मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास !!(कथा भाग ४)

जळत्या दीव्या सोबत ती रात्र अखंड जळत राहिली. सुमेधा त्या रात्री कित्येक अश्रुंशी बोलत होती. पण ऐकणार ते कोण! मनातल्या विचारांचं  गाठोड उघडायचं तरी कुठे !! कित्येक आणि कित्येक विचार.
सकाळ होताच सुमेधा सगळं घर नीट आवरून घेऊ लागली. कोणत्याही क्षणी मनोज येईल आणि मग!! या विचारांनी ती काम करत होती. सायली कित्येक वेळ खोलीतून बाहेर आलीच नाही. सुमेधा  अखेर तिला उठवायला गेली.
"सायली !! सायली!! उठ आता चल !!"
कित्येक वेळ हाक मारल्या नंतर सायली उठून बाहेर आली.
"आई !! " सायली सुमेधा कडे पाहत म्हणाली.
"काय ग??" सुमेधा काम करत करतच तिला बोलत होती.
"आई !! काल जे झालं त्याबद्दल मला माफ कर !! "
"अरे !! त्यात काय एवढं !! जा बर आवरून घे !! मनोज सर कधीही येतील !! "
"हो आई !! पण मला माफ कर !! आयुष्यात आपण कोणावर प्रेम करावं की करू नये !! हे सांगण्याचा अधिकार किंवा त्याबद्दल बोलायचा हक्क आपल्याला नसतोच !! "
सुमेधा हातातलं काम बाजूला ठेवून सायलीकडे बघू लागली.
"बाळ !! कोणावर प्रेम होईल हे जस आपल्या हातात नसतं !! तसच कोणावर प्रेम कर हे पण आपण नाही सांगू शकत !! सगळं मनच ते बोलत! "
सायली एक हास्य देत सुमेधाकडे पाहू लागली.
"जा आवर पटकन !! "
सायली आईकडे पाहत निघून गेली.
"आज कदाचित मनातलं सारं बोलून मोकळं व्हावं असं का वाटतं. मनोज कधीही येईल!! आणि कित्येक जुन्या आठवणींना घेऊन येईल. त्या बागेतील त्याची आणि माझी पहिली भेट आणि बाबांना मी त्याच्यावर प्रेम करतेय हे सांगणं !! किती ते धाडस होत न माझ!! अखंड प्रेम करत राहिले मी त्याच्यावर !! लग्न केलं रमण सोबत पण हे मन त्याचंच राहील !! शेवट पर्यंत !!! "  सुमेधा कित्येक विचार करत सारं काम करत होती.
अचानक दरवाजा वाजला. सुमेधा चमकुण दरवाज्याकडे पाहू लागली. आणि लगबगीने दरवाजा उघडायला गेली.समोर मनोज होता. एक स्मित हास्य करत तो म्हणाला.
"खूप वेळ लागला तुझ घर शोधायला!!"
"होका !! येणा !! "
मनोज घरात येत म्हणाला.
"थोडा उशीरच झाला !!
"बस ना !! मी पाणी आणते तुझ्यासाठी!! "
मनोज समोरच्या सोफ्यावर बसला. सुमेधा पाणी आणायला आत गेली. शेजारच्या टेबलावर सुमेधा आणि रमणचां फोटो तो बघू लागला. तितक्यात सुमेधा जवळ येत म्हणाली.
"२० वर्षां पुर्वीचा आहे फोटो!! "
"हो !! ते कळलं मला !! वय बोलत माणसाचं !! फोटोतही!! "
मनोज पाण्याचा ग्लास घेत म्हणाला.
तितक्यात सायली तिथे आली. आपल्या सरांना समोर पाहून गोंधळली.
"ये ना !! " सुमेधा तिच्याकडे पाहत होती.
"सर तुम्ही माझ्या आईला ओळखता हे माहीतच नव्हतं मला !! काल आई म्हणाली मला !! "
सायली अगदी सहज मनोजला बोलू लागली.
"आम्ही दोघे जुने मित्र आहोत !! आम्ही दोघेच कित्येक वर्षानी भेटतोय !! दोन दशकं गेली आणि पुढे ५ वर्ष !! "
मनोज सायलीकडे पहात बोलला.
तिघे कित्येक वेळ बोलत होते. सोबत जेवणही केलं.जेवण झाल्यानंतर सायली आपल्या खोलीत निघून गेली.सुमेधा आणि मनोज घराच्या अंगणात बसून बोलू लागले.
"खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! " सुमेधा मनोजकडे बघू लागली.
"आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर बर वाटत !! नाहीतर एकांत कधीही गोडच वाटतो !! माझ्यासारखा !! "
सुमेधाला या बोलण्यात कित्येक दुःख साचल्याच जाणवलं.
"खरंय तुझं !! आवडत्या व्यक्तीचा सहवास असेल तर आयुष्य छान वाटतं !! नाहीतर सहवासात असेन तरी मन एकटच राहत !! माझ्यासारखं !! " सुमेधा मनोजकडे एकटक पाहू लागली.
"इतकंच एकटं होत हे मन तर कधी आपल्या लोकांना शोधावं अस वाटल नाही ??"
"मन अडकून पडलं होत!! रक्ताच्या नात्यात !! "
"म्हणजे आजही मी शून्यच आहे !! " मनोज अगदी भरल्या मनाने म्हणाला.
"काही गोष्टी बांधून ठेवतात रे मनोज !! "
"मला त्या गोष्टी ऐकायच्या आहेत !! " मनोज अगदी निर्धाराने बोलला.
सुमेधा कित्येक क्षण अबोल राहिली. मनाशी कित्येक विचार करून ती बोलली लागली.
"तुला ऐकायचे आहे ना!! मी रमण सोबत का लग्न केले ते !! "
मनोज होकारार्थी मान डोलावु लागला.
"तर ऐक मग !! " सुमेधा आता मनमोकळे बोलू लागली.
"तुझ्या आणि माझ्या प्रेमाबद्दल मी जेव्हा घरी सांगितल तेव्हा बाबांचा साफ नकार होता!! तुझ्याकडे मला द्यायला काहीच नाही असं त्यांना वाटत होत!! त्याच काळात रमणच स्थळ माझ्यासाठी आल. मुलगा श्रीमंत आहे !! खूप कमावतो असे वाटून बाबांना स्थळ आवडल.!!" मनोज सगळं मनापासून ऐकत होता.
"पण माझा लग्नाला साफ नकार होता!! बघायचाही कार्यक्रम झाला!! मला बघताच मी रमणला आवडले!!  पण काही दिवसात बाबांनी त्यांना नकार कळवून टाकला!!  रमणला हे खरच वाटेना !! आणि तो मला पाहताच प्रेमात पडला होता!! त्याला हा नकार नको होता!! नंतर कित्येक दिवस तो माझ्या मागे होता!! सुमेधा भरल्या डोळ्यांनी सांगू लागली.
"पुन्हा एक दिवस तो मला बाहेरच भेटला!!  मला बळजबरी करत त्याच्या घरी घेऊन गेला.!! घरी त्यावेळी कोणीच नव्हते !! २ दिवस माझ्यावर अत्याचार करत होता. इकडे आई आणि बाबा दोघेही माझा शोध घेत होते!! पुन्हा घरी आल्यावर सगळी हकीकत मी दोघांनाही सांगितली!! पण समाज !! लाज !! आणि इज्जत !! या गोष्टीत तो माझ्यावरचा बलात्कार माझ्या घरच्यानीच झाकून घेतला!! " मनोजला काय बोलावे कळत नव्हते. तो फक्त ऐकत होता.
"तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम होते!! अशात काही महिने गेले !! माझ्या पोटात बाळं आहे असं कळताच बाबां गप्प झाले !! पण आई मला कित्येक विनवण्या करू लागली. अखेर मी लग्नाला होकार दिला !! "
सुमेधा शांत झाली.
"पण तू त्याचवेळी पोलीसात तक्रार का केली नाहीस ??"
"समाजात काय इज्जत राहील !! माझ्यावर बलात्कार झालाय हे जर बाहेर कळाल तर काय होईल अशा कित्येक भीती मला घरच्यांनी दाखवल्या !! आणि असही रमण लग्नासाठी चालून आलेल स्थळ होतच ना!! अस म्हणून २५  वर्षाचा त्याचा आणि माझा नरक सहवास सुरू झाला!! !!"सुमेधा डोळ्यातले अश्रू पुसून म्हणाली.
"तुला माहितेय मनोज !! एक गोष्ट आजही माझ्या मनात आहे !! स्मरणात आहे !! माझ्यावर नाहीतर माझ्या दिसण्यावर प्रेम करणाऱ्या रमणे मला आपलस केल्या नंतरचे ते हास्य!! आजही मला लक्षात आहे !! "सुमेधा   उठतं म्हणाली.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...