मुख्य सामग्रीवर वगळा

नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

 

कथा भाग २

  समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती.
"आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. "

"त्रिशा !! लक्ष कुठ आहे तुझ ??" शेजारीच उभी असलेली सायली तिला बोलत होती.
सायली आणि आकाश बोलत बोलत त्रिशापासून वेगळे झाले. दोघेच बोलत बसले. त्रिशा कित्येक वेळ एकटीच बसून होती. काही मित्र मध्येच येऊन क्षणभर बोलून जात होते एवढंच. पण समीर काही तिच्याकडे येत नाही हे तिला लक्षात आले. एका बाजूला समीरही एकटाच बसून होता. अखेर त्रिशाच उठून समीरकडे गेली. तिला आपल्या जवळ येताना पाहून समीर थोडा गोंधळून गेला.

"Hii..!!" त्रिशा समीर समोर येत म्हणाली.
समीर थोडा हळू आवाजातच बोलला.
"Hii!!"
"कसा आहेस ??"
"मी ठीक,, तू कशी आहेस ??" समीर तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मीपण मजेत !!"
"कधी आलास ??"
"Just आत्ताचं आलोय !!"
"बाकी ??"
"मस्त !!"

समीर आणि त्रिशा मनमोकळ बोलतच नव्हते. त्यांनाही ते जाणवून आलं. नात्यावर कित्येक वर्षांची धूळ बसली होती. कदाचित त्याची जाणीव दोघांनाही झाली होती.
"तुझं पुस्तक वाचलं मी मध्ये !! खूप छान लिहिलंय !!" त्रिशा लांब उभारलेल्या आकाशाकडे पाहू लागली. तोही त्या दोघांकडे फक्त पाहत राहिला.
"तू वाचलंस माझं पुस्तक ??" समीर आश्चर्य होऊन पाहू लागला.
"तुझी आतापर्यंतची सगळी पुस्तकं वाचली मी !!" आता त्रिशा थोडी मनमोकळ बोलू लागली.
"Nice !! " पण  अजुनही समीर तुटकच बोलत होता.
त्या छोट्याश्या get-together मध्ये सगळे गुंग झाले होते. जुन्या मित्रांन मध्ये कित्येक आठवणी जाग्या करत होते. पण या जुन्या आठवणीत एक हळूवार प्रेमाची आठवणही आपली पान उलगडू पाहत होती. समीर आणि त्रिशा आपल्यात हरवून गेली होती. मध्येच एखादा मित्र यायचा आणि दोघांना बोलत बसायचा. पण दोघेही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. बोलायचं खूप होत पण दोघांनाही शब्द भेटत नव्हते.

"तुझ्या प्रत्येक कथेत , नायक आणि नायिका यांचं प्रेम अखेर अधुरेच राहिलं हे थोड मनाला लागत रे !!" त्रिशा समीरला अगदिक होऊन म्हणाली.
"मलाही ते खटकत खूप ! " समीर त्रिशाकडे पाहत राहिला. तिला पुढे काय बोलावं सुचेचना. ती क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यात अलगद एक अश्रू आला. पण तिने तो समीरच्या नकळत पुसला.
"आयुष्यात फक्त सोबत असणं यालाच प्रेम म्हणतात ??" त्रिशा शांत म्हणाली.
"नाही !! पण न सांगता निघून जाणं याला तरी कुठ प्रेम म्हणायचं ??" समीर त्रिशाकडे कित्येक वेळ नजर रोखत म्हणाला.
त्रिशा आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. सायली आणि आकाशही रमले होते. बघता बघता get-together पार्टी संपत आली होती. सगळ्यांनी खूप मजा केली. अखेर निघताना सगळे एकमेकांना पुन्हा भेटण्याचं वचन देऊ लागले.
"चल सायली !! पुन्हा भेटू आपण !! नंबर तर घेतला आहेच तुझा !! उद्या call करतो..!! " आकाश सायलीला मिठी मारत बोलत होता. शेजारीच त्रिशा आणि समीर उभे होते.

तेवढ्यात त्रिशाचा फोन वाजतो. ती उचलते आणि बोलते .
" हॅलो !! हा बोल !! हा आलेच !! लगेच आले !! Wait !! " एवढं बोलून ती फोन कट करून कोणाला काहीही न बोलता निघून जाते. समीर आकाश फक्त बघत राहतात. सायली तिच्या मागे अक्षरशः पळत जाते. तिलाही काही कळत नाही.
"समीर !! " आकाश समीरकडे पाहतो आणि बोलतो.
"चल यार !! निघू आता !! तुला जाताना सोडायचं आहे !! आणि मग पुन्हा खूप उशीर होतो!! "
समीर आणि आकाश दोघेही पुन्हा घरी जायला निघतात. Get-together चे कित्येक सुंदर क्षण सोबत घेऊन जातात.
कार मध्ये जाताना दोघेही एकमेकांशी खूप काही बोलत असतात. त्रिशा तिची भेट, सायली काय म्हणाली. वगैरे वगैरे.
"मग !! काय झालं का बोलणं ??" आकाश हसत समीरला विचारतो.
"खास अस काही नाहीरे !! " सहजच झालं बोलणं!! विशेष अस काही नाही."
"हा तरीपण बोललीना ती !! भेटलात ना तुम्ही !! "
" हो पण !! आकाश यार ! तीचं लग्न झालं !! आणि ती पूर्वीच्या सगळ्या आठवणींतून बाहेर पडली असावी असच वाटलं मला!! मी भेटलो त्रिशा सरदेसाईला !! पण ही माझी त्रिशा नव्हती रे !! माझी वाटलीच नाही"
"काय म्हणतोय सम्या तू काही कळल नाही बघ!!"
"She's married !! मी त्रिशाला भेटलो !! पण मी जिच्यावर प्रेम करत होतो ती ही नाहीरे !! तीच वागणं बोलणं सगळं सारखं होत !! पण ती माझं प्रेम नाही, तर कोणाचं तरी आयुष्य झाली होती.!!" समीर डोळ्यात आलेला एक अश्रू पुसत म्हणाला.
"अरे यार सम्या !!! एवढं इमोशनल नको होऊस यार !! हे बघ !! आपण कॉलेज नंतर दहा वर्षांनी भेटत आहोत !! तीच लग्न झालेलं असणार !! त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! छोड ना यार !! " आकाश समीरला समजावून सांगत होता.
"आजही ती न सांगता निघून गेली !!आजही तिची ती सवय काही गेली नाही !! "
"काहीतरी काम असेल अर्जंट !! आकाश सावरत म्हणाला.

   आकाश समीरला त्याच्या घरी सोडून गेला. समीर एकटाच कित्येक वेळ फ्लॅटमध्ये रात्रभर त्रिशाच्या आठवणीत जागत राहिला.
"आज दहा वर्षा नंतर भेटलो तेव्हा खरंतर एका क्षणाला आनंद वाटला होता. पण तिच्या केसाच्या मध्ये हलकंस असलेलं कुंकू मला खूप काही बोलून गेलं. ती समोर आली तेव्हा एक क्षण मी हरवून गेलो तिच्यात, पण ते माथ्यावरच कुंकू मला खूप काही सांगून गेल. आयुष्यभर तिच्या आठवणीत एकटं राहायचं ठरवल होत. ती साथ द्यायला नक्की येईल कधीतरी, अस मन सतत म्हणत होत. पण एका क्षणात सार काही संपलं. ती येणार ही आशा मला एकांतात साथ देत होती. पण ती कधीच आता येणार नाही ही जाणीव मला एक एक क्षण जाळत आहे !!"समीर सिगरेट ओढत कित्येक वेळ बसला.
त्या सिगारेटच्या धुरात सगळं काही अंधुक झालं होत. आणि मध्येच मोबाइलची मेसेज टोन वाजते. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला ते समीर पाहतो.  तर तो त्रिशाचा असतो.

समीर मेसेज वाचू लागतो.

क्रमशः

✍️योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...