत सिंगला मारल , जालियनवाला बाग घडवून आणली !! कित्येक वर्ष माझ्या सोन्याच्या देशाला लुटलं त्यांची भाषा आता मोठ्या अभिमानाने बोलताना दिसतात !! हे माझे आणखी एक दुःख !! कोणत्याही देशाचा अभिमान हा त्याच्या भाषेच्या कडवट पनातून येतो. आणि आता आम्ही तिथेच कमी पडू लागलो आहोत. भाषा , वेष , या गोष्टी आपल्याही तितक्याच सुंदर आहेत हे आता सांगावं लागत !!
  सुरुवात इथूनच आहे !! तुम्हाला लढायच असेन तर आपल्या देश विघातक शक्तीशी लढा !! तुम्हाला स्पर्धा करायची असेन तर देश जागतिक पातळीवर उच्च स्थानी कसा जाईन याची करा !! हेच माझ्या भारतीयां तुला भारतीय असल्याचा अभिमान असू दे !! आपल्याच थोर लोकांचे कित्येक विचार तू घे!!  मग बघ तूही आनंदाने गाणे म्हणशील !!

"जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा !! वो भारत देश है मेरा !!"

तुझाच अभिमान , गर्व

भारत देश ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...