मुख्य सामग्रीवर वगळा

स्मशान कथा भाग २ || हृदयस्पर्शी कथा ||


कथा भाग २

"आबा !!" हातातून रक्त येतंय तुमच्या !!! " कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता.
"काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! " शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला.
"पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! "
"म्हटलं होत ना बाळा !! मेलेल्या भुतापेक्षा जिवंत भूत लई बेकार म्हणून !! "
"खरंय आबा !! "
या सगळ्या गोष्टीत रात्र कशी सरली कळलंच नाही. शिवा पहाटे निर्धास्त झोपी गेला. सदा तांबड फुटताच शाळेत जायला निघाला. सुधा त्याला आवरायला मदत करत होती.तेवढ्यात दत्तू तिथे आला.
"शिवा !! "दत्तू बाहेरूनच हाका मारू लागला.
"झोपलेत अजुन !! " सुधा बाहेर येत म्हणाली.
"दिस डोक्यावर आलाय आणि झोपलाय अजुन !!"
"रात्री कोहल्याची टोळीनं झोपू दिलं तर ना !! " सुधा दत्तूला पेल्यात पाणी देत म्हणाली.
"म्हणजे ! रात्री कोल्हे आलते काय !! " दत्तू आश्चर्याने म्हणाला.
"होय तर !! सारखी इथच घुटमळत होती!!" सुधा आत पाहत म्हणाली.
तेवढ्यात शिवा झोपेतून उठला आणि बाहेर येत दत्तुला म्हणाला.
"काय रे दत्तू !! काय काम काढलसं सकाळ सकाळ??"
सरपंचानी बोलावलंय तुला!! "
"का म्हणून ??"
"आता ते मला काय माहीत !!ये पटकन !! मी जातो पुढं !!" दत्तू एवढं म्हणून निघून गेला.
पाठमोऱ्या दत्तुला जाताना शिवा जरावेळ थांबला. लगेच लगबगीने उठला. सकाळची न्याहारी करून सरपंचाकडं जायला निघाला.
सरपंचाच घर म्हणजे आलिशान वाडा. कित्येक नोकर चाकर दिमतीला. शिवा बारक्या दरवज्यातून आत वाड्यात आला. सरपंच समोरच बसलेले पाहून त्यांना नमस्कार करू पुढे आला. शिवाला पाहताच सरपंच म्हणाले.
"काय शिवा !! आजकाल तोंडपण दाखवणं झाला तू तर !! मोठा झाला का लई !!" सरपंच जरा चिडक्या आवाजात बोलू लागले.
"तस नाही सरकार !! सध्या काम लई आहेत म्हणून येणं झाल नाही !!!"
"मसनवाट्यात कसली आली रे काम !! पेटल की झाल!! " सरपंच हसत म्हणाले.
सरपंच हसलेले पाहून शेजारीच बसलेले दोन तीन गावकरी पण हसू लागले.
"चूक झाली सरकार !! " शिवा खाली मान घालून म्हणाला.
"बर ऐक !! या दोन तीन दिवसात आमचा म्हातारा खपायच्या मार्गावर आहे !! तर त्याला चंदनाची लाकड आणून ठिव !! एवढंच सांगायला बोलावलं होत तुला !! "
"जी सरकार !! प्रयत्न करतो !!"
" प्रयत्न काय?? पाहिजेतच मला!! " सरपंच मोठ्या आवाजात बोलू लागले.
शिवा शांत सगळं ऐकत होता. गावातली या सरपंचाची जवळची माणसं त्याला साथ देत होती.
"मायला !! वैताग नुसता !! तुम्हाला सांगतो तात्या !! हे म्हातारं गेली चार वर्ष झाली मरणा झालंय !! जागेवर पडून नुसता !! पण जीव हित या शरीरात !! मायला म्हातारा मेला म्हणजे सगळा हा वाडा आपलाच होईल बघा !! आणि त्या खालच्या बाजूची शेती !! पैसा सगळं आपलं होईल !! " सरपंच डोळ्यात कित्येक तीव्र भाव आणून बोलत होते.
"आणि नाही मेला ना तर मी मारील बघा त्याला !! आईला वैताग नुसता !! " सरपंच अस म्हणत शिवाकडे पाहू लागले.
शिवा जागेवरून उभा राहिला.सरपंच एकदम त्याचावर खेकसले.
"तुझ काय आता !! झाल तुझ काम !! निघ आता !! आणि सांगितलय ते काम झाल पाहिजे बघ !! माझ्या अब्रूचा प्रश्न आहे !! नाहीतर गाववाले म्हणतील !! एवढा मोठा सरपंच आणि बापाला असाचं जाळला म्हणून !! "
"जी सरकार !! " शिवा मागे सरकत म्हणाला.
गावाच्या वेशीवर येऊन शिवा थांबला. जणू त्याच्या मनात कित्येक विचारांचं द्वंद्व सुरू झालं होत.
"मेलेल्या मड्याचे लचके तोडू नये म्हणून काल मी रात्रभर त्या भुकेल्या कोह्ल्यांशी लढलो ! कशासाठी ?? त्या निर्जीव शरीराला वाचवण्यासाठी !! की अजून कशासाठी !!ती भूक त्यांना तिथे घेऊन आली होती !! त्यांची काय चूक होती ?? खरंच काय चूक होती ?? माझेच मला समजतं नाहीये !! त्या जंगलातल्या प्राण्यांची भूक ती केवढी .!! संपून जाईल लगेच !! पण या जिवंत माणसांची भूक ती कोणती ?? याला अंत नाही ?? त्या मसनवाट्यात खरंच या माणसाच्या भुकेचा अंत आहे ???आयुष्यभर काय कमावलं त्यांनी !! सार काही राख होताना मी पाहिलंय ! !" शिवा गावाच्या वेशीबाहेर येत आपल्या खोपट्याकडे जाऊ लागला. मागे न पाहता, त्या माणसाच्या वस्तीकडे न पाहता, पुढे चालत राहिला.
  दुपारच्या रखरखत्या उन्हात शिवा स्मशानात राखेच्या शेजारी जाऊन बसला.अजूनही ती राख धगधगत होती. तेव्हा जणू सरपंचाचे शब्द त्याच्या मनात घोळत होते.तो तिथे कित्येक वेळ बसला. दुपारची वेळ जाऊन सांज होत आली. आणि तेवढ्यात सुधा खोपट्यातून शिवाला पाहून त्याच्याकडे धावत आली.
"काय हो!! अस का बसलाय इथ???" सुधा थोड्या घाबाऱ्या आवाजात म्हणाली.
"काही नाही !! असच बसलो होतो !! " शिवा शांत म्हणाला.
"सरपंच काही म्हणाले का ??"
" ते काय म्हणणार !! " शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
"मग इथ अस !! " सुधा कुतूहलाने विचारू लागली.
"काही नाही चल !! संध्याकाळ होत आली !! सदा येईल आता !! आल की पोरगं भूक भूक करत !! त्याला खायला कर काहीतरी !! " शिवा सुधाच्या पुढे चालत जात म्हणाला. सुधा क्षणभर थांबली आणि शिवाच्या मागे खोपटाकडे गेली. बाहेर तेवढ्यात सदा आलाच होता . हातपाय धुऊन स्वच्छ कपडे घालून निवांत अंगणात बसला होता.
"आई !! कुठ गेला होतात दोघं तुम्ही ??"
"अरे !! इकडचं पलीकडे बसलो होतो!! " सुधा आत जात म्हणाली.
शिवा हातपाय धुऊन धोतरान अंग पुसून सदाच्या जवळ जाऊन बसला. सदा पुस्तक उघडून अभ्यास करू लागला. त्याला पाहून शिवा क्षणभर गालातल्या गालात पुसटसा हसला. मनातला कित्येक गोंधळ क्षणभर विसरला. सदा पुस्तकातून डोकं वर घेत शिवाकडे पाहत होता. त्याला पाहून शिवा म्हणाला.
"काय असतं रे या पुस्तकात ??" शिवा सदाला कुतूहलाने विचारू लागला.
"थोर पुरुष , विज्ञान , चांगलं काय, वाईट काय सगळं असतं या पुस्तकात !!! " सदा म्हणाला.
"अस्स होय !! चांगलंय !!मन लावून कर आभ्यास !! "शिवा जागेवरून उठतं बोलला.
सदा क्षणभर गालातल्या गालात हसला आणि पुस्तकात पाहून वाचू लागला.
सुधा खोपट्यातून बाहेर येत म्हणाली.
"चला जेवायला !! परत उशीर होतो !!"
एव्हाना आता रात्र होतच आली होती. शिवा आणि सुधा जेवायला बसले. सदा पुस्तक ठेवून खोपट्याच्या बाजूला क्षणभर थांबला. दुर असलेल्या गावाच्या त्या मिणमिणत्या दिव्यांकडे कुतूहलाने पाहू लागला. मसनवाट्यात गडद अंधार दिसत होता.अगदी समोरचं माणूसही दिसणार नाही इतका अंधार होता.
   सदा आत जाऊ लागला. तेवढ्यात मसनवाट्याकडे काही कंदील लूकलूकताना त्याला दिसले. गोंधळलेला सदा घाईघाईत आत आला.
"आबा!! " सदा जोरात ओरडला.
"अरे झाल काय?? " शिवा जागेवरून उठतं म्हणाला. हातातला घास तसाच पुन्हा ताटात ठेवला.
"मसनवाट्याच्या बाजून कंदील दिसायेलेत !!" सदा शांत होत म्हणाला.
शिवा बाहेर गेला. हातात कंदील घेत चालू लागला. तसेतसे ते दिवे जवळ जवळ येऊ लागले. सदा शिवा सोबत मागे मागे चालत होता.
"आबा !! एवढ्या अंधाराच कोण आलं असेल !! " सदा घाबऱ्या आवाजात म्हणाला.
"बघुयात तरी !! " शिवा जोरात पुढे चालत चालत म्हणाला.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...