मुख्य सामग्रीवर वगळा

विरोध || कथा भाग ३ || हृदयस्पर्शी कथा ||



कथा भाग ३

 कित्येक वेळ तिथे बसल्या नंतर प्रिती घरी जायला निघाली. तिच्या मनात कित्येक विचारांचे आभाळ होते. डोळ्यात अश्रू होते आणि तिला सोडून जाणारा अनिकेत दिसत होता. आज खरंच प्रेमाने त्या पैशाच्या नात्याला कमजोर केलं याची जाणीव तिला झाली. रात्र खूप झाली, ती आता तिच्या घरी पोहोचली. सूरज तिची वाटचं पाहत बसलेला होता. 

प्रिती दरवाजा उघडून आत येते. समोर सूरज सोफ्यावर बसला होता. तिला पाहून थोड रागातच तो विचारतो.

"कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ??"
स्वतःला सावरतच प्रिती बोलते.
"मैत्रिणीकडे गेले होते!!!"
"यायला उशीर का झाला ??"
"झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते.
"कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतल भेटायला गेली होतीस ना ??"
प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
"हो!! मी त्यालाच भेटायला गेले होते.!! अजुन काही ??" 
"कशाला पण !! काल भेट झाली होती ना !!"
"मला भेटायचं होत त्याला !! मला भेटावसं वाटत त्याला !!" 
"सरळ सरळ सांगना प्रिती !! की आजही प्रेम करतेस तू त्याच्यावर !!" 
"हो !! करते मी त्याच्यावर प्रेम !!"
"माझ्या प्रेमाला तुझ्या मनात काहीच किंमत नाही !!" सूरज मध्येच विचारतो.
प्रिती गप्प राहिली, पण सूरज पुढे बोलला.
"तुला प्रिती तुझ प्रेम ही सोडावस वाटलं नाही !! आणि माझ्याकडे मिळालेलं सुखही !! स्वार्थी आहेस तू प्रिती !! स्वार्थी !!"

प्रिती काहीच न बोलता खोलीत निघून जाते. सूरज आता थोडा शांत होतो. शेजारीच ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढतो आणि पेटवून ओढू लागतो. असंख्य विचारांच्या समुद्रात बुडून जातो. सगळं काही अंधुक होत.

" प्रिती ! ज्यावेळी पहिल्यांदा माझ्याकडे आली तेव्हा खरंच मला वाटलं जगातला सगळ्यात नशीबवान माणूस मी आहे !! मला माझं प्रेम मिळालं! पण ते कस?? तर या पैसा, संपत्तीकडे पाहून!! की मी या संपत्तीचा रुबाब दाखवून ते मिळवलं!! चूक माझीच आहे !!! हे खोट प्रेम मी कधी ओळखूच शकलो नाही !! प्रितीला भेटायला गेलो तेव्हा ती माझ्यापेक्षा माझ्या हातातील त्या तिला भेट म्हणून आणलेल्या अंगठीकडे जास्त पाहत होती. मला वाटलं ती आनंदाने हुरळून गेली असेल !! पण ती पैशातून नात तयार करत होती!! मग हे टिकेल तरी किती दिवस !! जेव्हा हे सारं काही नकोस वाटायला लागलं, तेव्हा तिला आता पुन्हा अनिकेत आठवू लागला. नाही !! मला तिला सावरायला हवं !! "

सूरज भानावर येत खोलीत आला.  त्याला समोर शांत बसलेली प्रिती दिसत होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती. तो तिच्या जवळ जात बोलू लागला.

"प्रिती !! झालं गेलं विसरून जाऊ आपण !! "
प्रिती ऐकुन न ऐकल्या सारखं करत होती. तरीही सूरज तिला पुन्हा पुन्हा बोलत होता.
"ऐक ना प्रिती !! हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करीन!! त्या अनिकेत पेक्षा जास्त करीन!! पण अस वेड्या सारख करू नकोस!! "
"तू जा बर सूरज इथून !!" प्रिती त्याला लांब करत म्हणाली. 

सूरज तिला काहीच बोलत नाही. तो बाहेर निघून जातो. 

रात्रभर तो बाहेर बसून राहतो. प्रिती आणि त्याच्या मधल्या या नात्याला कोणत्याच गोष्टीची मात्रा लागू होत नाही हे त्याला कळून चुकलं होत. कारण प्रितीला आता या नात्याची गरजच राहिली नव्हती. त्याच्या मनात असंख्य विचार येत होते. कधी त्याला वाटलं आपण जाऊन जाब विचारावा तिला! की मी तुझा नवरा आहे प्रिती !! हे असलं नाटक माझ्या समोर चालणार नाही !! पण पुन्हा तो शांत होई. पण कधी वाटे सरळ जाऊन त्या अनिकेतला विचारावं, की तू माझ्या बायकोला का भेटलास ते , पण त्याची काहीच चूक नाही हे माहितेय मला!!  सार काही अवघड आहे हे.

 रात्रभर सूरज हॉल मध्येच सोफ्यावर झोपी गेला. सकाळी उशिरा त्याला जाग आली. झोपेतून उठल्या उठल्या तो प्रिती झोपी गेली होती तिथे गेला पण ती तिथे नव्हतीच. तिला त्याने सगळ्या घरात शोधलं पण ती घरी नव्हतीच. त्याने फोनही लावला तोही बंद लागतं होता. त्याला आता काळजी वाटू लागली. तो घरातून बाहेर पडला सगळीकडे तो तिला शोधू लागला. कदाचित ती रागात कुठे निघून तर गेली नाहीना !! अस त्याला वाटू लागलं. ती पुन्हा त्या अनिकेतला भेटायला गेली असेल का !! काहीच कळत नाही. सूरज मनातून खचून गेला. त्याच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले.

" प्रिती !! माझं पहिल प्रेम !! जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती प्रिती !!! ती अशी कुठे निघून गेली !! मला न सांगता!! मला सांगून तरी जायचं ना !! एवढं काय लगेच नाराज व्हावं !! देवा !! ती कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव !! " सूरज आता हताश झाला होता. राहून राहून तो तिचा फोन लागतो का ते पाहत होता. आणि थोड्या वेळाने तिचा फोन लागतो. आणि ती फोन उचलते. सूरज बोलू लागतो.

"प्रिती !! प्रिती !!! प्रिती !! कुठे आहेस तू ?? अस मला न सांगता कुठे बघून गेली तू !!" 
"सूरज मी नीट आहे!! तू !! तू उगाच माझी काळजी करू नकोस बर !! मी काही लहान बाळ नाहीये!!"
"पण तू आहेस कुठे ??" 
"मी आहे जिथं आहे तिथेच !! "
"अनिकेत सोबत आहेस ना तू ??"
"नाही !! श्वेताकडे आली आहे !!!"
"श्वेता !! म्हणजे त्या अनिकेतची बायको ??"
"हो !! येईल मी थोड्या वेळाने घरी !! उगाच फोन करू नकोस !! "

 एवढं बोलून प्रिती फोन बंद करते. सूरज निराश होऊन घरी निघून जातो. इकडे श्वेता प्रितीला बोलते.

"आज अचानक कसकाय येणं केलं ??"
"सहजच आले होते!! या इकडे आले मग अनिकेत म्हणाला होता की इथे जवळ राहतो आम्ही !! म्हणून म्हटलं भेटाव चला !!" प्रिती घरात इकडे तिकडे पाहत म्हणाली.
"होका!! अनिकेत म्हणाले का !!"
"अनिकेत नाही घरी ?" 
"ते सकाळीच गेले ऑफिस ला !! "
"अच्छा !!"
"काय घेणार मग !! चहा की कॉफी??"श्वेता प्रितीला विचारते.
"काही नको !! बर चला मी निघते !!"
"लगेच !! काहीतरी घ्या!!"
"नाही नको!! पुन्हा कधीतरी !! आता काय भेट होईलच वरचेवर!!"

 श्वेता काहीच बोलत नाही.तिला प्रितिच हे अचानक येणं थोड वेगळंच वाटलं. पण ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. ऑफिस संपून अनिकेत संध्याकाळी घरी आल्यानंतर ती त्याला म्हणते.

"अरे अनिकेत !! आज प्रिती आली होती रे घरी !!"
"कसकाय ??" अनिकेत आश्चर्याने विचारतो. 
"काय माहित !! आली काय बसली काय आणि तू नाही म्हणाले की निघून गेली काय !! काहीच कळलं नाही !!" श्वेता शांत बोलत होती.
"जाऊदे सोड !! ती अशीच आहे !!"
"नाहीरे !! पण तीच वागणं !! बोलणं !! सगळंच जरा वेगळं वाटलं मला!!"
"श्वेता !! जाऊदे ना !!" अनिकेत तिला जवळ घेत म्हणाला.

आणि तेवढ्यात मोबाईलच्या मेसेजची टोन वाजते.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...