मुख्य सामग्रीवर वगळा

नकळत || कथा भाग १ || कथा ||



टीप :" नकळत  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

  "आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतलं चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं. पण मनाचा निर्धार मी आता केला आहे. ती समोर आली तरी तिला बोलणार नाही. पण खरंच इतका निष्ठुर वागू शकेल का ? माझंच मला नाही सांगता येणार. पण एवढं मात्र नक्की की तिला आयुष्यभर मी माफ नाही करणार. भेटलीच कधी तर .. तर?? नाही नको .!! मला नाही पुढचं लिहिता येणार ..!! " समीर लिहिता लिहिता थांबला. आणि तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलताच बोलू लागला.

" हा बोल आकाश !! "
फोनवर आकाश त्याचा जुना मित्र समीरला बोलू लागला.
"आज येतोयस ना तू संध्याकाळी!! "
"संध्याकाळी काय ?? " समीर म्हणाला.
"अरे !! विसरला तू !! Get-together आहे यार आपलं !! "
"अरे !! नाही ..!! मी नाही येत यार आकाश !!"
"ये नाही वैगेरे काही चालणार नाही बरं !! भेटायचं आहे संध्याकाळी  !! चल बाय !! "
आकाश लगेच फोन कट करतो.

समीर कित्येक वेळ विचार करत बसतो. त्याला तिथे जायचं नसतं. पण तरीही त्याला जावं लागत होत.

"आज कित्येक वर्ष लोटून गेल्यावर पुन्हा त्याच जुन्या सुंदर आठवणीत कोणाला जाऊ वाटणार नाही !! पण त्या आठवणी जर नकळत त्रासच देणार असतील तर !! मग कशाला भेटाव पुन्हा त्यांना !! पण नको म्हणूनही त्या समोर येत असतील तर...!! काय करावं !!आठवणीतल्या त्या कप्प्यात पुन्हा तिच्याशी भेट होणार.!! तिला पाहून मी पुन्हा तिच्याकडे खेचला जाणार. त्यापेक्षा गेलोच नाही तर ..!! पुन्हा सगळ्या मित्रात उगाच उलट सुलट अर्थ निघतील. त्यापेक्षा गेलेलच बर..! " समीर आपल्याच विचारात कित्येक वेळ बसून होता.

"ती वेळच सुंदर असते ना !! जेव्हा आपल्या आवडती व्यक्ती आपल्या सोबत असते !! तिच्यासोबत फिरायच , बाहेर जायचं, मजा करायची.कित्येक गोष्टी करायच्या, ज्या मनाला आनंद देतील. आपलं सुख , आपलं दुःख सगळं काही वाटून घ्यायचं. पुन्हा अचानक वेळ बदलून गेली की, त्यांनीही बदलायच आणि अस बदलायच की एका क्षणाचाही  विचार न करता एकटं टाकून सोडून जायचं. मग उरलं काय ते फक्त आपण पाहत बसायचं. त्या आठवणी उगाच जवळ घेऊन बसायचं. फक्त तिच्यासाठी."
समीर डोळ्यातले अश्रू पुसत उठला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. या विचारात कित्येक वेळ गेला हे त्याला कळलंच नाही, आणि जाण्यासाठी आवरू लागला. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. फोन उचलत समीर काम करु लागला.
"हा बोल आकाश !!"
"अरे कुठे आहे सम्या तू !!"
"अरे आवरतोच आहे !! पाच मिनिटं फक्त !! "
"लवकर आवर !! तुझ्या बिल्डिंग खाली थांबलोय !! "
"अरे आलो !! आलोच !! "
समीर लगबगीने आवरातो. आणि पटकन आवरून खाली जातो. समोर आकाश कित्येक वेळ झालं येऊन थांबला होता.

"काय सम्या किती उशीर !! " आकाश त्याला येताना पाहून म्हणतो.
"Sorry रे ..!! थोड लिहित बसलो आणि मग लक्षातच आल नाही वेळेचं !! "
"तू पण ना !! " आकाश कार मध्ये बसतं म्हणतो.
दोघेही आता कारमध्ये बसून निघतात. कारमध्ये बसल्या नंतर आकाश बोलू लागतो.

" सम्या आज कोण येणार आहे माहित आहे का !! सायली देशमुख !! तुला सांगतो !! जाम फिदा होतो रे कॉलेज मध्ये असताना मी !!तुला तर सगळं माहितीच रे !!!  पण तिने त्या कान्याशी लग्न केलं . वाटलं नव्हतं बर कान्या बद्दल !! डिग्री आणि पोरगी दोन्ही घेऊन गेला !! "  आकाश समीरकडे पाहून बोलायचं थांबला. त्याच लक्ष आपल्या बोलण्याकडे नाही हे त्याला कळलं.

" ये सम्या !! अरे लक्ष कुठ आहे ?? "
" कुठ नाही बोल ना !! "
"कसला एवढा विचार करतोय रे ??"
"काही नाही रे असच !!"
"दोस्त आहे मी तुझा साल्या !! मला वाटलं होतं आता बोलशील नंतर बोलशील पण नाही !! त्रिशाचा विचार करतोयस ना ??"
"नाही रे !! खरंच नाही !! "
" हे बघ !! सगळ्यापासून लपव पण माझ्या समोर नकोसं नाटक करू !!तुझा चेहराच सांगतोय सगळं !! सांग आता !!"
"खरंच काही नाहीरे तस !! " समीर आकाशाकडे पाहत म्हणाला.
"सांग!!"आकाश नजर रोखून त्याला म्हणाला.

"काय बोलू खरंच काही कळत नाही रे !! जिच्यावर मनापासून प्रेम केलं, ती आज कित्येक वर्षांनंतर पुन्हा समोर येणार !! हा विचारच सहन होत नाही रे !! एक मन म्हणत की पुन्हा कशाला तेच, आणि दुसरं म्हणत की भेट तरी एकदा !! पण यांच्या गोंधळात मला काहीच कळत नाही !! कशी असेल , कुठे होती , आता ती खुश आहे की नाही ! आणि असेल तर पुन्हा तेच आठवून कशाला द्यायचं !! काहीच कळत नाही !! तू म्हटल्या पासून काहीच सुचत नाहीये !! एवढं लिहिणारा मी पण त्रिशा समोर असेल तर शांत होतो.!! " समीर अगदी मनातलं बोलत होता.

"पण तू असा विचार करूच नकोस की ती आता कशी असेल वैगेरे !! ती येणार आहे की नाही तेही नीटसं बाकीच्यांनी मला सांगितलं नाही !! पण मला वाटतं जरी ती आली तरी तू तिला मनमोकळ बोलावंसं .!! कोणताही राग किंवा पूर्वीच काही मनात ठेवून नाही !!!आणि तू तर प्रेम केलंस ना तिच्यावर !! मग तर सोड ना यार !! ती खुश असेल तर आपणही खुश व्हायचं !! आणि दुखी असेल अस आपणच नाही विचार करायचा.!!"
"एवढं सहज आहे हे !!"
"नसलं तरी आपण करायचं !! मनाला कधी कधी फसवण्यात पण वेगळंच सुख असतं रे !! "

समीर पुढे काहीच बोलला नाही आणि कारमध्ये फक्त गाणं वाजत राहिलं. दोघेही get-together जिथे होणार होत तिथे येऊन  पोहचले. त्यांच्या अगोदर थोडेफार मित्र तिथे आले होते. समीर आणि आकाशाला पाहून सगळे खुश झाले. एकमेकांना भेटू लागले
"अरे यार !! मन्या कसा आहेस यार !! " समीर त्याला मिठी मारत बोलू लागला. आकाशही तसाच भेटला. जुन्या मित्रांना भेटून दोघेही हरवून गेले. पण समीरची नजर इकडे तिकडे फिरत होती. त्या सर्वांत त्रिशा कुठेच नव्हती.सगळ्यांच्या भेटी झाल्या कित्येक वेळ निघून गेला तरी ती आलीच नाही. आकाश समीरची तिला भेटण्याची तळमळ पाहत होता.
"सगळे आले का रे ??" आकाश दुसऱ्या एका मित्राला मुद्दामच विचारतं होता.
"हो आले ना !! "
"खरं ??" आकाश तोंड वाकड करून म्हणाला. कारण सायली ही अजुन आली नव्हती.
"अरे नाही यार !! अजुन त्रिशा नाही , सायली नाही !! ओंक्या सुधा आला नाही अजुन !! "
" सायली , त्रिशा येतो म्हणाल्या होत्या ??"
"Confirm नाही म्हणे काही !!म्हणून तर सगळे आलेच म्हणायचं ..!! "
एवढं सगळं विचारून झाल्यावर. अचानक तो मित्र बोलला.
"अरे आल्याचं त्या !! त्या बघ !! "
समीर ते ऐकतो आणि मागे पाहतो. तर त्रिशा समोरून येत होती. तिला कित्येक वर्षांनंतर पाहून तो एका क्षणात स्वतःतच हरवला.

" कित्येक वर्ष लोटली तरीही आज सुद्धा त्रिशा तशीच आहे !! ते लांब केस, ते डोळे तशेच अगदी मनातलं बोलणारे !! बदलं असा काहीच वाटत नाही !! अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला पाहिलं होत तसचं आजही वाटतंय !! होणं!! पण ..."

समीर भानावर आला. आणि नजर चुकवून दुसऱ्या मित्रांना भेटायला गेला.

क्रमशः

✍️ योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...