मुख्य सामग्रीवर वगळा

नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

 

कथा भाग २

  समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती.
"आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. "

"त्रिशा !! लक्ष कुठ आहे तुझ ??" शेजारीच उभी असलेली सायली तिला बोलत होती.
सायली आणि आकाश बोलत बोलत त्रिशापासून वेगळे झाले. दोघेच बोलत बसले. त्रिशा कित्येक वेळ एकटीच बसून होती. काही मित्र मध्येच येऊन क्षणभर बोलून जात होते एवढंच. पण समीर काही तिच्याकडे येत नाही हे तिला लक्षात आले. एका बाजूला समीरही एकटाच बसून होता. अखेर त्रिशाच उठून समीरकडे गेली. तिला आपल्या जवळ येताना पाहून समीर थोडा गोंधळून गेला.

"Hii..!!" त्रिशा समीर समोर येत म्हणाली.
समीर थोडा हळू आवाजातच बोलला.
"Hii!!"
"कसा आहेस ??"
"मी ठीक,, तू कशी आहेस ??" समीर तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मीपण मजेत !!"
"कधी आलास ??"
"Just आत्ताचं आलोय !!"
"बाकी ??"
"मस्त !!"

समीर आणि त्रिशा मनमोकळ बोलतच नव्हते. त्यांनाही ते जाणवून आलं. नात्यावर कित्येक वर्षांची धूळ बसली होती. कदाचित त्याची जाणीव दोघांनाही झाली होती.
"तुझं पुस्तक वाचलं मी मध्ये !! खूप छान लिहिलंय !!" त्रिशा लांब उभारलेल्या आकाशाकडे पाहू लागली. तोही त्या दोघांकडे फक्त पाहत राहिला.
"तू वाचलंस माझं पुस्तक ??" समीर आश्चर्य होऊन पाहू लागला.
"तुझी आतापर्यंतची सगळी पुस्तकं वाचली मी !!" आता त्रिशा थोडी मनमोकळ बोलू लागली.
"Nice !! " पण  अजुनही समीर तुटकच बोलत होता.
त्या छोट्याश्या get-together मध्ये सगळे गुंग झाले होते. जुन्या मित्रांन मध्ये कित्येक आठवणी जाग्या करत होते. पण या जुन्या आठवणीत एक हळूवार प्रेमाची आठवणही आपली पान उलगडू पाहत होती. समीर आणि त्रिशा आपल्यात हरवून गेली होती. मध्येच एखादा मित्र यायचा आणि दोघांना बोलत बसायचा. पण दोघेही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. बोलायचं खूप होत पण दोघांनाही शब्द भेटत नव्हते.

"तुझ्या प्रत्येक कथेत , नायक आणि नायिका यांचं प्रेम अखेर अधुरेच राहिलं हे थोड मनाला लागत रे !!" त्रिशा समीरला अगदिक होऊन म्हणाली.
"मलाही ते खटकत खूप ! " समीर त्रिशाकडे पाहत राहिला. तिला पुढे काय बोलावं सुचेचना. ती क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यात अलगद एक अश्रू आला. पण तिने तो समीरच्या नकळत पुसला.
"आयुष्यात फक्त सोबत असणं यालाच प्रेम म्हणतात ??" त्रिशा शांत म्हणाली.
"नाही !! पण न सांगता निघून जाणं याला तरी कुठ प्रेम म्हणायचं ??" समीर त्रिशाकडे कित्येक वेळ नजर रोखत म्हणाला.
त्रिशा आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. सायली आणि आकाशही रमले होते. बघता बघता get-together पार्टी संपत आली होती. सगळ्यांनी खूप मजा केली. अखेर निघताना सगळे एकमेकांना पुन्हा भेटण्याचं वचन देऊ लागले.
"चल सायली !! पुन्हा भेटू आपण !! नंबर तर घेतला आहेच तुझा !! उद्या call करतो..!! " आकाश सायलीला मिठी मारत बोलत होता. शेजारीच त्रिशा आणि समीर उभे होते.

तेवढ्यात त्रिशाचा फोन वाजतो. ती उचलते आणि बोलते .
" हॅलो !! हा बोल !! हा आलेच !! लगेच आले !! Wait !! " एवढं बोलून ती फोन कट करून कोणाला काहीही न बोलता निघून जाते. समीर आकाश फक्त बघत राहतात. सायली तिच्या मागे अक्षरशः पळत जाते. तिलाही काही कळत नाही.
"समीर !! " आकाश समीरकडे पाहतो आणि बोलतो.
"चल यार !! निघू आता !! तुला जाताना सोडायचं आहे !! आणि मग पुन्हा खूप उशीर होतो!! "
समीर आणि आकाश दोघेही पुन्हा घरी जायला निघतात. Get-together चे कित्येक सुंदर क्षण सोबत घेऊन जातात.
कार मध्ये जाताना दोघेही एकमेकांशी खूप काही बोलत असतात. त्रिशा तिची भेट, सायली काय म्हणाली. वगैरे वगैरे.
"मग !! काय झालं का बोलणं ??" आकाश हसत समीरला विचारतो.
"खास अस काही नाहीरे !! " सहजच झालं बोलणं!! विशेष अस काही नाही."
"हा तरीपण बोललीना ती !! भेटलात ना तुम्ही !! "
" हो पण !! आकाश यार ! तीचं लग्न झालं !! आणि ती पूर्वीच्या सगळ्या आठवणींतून बाहेर पडली असावी असच वाटलं मला!! मी भेटलो त्रिशा सरदेसाईला !! पण ही माझी त्रिशा नव्हती रे !! माझी वाटलीच नाही"
"काय म्हणतोय सम्या तू काही कळल नाही बघ!!"
"She's married !! मी त्रिशाला भेटलो !! पण मी जिच्यावर प्रेम करत होतो ती ही नाहीरे !! तीच वागणं बोलणं सगळं सारखं होत !! पण ती माझं प्रेम नाही, तर कोणाचं तरी आयुष्य झाली होती.!!" समीर डोळ्यात आलेला एक अश्रू पुसत म्हणाला.
"अरे यार सम्या !!! एवढं इमोशनल नको होऊस यार !! हे बघ !! आपण कॉलेज नंतर दहा वर्षांनी भेटत आहोत !! तीच लग्न झालेलं असणार !! त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! छोड ना यार !! " आकाश समीरला समजावून सांगत होता.
"आजही ती न सांगता निघून गेली !!आजही तिची ती सवय काही गेली नाही !! "
"काहीतरी काम असेल अर्जंट !! आकाश सावरत म्हणाला.

   आकाश समीरला त्याच्या घरी सोडून गेला. समीर एकटाच कित्येक वेळ फ्लॅटमध्ये रात्रभर त्रिशाच्या आठवणीत जागत राहिला.
"आज दहा वर्षा नंतर भेटलो तेव्हा खरंतर एका क्षणाला आनंद वाटला होता. पण तिच्या केसाच्या मध्ये हलकंस असलेलं कुंकू मला खूप काही बोलून गेलं. ती समोर आली तेव्हा एक क्षण मी हरवून गेलो तिच्यात, पण ते माथ्यावरच कुंकू मला खूप काही सांगून गेल. आयुष्यभर तिच्या आठवणीत एकटं राहायचं ठरवल होत. ती साथ द्यायला नक्की येईल कधीतरी, अस मन सतत म्हणत होत. पण एका क्षणात सार काही संपलं. ती येणार ही आशा मला एकांतात साथ देत होती. पण ती कधीच आता येणार नाही ही जाणीव मला एक एक क्षण जाळत आहे !!"समीर सिगरेट ओढत कित्येक वेळ बसला.
त्या सिगारेटच्या धुरात सगळं काही अंधुक झालं होत. आणि मध्येच मोबाइलची मेसेज टोन वाजते. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला ते समीर पाहतो.  तर तो त्रिशाचा असतो.

समीर मेसेज वाचू लागतो.

क्रमशः

✍️योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...