मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास !! (कथा भाग १)

    "सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत  पण अखेर रागचं मनात का ?? त्या एका गोष्टीने पुढच्या २५ वर्षाच  काहीच मोल केलं नाही? मी जळून खाक झाले तेव्हाच! मग आज तिरस्कारही का वाटू नये !! कदाचित मेलेल्या माणसाच्या सर्व भावना तुटतात आणि उरतो तो फक्त देह !! फक्त जाळण्यासाठी!! पण हा देह जिवंतपणी जळतो त्याच काय ??" सुमेधा जळत्या चीतेकडे एकटक पहात होती. मनात असंख्य विचार जळत होते.
"आई !! चल आता !! " सायली आईकडे, सुमेधाकडे पहात म्हणाली.
"नको ग!! थांबते आजुन मी थोडावेळ !! " सुमेधा एकटक त्या चितेकडे पहात होती.
"वाऱ्यासारखी मी , बेफाम मी , पण आयुष्याची कोंडी सोडवताना पूर्ण भांबावून गेले! आपल्या मनात कित्येक गोष्टी तशाच राहून गेल्या !! त्याच्याही आणि माझ्याही!! तो संसार होता की बळजबरी मलाच काही कळले नाही !! पण केला मी !! २५ वर्षे !! न चुकता !! पण माझी वाट कोणती होती हे मी पाहिलच नाही कधी !! " अचानक सरणातून  आवाज झाला आणि सुमेधा घरी जायला निघाली.
"आई !! बाबांची आठवण खूप येते मला !! " सायली सुमेधाकडे पाहून रडु लागली.
सुमेधा सायलीला मिठी मारुन शांत करत होती. पण काही केल्या सुमेधा रडत नव्हती. तिच्या डोळ्यातील अश्रू काहीच का बोलत नव्हते?
"सूमे !! या पोरीला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही बरं !! काळजी घे तिची !! रमण असा अचानक जाईल असे कोणालाच वाटले नव्हते !! तुझ्यासारखी करती स्त्री तिच्या पाठीशी आहेच!! पण बापाचं छत्र हारवंल की  आयुष्य उघड होत !! " सुमेधाची सासू घरात येत बोलत होती.
"त्याच्या प्रत्येक चुका पदरात घातल्यास पोरी तू !! तुझ्यासारखी पोरगी या वेळी डगमगणार नाही  मला माहितेय !! रमण गेला तरी तू सायलीला बापाची कमी भासू देणार नाहीस!!" सुमेधा फक्त ऐकत होती.
  आपला नवरा गेला तरी सुमेधा अचल होती.अंतरीच्या शोधात होती. मनात काहीतरी राहून गेलं आहे त्याचा शोध घेत होती.
रमण गेला म्हणून सुमेधा कित्येक दिवस कामावर गेलीच नाही. त्याच्या जाण्याने तिलाही खूप आघात झाला होता. सायलीच्या मनाला अजूनही तो धक्का सहन होत नव्हता..पण सुमेधा आता या सगळ्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.
"आई !! आज तू कामावर जाणारं आहेस ना ??" सायली सूमेधाकडे पहात म्हणाली.
"हो !! का बरं ??"
"मला सोडना कॉलेज मध्ये जाता जाता!! "
"बरं चल पटकन!" सुमेधा गाडीत बसत म्हणाली.
"आई !! तुला बाबांची आठवण येते ??" सायली सहज बोलून गेली.
"हो !! येते ना !! खूप येते !! " सुमेधा चा चेहरा कित्येक भावनांनी बदलून गेला. दुःख ही होत आणि बरंच काही.
"बर थांब थांब!! जाते मी इथूनच !! आणि आई आज मला यायला वेळ लागेल !! " सायली गाडीतून उतरत बोलली.
"बरं ठीक आहे !! सुमेधा सायलीला सोडून निघत होती
"1 मिनिट थांबता  का?? "एका अनोळखीच व्यक्तीने सुमेधाला हटकले.
"कोण आपण?? " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली पण पुढच्याच वेळी तिच्या आणि त्याच्या दोघांचे चेहरेच बदलून गेले.
"सुमेधा तू ?? "
"मनोज ?? " सुमेधा प्रश्नार्थक चेहरा करून बोलत होती.
"हो!! मनोजच आहे मी !! आणि इकडे काय करतेयस तू ?? "
"मुलीला सोडायला आले होते !! " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"पण असा अचानक भेटशील अस वाटल नव्हत बर मला !! " सुमेधा त्याच्याकडे अगदी मनसोक्त बोलत होती.
"बरं इथेच बोलणार आहेस की !!"मनोज अगदी मनमोकळेपणाने बोलला.
"आता मी थोडी घाईत आहे !! पण आज संध्याकाळी भेटुयात का नक्की ?? "
"ठीक आहे !! काहीच हरकत नाही !! पण कुठे भेटायचं ??" मनोज तिच्याकडे पहात म्हणाला.
"आपल्या पूर्वीच्या जागी ?"
"नक्कीच !! तुझ्या आधी येऊन बसेन बर मी!!"  मनोज सुमेधाकडे पाहून मिश्किल हसला.
"होरे!! येईल मी वेळेत !! बरं येते मी !!
या अचानक घडलेल्या भेटीत सूमेधाला एक सुखद धक्का दिला. तिला कधी एकदा संध्याकाळी मनोजला भेटेन अस झाल होत.

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...