मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||



भाग ३

बदल

बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली ,
"आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??"
"आई !! काहीही काय ? "
" मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"

आकाश काही न बोलताच खोलीत निघून गेला. आई पुढे काहीच बोलली नाही. तिच्या मनात सतत एकच गोष्ट येत होती. आपण आकाशला मोबाईल देऊन खरंच चूक तर नाहीना केली ?? पण पुन्हा ती आपल्या मनाला समजावून सांगत होती. की नाही साधना मोबाईल ही काळाची गरज आहे . आज जर मी आकाशला यापासून दूर ठेवलं तर तो कदाचित या जगापासून दूर जाईल नको साधना उगाच विचार करू नकोस . काहीही होत नाही. 
तेवढ्यात खोलीतून आकाशचा मोठ्याने आवाज आला. साधना आकाशची आई धावत खोलीकडे गेली, पाहते तर आकाश मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात मग्न आपण जिंकलो याचा आनंद त्याला इतका झाला की त्याला तो लपवताच आला नाही. तो मोठ्याने ओरडत होता. चित्रविचित्र हावभाव करत होता. 
अचानक मोबाईलची रिंग वाजते आकाश पटकन फोन उचलतो. पलीकडून दीपक त्याचा मित्र बोलत होता.
"हॅलो , आकाश दिप्या बोलतोय !! "
"बोल ना दिप्या !! का फोन केला !! आन केला ते केला चुकीच्या पॉईंटला केला. "
"का रे भाई !! बिझी होता का कुठ !!" दिप्या मिश्किल हसत म्हणाला. 
"तुझ्या दोस्तान २६ लेव्हल पूर्ण केली ना भाऊ !!"
"काय म्हणतो !! खरंच ??"
"हा मग !! रात्रभर खेळून पूर्ण केली !! "
"लकी आहेस !! नाहीतर इथ आम्हाला दोन मिनट सुद्धा फोनला बाबा हात लावू देत नाहीत !!"
"आता काय लहान आहेस का रे दिप्या तू?? आपला आपला वेगळा मोबाईल पाहिजे आता !! "
"तुझं बरंय रे !! तुझ्या बाबांनी तुला गिफ्ट केलाय !! इथ समोरून घेऊन द्या म्हटलं तर बघू नंतर म्हणाले."
"बरं ते जाऊ दे !! फोन का केला ते सांग आता !!"
हे सगळं बाहेरून पाहणारी आई आकाशला आपल्याच जगात हरवून जाताना पाहत होती. तिला त्याच्या भोवती एका वेगळ्याच जगाची जाणीव व्हायला लागली होती. ती तिथून बाजूला आली. आणि आपल्या कामाला लागली. आकाश आणि दिपकच बोलणं चालूच होत. 
"आज भेटायचं ठरलंय सात वाजता लक्षात आहे ना ??"
"अरे भाई !! बरं झालं आठवण करून दिलीस !! पटकन मोबाईल मध्ये रिमाईंडर सेट करून ठेवतो. "
"सकाळी सहाच्या क्लासला आलार्म न लावता लवकर उठणारे साहेब आता रीमाइंडर लावणार !! छान !!"
"गप रे दिप्या !! येतो मी नक्की !! आणि बाकीच्यांना पण सांग वेळेवर यायला. "
"हो रे ! नक्की !! बरं ठेवतो आता फोन !!"
"ओके !!"

आकाश मोबाईल मध्ये रिमाइंडर सेट करतो. आणि पुन्हा मोबाईल मध्ये मग्न होतो. जो आकाश प्रत्येक आपलं काम वेळेवर पूर्ण करत होता. त्याला आता वेळेचं भान राहावं म्हणून रिमाइंडर ची गरज जाणवू लागली होती. त्याच्या गरजा आता बदलू लागल्या होत्या. ज्या जगात तो आता वावरत होता तिथे सगळंच आभासी होत. तो त्या आभासी जगातच वावरत होता, फिरत होता, बोलत होता व्यक्त होत होता आणि लोकांशी भेटतही होता, गेम्स च्या जगात कधी जिंकत होता, कधी पराभव पत्करावा लागत होता, तर कधी त्यामुळे अचानक हसत ,तर कधी उदास होत होता. जणू त्या वर्तुळात त्याला सगळं जग मिळालं होत. आणि त्या जगातूनच त्याला संध्याकाळी मित्रांना भेटण्याची आठवण करून देत होता तो त्याचा मोबाईल.

आकाश पटपट सगळं आवरून निघाला. आईकडे पाहून म्हणाला,
"आई सगळे मित्र आज भेटणार आहोत तिकडेच जातोय !! यायला थोडा उशीर होईल !!"
"उगाच उशीर करू नकोस !! लवकर ये !! आणि तो हेडफोन लावून नको जाऊस !! त्यामुळे काही ऐकू येत नाही बाहेरच !! आजूबाजूला कोणतं वाहन येतजात काही कळतं नाही त्यामुळे !! "
"आई कुठल्या जगात वावरते आहेस तू !! हल्ली हे सगळं कॉमन आहे !! आणि समज मी बसमध्ये गर्दीत आहे आणि अचानक तुझा कॉल आला तर कसा उचलायचा ??"
आई निरुत्तरीत राहिली. तिला पुढे काय बोलावं तेच कळलं नाही. मात्र तिच्या मनात एक प्रश्न मात्र निर्माण करून गेला की हेडफोन खरतर मानवाला चांगले की वाईट ?? पण याची उत्तर तिच्या मनात निरुत्तरीत राहिली. मात्र आकाशला बाहेर जाताना पाहून तिच्या मनात असंख्य विचार येऊन गेले. 

"कालपरवा पर्यंत कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मला विचारणारा आकाश आता किती बदलून गेला आहे नाही , मुल मोठी होतात पण ते क्षणात बदलतात त्याचा अनुभव आज मला येतोय. आई वहिला कोणतं कव्हर लावू?, आज कोणता शर्ट घालू ?, आई मी बाहेर मित्रात खेळायला जाऊ? म्हणून विचारणारा आकाश आता मोठा झाला नाही!! आता तो कॉलेजला जाईल नव्या जगाची त्याला ओळख होईल, पण या जगात आकाश मला ओळखेन का ?? की विसरून जाईल मला , की आम्ही आता जुन्या विचारांचे झालो म्हणून. काही काही कळत नाही.  आम्हीही तरुणाईच्या जगात असेच काहीसे पाऊल ठेवले , पण जग आता बदलून गेले आहे चिंता फक्त याचीच वाटते. बाकी माझा आकाश हुशार आहे तो नक्कीच याची काळजी घेईल. " आई कित्येक वेळ तिथेच उभा राहून आकाशच्या विचारात हरवून गेली होती. 

नव्या जगात मात्र आकाश बेधुंद होऊन फिरत होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला खूप काही खुणावत होते. आकाश पंख पसरून आभाळाकडे पाहत होता,

क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...