मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर...!!(कथा भाग -३)

"नाती अबोल राहिली की अंतर वाढत जात, योगेश तु नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपल नात नेहमीच अपूर्ण राहिल. माझ्या निर्णया नंतरही तु खूप उदास झालास. माझ्याशी बोलाच नाहीस." प्रिया मनापासून योगेशला बोलत होती.
"त्यावेळी काय बोलावं तेच कळेना. तुझ्या माझ्या मध्ये तुषार कधी आला तेच मला कळले नाही." योगेश मनातल सांगत होता.
"एकदा बोलायचं होतेस माझ्याशी!!"
"त्यावेळी मला राग आला होता,काय बोलावं तेच कळेना!! बरं ,  तुषार कसा आहे आता?" योगेश एकदम बोलला.
"तुषार आता नाहीये!! पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तो निघून गेला!! प्रियाला पुढचे बोलवेना.
  योगेशला काय बोलावे तेच कळेना. तो थोडा अडखळला कित्येक शब्द ओठांवरच विरले.
"आयुष्याच्या संध्याकाळी फक्त साथ मागितली त्याने मला!! आणि मला नाही म्हणता नाही आले रे योगेश!!
प्रिया स्वतःला सावरत म्हणाली.
"पण, पण हे कधी आणि कसे झाले?"
"तुषारच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होते हे मला माहीत होते!! तो मित्र होताच पण आपल्या दोघांच्या नात्यात तिरहाईत म्हणूनच होता. हे मीही मान्य करते !! जेव्हा त्याला कळले की आपल्या आयुष्याची काहीच दिवस राहिले आहेत तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे साथ मागितली!! पण या काळात त्याने फक्त माझ्यावर प्रेमच केलं!" प्रिया आता सगळं काही बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रू मध्ये तुषार.
"पण मी स्वताला हरवून गेलो प्रिया!! तुझ्या आणि तुषारच्या मध्ये मी येऊ नये म्हणून मी निघून गेलो!! पण तुषारच्या बद्दल जे झाले ते खरंच मला माहित न्हवते."
"म्हणूनच म्हटलं होत योगेश तुला मी!! की नात नीट नाहीना चाललं की refill बदलायची नात नाही बदलायच!!"
"पण नात राहिलाच नाहीतर काय करायच?"
"त्या नात्याला आयुष्यभर आपल्या मनात जपत राहायचं!! "
"आणि म्हणूनच तूषारच आणि तुझ नात आजही तु जपते आहेस तर!!"
"हो!!कारण ते नात खूप सुंदर होत. तुषार माझ्या आयुष्यात आला पण जितक्या दिवस होता ते माझे सगळ्यात सुंदर दिवस होते.!!"
"पण यामध्ये मला मी कुठेच दिसत नाही आता प्रिया!!!" योगेश अगदिक होऊन म्हणाला.
"नात्यात अंतर वाढलं की माणूस फक्त स्वत:लाचं शोधतो योगेश तेही स्वतःहच्या मनात नाही. समोरच्या वक्तीच्या मनात!"
कित्येक वेळ योगेश आणि प्रिया मनातल सगळं सांगत होते. आपण अबोल राहिलो म्हणून योगेशला वाईट वाटत होत. आणि आपल्या नात्यात पडलेलं हे अंतर मिटवण्याचे प्रियाचे प्रयत्न. यात coffee नक्कीच गोड झाली होती.
"आईने तुला भेटायला पण बोलावलं आहे!! प्रिया अगदी सहज म्हणाली.
"नक्की येईन!! कित्येक वर्ष झाली काकूंना भेटलोच नाही!!
"मग या रविवारी येशील??"
"प्रयत्न करेन!!"
"प्रयत्न नाही,यायलाच पाहिजेस!! मी वाट पाहीन तुझी.
"ठीक आहे !! नक्की येतो.
त्या भेटीत खूप काही मनाचा भार कमी झाला होता. प्रिया कित्येक दिवसनंतर मनमोकळेपणाने बोलली होती. काही नाती सहज तुटत नसतात. तर काही नाती अगदी सहज जोडली जात असतात. प्रिया आणि योगेशच हे अधुर नात पुन्हा एकदा बोलत होत. त्या रविवारची वाट पाहत होत.
ती ओढ मनात प्रियाच्या आता वेड लावत होती. त्या दिवसापासून ती फक्त रविवारची वाट पाहत होती. योगेशला ही आता प्रियाला भेटायचं होत. आपण नक्कीच चुकलो अस त्याच मन बोलत होत. कुठेतरी त्याच्या मनातही एक तिच्यासाठी लिहिलेल्या ओळी आठवत होत्या, त्या जुन्या वहीच्या पानातून जणु तो सतत त्या गुणगुणत होता..
"सखे असे हे वेड मन का
सैरावैरा फिरते
तुझ्याचसाठी  तुलाच पाहण्या
अधीर होऊन बसते
कधी मनाच्या फांदिवराती
उगाच जाऊन बसते
कधी आठवणीच्या गावाला त्या
उगाच फिरून येते

सखे असे हे वेडे मन का
सैरावैरा फिरते !!!

क्रमशः ...

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...