मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साद त्या भेटीची || Avyakt Prem Kavita ||

साद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे!! तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे?? कुठे कधी भेटावे नकळत आस कोणती या मनास आहे!! तुझ्या वाटेवरती उगाच ते तुझीच वाट का पाहत आहे?? गंध पसरले दाही दिशांनी तो गंध ओळखीचा आहे!! तुझ्या येण्याचा भास मग उगाच मला का होत आहे?? दवबिंदू होऊन पानावरती मोती होऊन ते पसरले आहे!! तुझ्या सोबतीचे क्षण जणू ते पुन्हा मला का दिसत आहे?? ओलावा त्या माती मधला नात्याची जाणीव होत आहे!! पुन्हा बहरून येण्या जणू ती पालवी का फुटली आहे?? नभी दाटल्या त्या ढगांनी जणू हाक मज दिली आहे!! तुझ्या नि माझ्या भेटीस ती सरही आतुर का झाली आहे?? तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब भिजवत आहे !!! ✍️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

मार्ग || मराठी कविता || सुंदर कविता ||

"शोधावी ती माणसं, जी स्वप्नांशी झुंजत असतात !! झोपलेल्या उगाच पाहत, वेळ वाया घालवू नये !! शोधावे ते मार्ग, जे तुम्हाला खुणावत असतात !! उगाच सगळे जातात म्हणून, चालत राहू नये !! शोधावे ते ध्येय, जे तुम्हाला बोलत असतात !! उगाच दुसऱ्यात कधी, स्वतः स पाहू नये !! शोधावी ती आग, जी तुम्हाला पेटवत असते !! दुसऱ्याच्या आगीत कधी, खाख होऊ नये !! शोधावी ती जिद्द, पुन्हा उभा राहण्यासाठी !! उगाच हताश होऊन, रडत बसू नये !! शोधावी ती ओळख, आपलीच आपल्यासाठी !! उगाच कोणाच्या सावलीत, उभा राहू नये..!" ✍️योगेश खजानदार

नकळत || कथा भाग ५ || शेवट भाग ||

कथा भाग ५ त्रिशाला भेटून आल्यानंतर कित्येक वेळ समीर तिच्या आठवणीत रमून गेला. त्याच्या नजरे समोरून तिचा चेहरा हटतच नव्हता. त्याच्या मनात कित्येक विचार येऊ लागले. "आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ?? तो अपंग आहे हे कळल्यावर त्रिशा त्याला नकार देऊ शकली असती !! पण तिने तस केलं नाही फक्त बाबांच्या शब्दासाठी !! बाबांवराच्या प्रेमा साठी !! पण त्यानंतर सुद्धा ती प्रेम देतच राहिली !! मंदार आज तिच्यामुळे जिवंत आहे !! आणि मी पाहिलं आहे, त्रिशाही त्याच्यावर तेवढंच प्रेम करते आता !!  पण या सगळ्यात मी आजही तिथेच आहे!!  नाही का ?? माझ्या आठवणीत त्रिशा आजही तशीच आहे !" समीर विचारांच्या तंद्रीत असतो. अचानक मेसेज टोन वाजते. तो मेसेज त्रिशाचा असतो. " समीर , तुला आज भेटून खरंच खूप छान वाटलं !! मंदार ही तुझ खूप कौतुक करत होता. खरंच खूप  Thanks. मंदार आज खूप दिवसांनी मनसोक्त बोलला.!! उद्या मी संध्याकाळी निघते आहे !! आपण एअरपोर्टवर...

नकळत || कथा भाग ४ || प्रेमाच्या कथा ||

कथा भाग ४ त्रिशाला भेटून समीर घरी गेला.तेव्हा आकाश त्याची बाहेर वाटच पाहत होता. "काय सम्या किती वेळ !! वैतागलो बाहेर थांबून !! " आकाश समीरला जवळ येताना पाहून म्हणाला. "Sorry!! अरे भेटायला गेलो होतो मित्राला म्हणून उशीर झाला!!" समीर फ्लॅटचा दरवाजा उघडत बोलत होता. बोलत बोलत दोघेही आत गेले. आकाश सोफ्यावर बसतं म्हणाला. "कोणाला भेटायला गेला होतास ?" आकाशच्या या प्रश्नाने समीर शांत राहिला. आकाश पुन्हा म्हणाला. "अरे कोणाला गेला होतास भेटायला.?" समीर पुन्हा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला, "त्रिशाला!!" आकाश हे ऐकून अचानक बोलला, "काय ?? त्रिशाला ??" "हो !!" "अरे पण कस काय ?? म्हणजे !! अरे !! तिला ?काय म्हणाली मग ती ?" आकाश कित्येक प्रश्न विचारू लागला. "अरे काही नाही सहजच भेटायला बोलवलं होत तिने .!! खूप वर्षांनी भेट झाली ना म्हणून !! बर ते जाऊदे !! तू इथे कसाकाय ??" "आमच्या हीचे नातेवाईक आलेत घरी !! उगाच डोक्यात जातात, म्हटलं चला आज इथे राहुयात!! चालेल ना ??" आकाश समीरकडे पाहून हसला. "म्हणजे क...

नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||

समीर, I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! " समीरने मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला. "नाही!! मला तुला भेटायचं नाहीये !!  Sorry!!" मेसेज केल्या नंतर कित्येक वेळा नंतर त्रिशाचा पुन्हा रिप्लाय आला. "एकदा भेटशील फक्त !! खूप काही बोलायचं आहे रे मला !!" "नको पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करुस त्रिषा!! तू तुझ्या संसारात खुश रहा !! मला बाकी काही नको !! " पुन्हा समीरने रिप्लाय केला. "तू नाही भेटलास तर मी कधीच खुश नाही होऊ शकणार !!" समीर या मेसेज नंतर कित्येक वेळ विचार करत राहिला आणि पुन्हा  त्याने मेसेज केला. "ठीक आहे !! कुठे भेटायचं ??" "आपण दोघे पूर्वी भेटायचो त्याच कॅन्टीन मध्ये भेटुयात !! कॉलेज शेजारी! सकाळी १० वाजता! " "Ok !!" उद्या भेटायचं अस सांगून समीर ...

नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

  कथा भाग २   समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती. "आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. " "त्रिशा !! लक्ष कुठ आहे तुझ ??" शेजारीच उभी असलेली सायली तिला बोलत होती. सायली आणि आकाश बोलत बोलत त्रिशापासून वेगळे झाले. दोघेच बोलत बसले. त्रिशा कित्येक वेळ एकटीच बसून होती. काही मित्र मध्येच येऊन क्षणभर बोलून जात होते एवढंच. पण समीर काही तिच्याकडे येत नाही हे तिला लक्षात आले. एका बाजूला समीरही एकटाच बसून होता. अखेर त्रिशाच उठून समीरकडे गेली. तिला आपल्या जवळ येताना पाहून समीर थोडा गोंधळून गेला. "Hii..!!" त्रिशा समीर समोर येत म्हणाली. समीर थोडा हळू आवाजातच बोलला. "Hii!!" "कसा आहेस ??" "मी ठीक,, तू कशी आहेस ??" समीर तिच्याकडे पाहत म्हणाला. "मीपण मजेत !!" "कधी आलास ?...

नकळत || कथा भाग १ || कथा ||

टीप :" नकळत  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.  कथा भाग १   "आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतलं चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं. पण मनाचा निर्धार मी आता केला आहे. ती समोर आली तरी तिला बोलणार नाही. पण खरंच इतका निष्ठुर वागू शकेल का ? माझंच मला नाही सांगता येणार. पण एवढं मात्र नक्की की तिला आयुष्यभर मी माफ नाही करणार. भेटलीच कधी तर .. तर?? नाही नको .!! मला नाही पुढचं लिहिता येणार ..!! " समीर लिहिता लिहिता थांबला. आणि तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलताच बोलू लागला. " हा बोल आकाश !! " फोनवर आकाश त्याचा जुना मित्र समीरला बोलू लागला. "आज येतोयस ना तू संध्याकाळी!! " "...

सांजवेळ || मनातल्या कविता ||

ती झुळूक उगा सांजवेळी, मला हरवून जाते  ! मावळतीच्या सुर्यासवे, एक गीत गाते ! त्या परतीच्या पाखरांची, जणू ओढ पहाते ! ती झुळूक उगा सांजवेळी, गंध पसरवून जाते ! कधी नभी ,कधी लाटांवर, मनसोक्त फिरते ! जाता जाता क्षणभर थांबून, आठवांचा पाऊस देते ! थेंब होऊन पानावरती, दवबिंदू होऊन जाते ! ती झुळूक उगा सांजवेळी, आपल्यास जाऊन भेटते ! आज इथे , उद्या तिथे, क्षणभर न थांबते ! कोण इथे , कोण तिथे, मनातलं गुपित ओळखते ! अबोल राहिले मी तरी, सगळं काही ऐकते ! ती झुळूक उगा सांजवेळी,  सोबतीस माझ्या येते ! ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*