मुख्य सामग्रीवर वगळा

विरोध || कथा भाग २ ||मराठी रंजक कथा ||

 


कथा भाग २

आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.

 विचारात रात्र अशीच सरून गेली. उगवतीच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली. सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला. सगळी आवरा आवर करत असताना. मोबाईलची मेसेज टोन वाजते. अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो.

" अनिकेत !! तुझ ते काल मला अचानक भेटन खरंच खूप छान होत. तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर, पुन्हा मी तुला खूप शोधलं, पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस!! पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे !! मला तुला पुन्हा भेटायचं आहे!! भेटशील ??"

अनिकेत मेसेज वाचून क्षणभर विचारात पडतो. काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो.पुन्हा मेसेज टोन वाजते.अनिकेत पुन्हा मेसेज वाचू लागतो.

"तुझा राग मी समजू शकते. पण त्याच कारण तरी काय हे ऐकुन घेशील का??मला पुन्हा भेटशील का ??" 

अनिकेत पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून देतो. तेवढ्यात श्वेता त्याच्या जवळ येते. हातातील नाश्ता त्याला देत म्हणते.

"काय झालं ?? आज एवढा उशीर का होतोय तुला ??बरा आहेस ना ??" 
"मी बरा आहे !! मला काय होणार आहे !! " अनिकेत हसत बोलतो. तेवढ्यात शेजारी ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजतो.
"काय रे !! कोणाचा मेसेज येतोय !! बघत का नाहीयेस !!" 
"कंपनीचा आहे !! जाऊदे चल मी निघतो !!"

  श्वेताला खोट बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये सुद्धा त्याला काय करावं काहीच कळत नाही. कित्येक मेसेज येऊन गेल्यानंतर प्रिती त्याला फोन करते. कित्येक वेळा फोन वाजून गेल्यानंतर अखेर अनिकेत फोन उचलतो.

"हॅलो!!"
"प्रिती बोलते !!"
अनिकेत काहीच बोलत नाही.
"अनिकेत मला तुला भेटायचं आहे !!तू अस का करतोयस ??"
"पण मला तुला भेटायचं नाहीये आता !!" अनिकेत रागात येऊन बोलतो.
"आणि प्लीज !! हे मेसेजेस करणं !! बंद कर!!"
"एवढा राग आहे माझ्याबद्दल ??" 
"राग नाहीये !! पण आता तू ती प्रिती नाहीयेस आणि मी तो अनिकेत पण राहिलो नाहीये !!"
"हे बघ अनिकेत एवढा माझा द्वेष करू नकोस !! Please एकदा भेट !! तिथेच !आज संध्याकाळी ! "
"ठीक आहे !! अगदी शेवटचं !!"

अनिकेत भेटण्याचं ठरवून मेसेजेस आणि कॉल्स मधून सुटका करून घेतोय अस त्याला वाटलं. आयुष्याची कित्येक वर्षे सरून गेल्या नंतर काय बोलायचं आहे, पण ती पुन्हा का आयुष्यात आली या विचाराने त्याला पुरत हैराण करून सोडलं होत.बघता बघता संध्याकाळ झाली, अनिकेत प्रितीला भेटायला जातो. तेव्हा ती तिथे त्याच्या आधीच येऊन बसलेली असते. दोघेही समोरासमोर कित्येक क्षण गप्प बसतात आणि अखेर प्रितीच बोलायल सुरुवात करते.

"भेटायला आलास याचा खूप आनंद झाला !!"
अनिकेत अगदी थोड हसू चेहऱ्यावर आणून बोलतो.
"मलाही झाला असता तर बर झालं असत !!"
प्रिती काहीच बोलत नाही. क्षणभर शांत राहते आणि बोलते.
"दहा वर्ष लोटली या सगळ्या गोष्टींना !! राग आजही आहे ??"
अनिकेत फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
"आजही तितकच प्रेम करतोस माझ्यावर ??" प्रिती अगदिक होऊन विचारते .
"नाही !! " अनिकेत क्षणात बोलतो.
"श्वेता!! तुझी बोयको तुम्ही मजेत आहात!! पाहून छान वाटलं !!"
अनिकेत फक्त ऐकत राहतो.
"या दहा वर्षात कित्येक वेळा तुझी आठवण मला आली !! पण मी खूप शोधूनही मला तू सापडला नाहीस !!"
"सूरज प्रेम करत नाही तुझ्यावर ??" अनिकेत तिला विचारतो.
"करतो रे !! खूप करतो !! पण तुझी आठवण काही गेली नाही !!"
"एवढंच प्रेम होत तर जायचंच नव्हतं ना मला सोडून मग !! "
"ती माझी चूक होती !!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.
"नाही प्रिती !! चूक नाही !! तो तू विचार करून केलेला निर्णय होता!! " अनिकेत आता मोकळेपणाने बोलू लागला.
"म्हणजे??" प्रिती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
"म्हणजे !! मी भिकारी आणि तो सूरज श्रीमंत !! मी देऊन देऊन काय दिलं असतं !! पण सुरजचा पैसा , संपत्ती याची भुरळ पडली तुला!!" 
"काय बोलतोयस तू अनिकेत !! अस काही नाहीये !! "
"मग कोणताही विरोध नसताना !! सर्वांची आपल्या नात्याला संमती असतानाही अचानक तू त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का केलास ?? आणि जाऊ देना !! मला या विषयात आता पडायचं नाहीच !! मी निघतो !!" अनिकेत उठून निघतो.
"थांब अनिकेत !! आता मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाहीये !!"प्रिती त्याला अडवत म्हणते.
"आता खूप उशीर झालाय प्रिती !!!bye!!" अनिकेत निघून जातो.

 अनिकेत गेल्यानंतर कित्येक वेळ प्रिती तिथेच बसून राहते. तिला तिचेच विचार छळु लागतात. 

"अनिकेत बोलला त्यात काय चूक आहे प्रिती ! तू नात्याचा व्यवहार केलास!! तू पाहिलंस नात श्रीमंत आहे की गरीब !!तू मन कधी ओळखुच शकली नाहीस !! हो प्रिती तू चुकली आहेस !! तुझ्या आयुष्यात पैसा खूप आला !! पण प्रेम ?? नाहीना !! बघ !! अनिकेतने पुन्हा प्रेम केलं !! त्याच्या आयुष्यात श्वेता आली !! त्याच्यावर ती खूप प्रेम करते !! तुझ काय ?? फक्त पैश्यात नाती मोजणारा नवरा ?? की एक उजाड आयुष्य ?? प्रेम कुठे आहे तुझ प्रिती !! ते बघ तुझ खर प्रेम तर तुझ्यापासून दूर जातंय!! " अचानक प्रिती भानावर येते आणि स्वतःला बोलते.

"नाही !! त्याला मी जाऊ देणार नाही !! तो माझा आहे !! तो माझा आहे !!"

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...