मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha ||




भाग २

शरीर

आयुष्याची एक पायरी वर चढून आल्यावर आकाश आता नव्या जागी आला होता. त्याच्या शरीरात विविध बदल होत होते. त्याची जाणीव त्याला नकळत होत होती. आजपर्यंत शालेय शिक्षण घेत असताना त्याला याची कधी जाणीवच होत नव्हती. पण आज जणू तो एका वर्तुळातून बाहेर पडल्यासारखं त्याला वाटत होत. आजपर्यंत बाबांच्या हातात बघितलेला फोन स्मार्ट फोन आता आकाशकडे सुद्धा होता. त्या गिफ्टबॉक्स मध्ये एक सिमही त्याला बाबांनी दिलं होत. सिमकार्ड मोबाईलमध्ये इन्सर्ट करताच त्याने आपल्या जवळच्या वहितून दिपकचा घरचा फोन लावला. फोन उचलताच आकाश त्याला बोलू लागला. 

"हॅलो !!"
"हा कोण बोलतंय ??" समोरून दिपकची आई बोलत होती.
"काकू दीपक आहे का ??"
"हो आहे ना!! कोण बोलतंय ??"
"काकू मी आकाश बोलतोय !!"
"देते त्याच्याकडे थांब हा !!"

दिपकची आई फोन बाजूला ठेवून त्याला हाक मारते. आकाशचा फोन आला आहे म्हटल्यावर दीपक धावत फोनकडे आला. 

"हॅलो आकाश !!"
"दिप्या !! ओळख बर मी फोन कशावरून केलाय ??"
"कशावरून म्हणजे ??"
"अरे म्हणजे कुठून केलाय ओळख ??"
"आता तू कुठून करणार फोन घरूनच ना !!"
"नाही दिप्या मी मोबाईलवरून फोन करतोय !! आणि तेही माझ्या स्वतः च्या !!"
"काय??"
"होय तर !! "
"ये आक्या उगाच टेपा नको मारू !! "
"अरे खरंच तर !! बाबांनी गिफ्ट दिलाय !!! आजच !! पहिला फोन तुला लावतोय !! "
"असही लॅन्डलाईन वरून काही कळतं नाही !! उद्या भेटुयात आपल्या अड्ड्यावर मग कळेलच खर खर !!आणि जर खर असेल तर पार्टी फिक्स मग !!"
"अरे दिली !! "
"मिसळ पावाची ??"
"अरे दिली !! "
"बरं बरं !! उद्या भेटुयात मग संध्याकाळी सात वाजता !!"
"हो नक्की भेटुयात !! ठेवतो आता फोन !! "

आकाश दिपकशी बोलणं झाल्यावर फोन ठेवतो. आणि मोबाईलमध्ये दुसरे फिचर्स पाहत बसतो. इंटरनेटवर जाऊन मोबाईलमध्ये विविध गेम्स डाऊनलोड करतो. पाहता पाहता आकाश मोबाइलच्या दुनियेत अक्षरशः बुडून जातो. बाहेरून आई त्याला जेवणासाठी बोलावते. पण तरीही तो काहीच प्रतिसाद देत नाही. हे पाहून आई आकाशच्या खोलीत जाते. समोर पाहते तर सगळं सामान असताव्यस्त पडून होत. आकाशला आपली खोली अशी कधीच आवडत नसे. तो सगळं सामान नीटनेटके जागच्या जागी ठेवत असे. आईला ही गोष्ट चटकन लक्षात आली. ती खोलीत आली आहे हे सुद्धा आकाशला लक्षात आल नाही. आई पटपट सगळी खोली आवरायला लागते. आवरत असतानाच ती त्याच्याकडे पाहत बोलते,
"आकाश !! "
आकाश काहीच बोलत नाही. तो मोबाईल मध्ये गेम्स खेळण्यात दंग झालेला असतो. आई पुन्हा हाक मारते,
"आकाश !! मी काय म्हणते ते तरी ऐक !!"
"हा !! " आकाश तुटक बोलतो. 
"जेवायचं आहे की नाही तुला ?? का मोबाईलने पोट भरणार आहे तुझं ??"
"आलोच आई तू जा !! आलोच मी जस्ट संपतच आली आहे गेम !!"
 
आई आकाशकडे पाहत खोलीतून बाहेर जाते. समोर डायनिंग टेबलवर बाबा केव्हाच जेवणासाठी येऊन बसलेले होते. आईकडे पाहत त्यांनी विचारलं,
"साधना,  आकाश ??"
"मोबाईलवर गेम खेळतोय !! जस्ट संपतच आलीये म्हणतोय !!"
"ओह ह !! साधना आपल्या वेळी अस काही नसायचं ना !! म्हणजे बघ ना !! मी दहावी पास झालो होतो तेव्हा बाबा मिलमध्ये हमाली करत होते !! रिझल्ट घेऊन जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा नेमक मी काय पास झालोय हेही त्यांना कळत नव्हतं. त्यांना आनंद मात्र खूप झाला होता. खिशातले पाच रुपये काढून माझ्या हातात देत त्यांनी समोरच्या हॉटेलात जाऊन मित्रासोबत वडापाव खा म्हटले होते. नंतर पुढचा संपूर्ण महिना ते बाहेर चहा प्यायले नव्हते. माहितेय का ?? त्या मला दिलेल्या पाच रुपयाचा आपल्या खर्चात मेळ घालण्यासाठी. नंतर पायावर डोकं टेकवल तेव्हा शिकून खूप मोठा हो पोरा म्हणून मला आशीर्वाद दिला होता. तो पाठीवरचा स्पर्श अजूनही जाणवतो मला !! " बाबा क्षणभर आठवणींनी गहिवरले. 
"खरंच किती सुंदर होत ना आपलं बालपण !! " 
"हो ना !! थांब आकाशला घेऊनच येतो बरोबर !! "
बाबा खुर्चीवरून उठत म्हणाले. तडक आकाशच्या खोलीत गेले. मोबाईलमध्ये गुंग असलेल्या आकाशला हे कळलं सुद्धा नाही. बाबांनी लगेच त्याच्या हातातला मोबाईल घेतला. आकाशला लगेच त्याचा राग आला आणि तो जवळजवळ खेक्स्तच बोलला,
"बाबा !! मोबाइल द्या बरं !! कळत नाही का तुम्हाला !! "
"आधी जेवायला चल !! "
"मला भूक नाही !!मी करतो जेवण थोड्या वेळाने !!"
"अजिबात नाही !! सकाळपासून काय खाल्लंय सांग बरं !! आणि भूक कशी नाही !!"
"नाही तर नाही ना भूक !! आणि मी जेवतो म्हणलो ना नंतर !!"
"आपल्यात रात्रीच जेवण नेहमी आपण सगळे मिळूनच करतो ना !! चल !! "

आकाश नाईलाजाने खोलीतून  बाहेर पडला. बाबांनी जाता जाता त्याच्या हातात मोबाईल दिला. डायनिंग टेबलवर बसल्यावरही  जेवणास सुरुवात झाली तरी आकाशच सगळं लक्ष मोबाईलमध्येच होत. बाबांच्या हे लक्षात आलं, त्यांनी विषय काढत आकाशला बोलायला सुरुवात केली. 

"आकाश !! आता हे सत्कार दहावीचे मार्क्स हे सगळं ठीक आहे !! पण आता पुढचा काही प्लॅन आहे की नाही !!"
"म्हणजे !!" आकाश बाबांकडे पाहत म्हणाला. 
"म्हणजे !! आकरावीला कुठे एडमिशन घ्यायचं !!कोणती फॅकल्टी निवडायची !! याचा काही विचार केला आहेस की नाही!"
" बाबा त्याला अजून खूप वेळ आहे हो !! " 
"हो पण तरीही आपली तयारी हवीच ना !!"
"बघुयात !! आता नको हा विषय !! "
आकाश खुर्चीवरून उठला. त्याला उठलेला पाहून आई मध्येच बोलते,
"अरे जेवण तरी कर पूर्ण !!"
"झालंय माझं !! 

एवढं बोलून आकाश खोलीत निघून जातो. आई आणि बाबा एकमेकांस क्षणभर पाहत राहतात,

"आपण मोबाईल देऊन काही चूक तरी नाहीना केली ??"
"मला तरी नाही वाटत !! माणसानं काळाप्रमाणे बदलत जाव अस मला वाटत !! आता आपल्यावेळी हे आपल्याला मिळू शकलं नाही म्हणून आपण आपल्या मुलांनाही तसच करावं हे मला काही पटत नाही !! "
"पण या मोबाईलमुळे त्याच वागणं क्षणात बदलून गेलं !! "
"जास्त दिवस नाही व्हायचं हे अस !! कस असत नवीन आहेना त्यामुळे उत्सुकता असते , कौतुक असतं ! "
"जास्त दिवस टिकू पण नये हे !! आता पाहता पाहता बारावीला जाईल तो !! मला तर आत्तापासूनच त्याच्या बारावीची काळजी वाटू लागली आहे !!"
"साधना नको एवढा विचार करुस सगळं काही नीट होईल."
"होप सो !!"

आई बाबा नंतर कित्येक वेळ आकाशबद्दल बोलत बसले. त्यांना त्याच्या भविष्याची चिंता वाटत होती. बाबा या सगळ्या गोष्टींना जास्त मनावर घेत नव्हते. पण आईच्या मनात चिंता वाढत होती. ती कित्येक वेळ आपल्या अंथरुणावर पडून विचार करत होती. आणि विचार करता करता केव्हा झोपी गेली हे तिलाही कळलं नाही. 

पण सकाळच्या वेळी आजही सगळं सुरळीत चालू होत. बाबा लवकर उठून योगासने करत होते. आई घराची आवराआवर करत होती. अंगण स्वच्छ करत होती. पण आकाश मात्र कुठेच नव्हता. आईने न राहवून विचारलं,
"काय हो आकाश आला नाही आज योगासने करायला??"
बाबा आईकडे पाहत म्हणाले,
"मीच उठवलं नाही त्याला !! म्हटलं दहावीचं संपूर्ण वर्ष न चुकता रात्री लवकर झोपून पहाटे लवकर अभ्यास करण्यासाठी उठायचा ! आज देऊयात म्हटलं सुट !!"
 " कशाला हवी सूट ?? आपण का कधी घेतो सुट्टी ??"
"जाऊदे ग !! लहान आहे तो !!"
"म्हणे लहान !! " 

आई जरा रागातच म्हणाली. आणि आपल्या कामाला लागली. बाबांनी योगासने झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि कामाला जाण्यासाठी आवरू लागले. पाहता पाहता वेळ जाऊ लागली. बाबा ऑफीसला जाण्यासाठी निघू लागले तेवढ्यात त्यांनी विचारलं ,
"अजून नाही उठला ??"
"नाही !!"
"उठवतोच त्याला थांब !"
बाबा आकाशच्या खोलीकडे जात म्हणाले. 
"कशाला ?? झोपू द्याना अजून !! नको ते लाड !!"
"साधना तूपण ना !! "
बाबा आकाशच्या खोलीच्या दरवाज्यावर थाप मारू लागले,
"आकाश !! ये आकाश !! अरे उठ आता !! किती वेळ झोपायच !! "
बाबांनी खूप वेळ हाक मारल्यानंतर आकाशने दरवाजा उघडला. आकाशकडे पाहताच त्यांनी विचारलं,
"काय रे ?? डोळे का एवढे लाल झालेत ?? रात्रभर जागरण केलंस की काय ??"
आकाश रात्रभर मोबाईलवर गेम्स खेळत बसला होता त्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. पण उगाच तो बाबांपासून हे लपवण्याचा प्रयत्न करत होता. 
"चल पटकन बाहेर !! नाष्टा कर !! आवरून घे !! "
"हो बाबा !!" 
आणि अचानक त्याला मोबाईलची आठवण येते आणि स्वतःलाच तो म्हणतो,
मोबाईल ??"
आणि मोबाईल घेण्यासाठी आकाश धावतच बेडजवळ जातो. बाबा तसेच समोर उभे होते , ते त्याला पाहून म्हणतात,
"मी जातोय आकाश ऑफिसला !! बाय !!"
आकाश मोबाईल शोधण्यात दंग झाला. त्याला बाबा कधी निघून गेले याच भानही राहील नाही. मोबाईल सापडताच तो स्वतःच  पुटपुटला
"अरे यार मोबाईल तर स्विच ऑफ झालाय !! पटकन चार्जिंगला लावतो आणि तेवढ्यात सकाळच सगळं आवरून घेतो. 

मोबाईल चार्जिंग करायला ठेवून आकाश खोलीतून बाहेर गेला. जणू मोबाइलच्या रेंज मध्येच आता तो राहू लागला. आकाश मोबाइलच्या वर्तुळात अडकत जाऊ लागला. 

क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...