मुख्य सामग्रीवर वगळा

शर्यत || कथा भाग ५ || Sharyat katha bhag 5 ||




कथा भाग ५

सखा भरभर घराकडे निघाला. त्याला कधी एकदा सगळं शांताला सांगेन अस झाल होतं.
"शांता ऐकून खुषच होईल !! साहेबांनी एवढा मोठा विश्वास दाखवला माझ्यावर !!! एकदा शर्यत जिंकलो की मग सगळं काही नीट होईल !! शांता मी दोघं सुखान राहू. चांगलं छप्पर असलेलं घर येईल , सकाळ संध्याकाळ जेवण मिळलं. शांताला गल्लो गल्ली जाऊन कामासाठी भिक मागायची वेळच येणार नाही. सगळं काही चांगलं होईल. " सखा चालत चालत घरासमोर आला.

"शांता !! शांता !! कुठंय तू ??" 
सख्याला शांता कुठच दिसत नव्हती. तो सगळीकडे तिला पाहू लागला. घराच्या मागे समोर तिला शोधू लागला. त्याची नजर तिला सगळीकड शोधत होती.अचानक सख्याला शांता झाडाच्या जवळ पडलेली दिसली. धावतच तो तिच्याकडे गेला. तिचे डोळे मिटलेले होते. सखा तिला उठवू लागला. 
"शांता !! उठ !! उठ शांता !! काय झालंय तुला ?? " 
शांता डोळे उघडतं नव्हती. तिला कसबस उचलत सखा वैद्यांनकडे घेऊन जाऊ लागला. धावत धावत तो वैद्यांच घर पाहू लागला. त्याचा जीव कासावीस झाला. शांताला अश्या अवस्थेत पाहून त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तिला सारखं उठवण्याचा प्रयत्न करतं होता. रखडत रखडत तो वैद्यांच्या घराजवळ आला. समोरच्या अंगणात शांताला ठेवून तो वैद्यांना बोलावू लागला.

"वैद्यबुवा !! वैद्यबुवा !! " 
दोन तीन वेळा हाक मारल्या नंतर वैद्यबुवा खोलीतून बाहेर आले. त्यांना पाहताच सखा त्यांच्या जवळ गेला. त्यांना हात जोडून बोलू लागला.
"वैद्यबुवा माझ्या बायकोला काय झालंय बघा !! ती डोळे उघडतं नाही !! काही बोलत नाही !!"
वैद्यबुवा सख्याला केसांपासून नखापर्यंत नीट पाहतात आणि म्हणतात,
"कुठल्या वस्तीवरून आला ??"
"इथ सुतारवाडीवरून आलोय !!"
"बरं बरं !!पैसे आहेत ना इलाज करायला ??" 
सखा क्षणभर शांत बसला आणि म्हणाला. 
"किती लागतील?? " 
" दहा रुपये लागतील !! आणि दवादारूचे वेगळे !!" 
"दहा रुपये !! एवढे तर नाहीत माझ्याकडे!! " सखा नाराज होऊन म्हणाला. 
"मग कसं रे !! " वैद्यबुवा सख्याकड पाहत म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला 
"बुवा तुमचे पैसे नक्की देतो मी, नाहीतर मला काही काम सांगा ते करून देतो त्याबदल्यात !!"
"अस !! बरं !! जा मग पलिकडच्या विहिरीतून पाणी या कळशित घेऊन ये आणि या हौदात भर !! सगळा हौद भरला की झाले पैसे !!"
"बरं बुवा !! पण आधी माझ्या बायकोला बघा तरी !!!"

बुवा शांताला तपासू लागले , काही औषधे तिला देऊ लागले. सखा शांत सगळे पाहत होता. 

"काय काम करती रे बायको तुझी ??" वैद्यबुवा सखाकडे पाहत म्हणाले.
"पडलं ती काम करती माझी बायको!! कष्टाची आहे खूप !!"
"तेच कष्ट भोवलय तिला !! "
"म्हणजे ??"
"अशक्तपणा आलाय तिला !! त्यामूळे चक्कर येऊन पडली !! औषध दिलंय मी, एका तासात येईल शुद्धीवर !!" 
"लई उपकार झाले बुवा !!" सखा बुवाकडे पाहत म्हणाला.
"उपकार वैगेरे काही नाही !! माझं कामच आहे हे !! आता ती शुद्धीवर येई पर्यंत तू हौद भरून घे !!"
" हो !! लगेच करतो काम !!"

सखा समोर ठेवलेली कळशी घेऊन विहिरकड गेला. भराभर त्या विहिरीतून पाणी उपसू लागला. वैद्यबुवाची बायको घरातून मिश्किल हसत सखाकडे पाहत होती. जणू त्याला त्याच्या गरिबीची जाणीव करून देत होती. सखा राहून राहून बेशुद्ध पडलेल्या शांताकडे पाहत होता. तिच्या विचारात तिला जणू बोलत होता.

"शांता !! माझ्या आयुष्याची जणू ती, श्वास आहे असच मला वाटतं!! तिच्या या अशा बेशुद्ध पडण्यान, मला आज एका क्षणात या निर्दयी जगात एकटं पडल्याची जाणीव होऊन गेली. तिचे ते मिटलेले डोळे मला खूप काही सांगून गेले. तिच्या शिवाय हे जग माझं नाही !!! सखा प्रत्येक कळशी हौदात ओतत असताना त्याला पुन्हा ते पाणी कमी झाल्यासारख वाटत होतं. तो भरत होता पण तरीही ते भरत नाही याची जाणीव त्याला वेळोवेळी होत होती. जणू तो हौद त्याला सांगत होता ,आयुष्याच ही असच आहे सखा, तू कितीही भरण्याचा प्रयत्न केलास तरी तो लवकर भरतं नाहीच !! आणि जेव्हा भरेन तेव्हा सार काही संपलेल असेल!!" सखा खूप वेळ पाणी भरत राहिला. 

थोड्या वेळातच शांताला जाग आली. ती कुतूहलाने सगळीकडे पाहू लागली. समोर बसलेल्या वैद्यबुवांकडे पाहत ती म्हणाली.

"कोण तुम्ही ?? आणि मी इथे कशी ??"
बाई तू बेशुद्ध पडली होतीस तुझ्या घरी !! तुझा नवरा तुला इथे घेऊन आलाय !!"
"कुठे आहेत ते ??" 
"तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!"
शांताला हे कळताच तिला रडू कोसळलं. आपल्या पदराला मुठीत आवळून आपला हुंदका तिने दाबला आणि पटकन उठली, तरातरा चालत ती विहीर जवळ आली.
"कशासाठी एवढी कष्ट ?? मी जगावं म्हणून ना ?? पण तुमच्या जीवाचा तरी विचार करा !!" शांता सखाच्या जवळची कळशी घेत म्हणाली.
"शांता मग करायचं तरी कोणासाठी सांग ना ?? हे शरीर देवाने एवढं टिकवल ते उगाच नाही !! जा बस तिथे माझं झालाच आहे !! " 
" नाही ! मीपण मदत करणार तुम्हाला !!" 
"नाही म्हटलं ना !! जा !!"

शांता भरल्या डोळ्यांनी साखकडे पाहत राहिली. थोड्या वेळात सखा काम पूर्ण करून आला. दोघेही घरी जायला निघाले.
"बाई !! शुद्ध जरी आली तरी लगेच काम करत बसू नको !! जरा आराम कर !! वेळच्या वेळी जेवण कर !! नाहीतर आज नुसती चक्कर आली!! उद्या जीवावर बेतू शकतं बरं !! "  वैद्यबुवा जाता जाता सखा आणि शांताकडे पाहून म्हणाले.

दोघेही तसेच हळू हळू चालत घरी आले.सखा आता शांताची काळजी घेऊ लागला.घरी येताच शांता अंथरुणात पडून राहिली. सखा घरातील सगळी कामं करू लागला. थोड्या वेळाने तिला बरं वाटतंय हे पाहून त्याने साहेबांचा विषय काढला. त्याने जे काही घडलं ते सगळं सांगितलं. 

"हजार रुपये ?? आणि राहायला घ. .ऽऽ. र ??" शांताला बोलता बोलता खोकल्याची उबळ आली. सखा लगेच पाणी घ्यायला धावला. 
पाण्याचा तांब्या तिच्याकडे देत म्हणाला.
"हो तर !! साहेब म्हणाले उद्यापासून ये कामाला!!"
"मग काय ठरवलंय तुम्ही ??"
"ठरवायचं काय त्यात !! शांता मी शर्यतीत धावणार !! आणि जिंकणारच !! बघ तू !! हे घर !! हे फाटके कपडे सगळं काही बदलणार !! खिशात पैसा येणार !! तुला आता कोणाच्या घरची चाकरी करायची वेळ येणार नाही !! दहा रुपयांनसाठी मला कोणाकडे पाणी भरायची वेळ येणार नाही !! आपले दिवस बदलणारं शांता !! आपले दिवस बदलणारं !!" सख्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली. 
"हो बदलतील !! तुम्ही शर्यत जिंकणार हे माहितेय मला !!"  शांता आता दबक्या आवाजात बोलत होती.

दोघेही पोटभर जेवले. खूप वेळ पुढं काय करायचं याची चर्चा करत बसले. भविष्याला वर्तमानात जगत बसले. थोड्या वेळात शांता झोपी गेली. तिला पाहून सख्याला समाधान वाटत होत. तिच्याकडे पाहत तो आपली सगळी कष्ट विसरून गेला होता.

"माझ्यासारख्या दरिद्री माणसा सोबत कसा काय संसार केला असेन हे या शांतालाच माहीत. तिच्याकडे पाहून खरंच मला अभिमान वाटतो.ही गरिबी काही जन्मजात नाही. आपल्याच लोकांनी ज्यावेळी नाती तोडली , तेही रक्ताच्या, तेव्हा मिळालेली ही गरिबी आहे. शांताच माहेर म्हणजे लक्ष्मीचं घर,  लक्ष्मी पाणी भरते म्हणातात ते तिथे जाणवत. पण माझ्यासाठी , माझ्या स्वाभिमानासाठी तिन्ही सगळ्यांची भीक नाकारली. मी एकदाच म्हणालो होतो माझ्या मुलांना , जेव्हा त्यांनी मला घरातून बाहेर काढल तेव्हा , या मनगटात ताकद आहे तोपर्यंत मी स्वाभिमानाने जगेन , ज्या दिवशी ती ताकद संपली तो अंत माझा !! आणि ती तो स्वाभिमान अजूनही सांभाळत आहे ती , पडेल ते काम करेन पण फुकटची एक दमडी घेणार नाही कोणाची!!"

सखा रात्रभर शांताची काळजी घेत राहिला. सकाळ झाली तेव्हा तिला थोड बरं वाटू लागलं. पण अंथरुणातून उठायची काही ताकद तिला येत नव्हती. अशात सखा पटापट आवरून लागला. शांताला काय हवं नको विचारू लागला. त्याला पुन्हा कामावर जायची ओढ लागली होती. 

क्रमशः

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...