मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||


भाग ११

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,
"कोण ??"
"नमस्कार काका , मी सदाशिव , समीर दादा आहेत का ?? मी गाडी घेऊन आलोय!!"
"हो आहेत या !! पुण्याला जाण्यासाठीच एवढी तयारी चालू आहे !! बसा ईथे !! एक तासाभरात निघुयात आपण !! "
"ठीक आहे काक !! " सदाशिव शेजारीच ठेवलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला.

घरातली सगळी आवरा आवर झाल्यानंतर समीर काही राहील तर नाहीना पाहायला खोलीत आला, शीतल तिथे आधीच आवरत होती. समीरला पाहून ती थोडी गोंधळली, अचानक आपल्या जागेवर बसून राहिली. ती काहीतरी लपवते आहे हे कळायला समीरला वेळ लागला नाही.
"शीतल !! झालं ना तुझं आवरून??"
"हो !! झालंच आहे !! " शीतल स्वतःला सावरत म्हणाली.
"काय ग ?? बरी आहेस ना ??"
समीर असे म्हणताच शीतलने समीरला मिठी मारली. 
"ये शीतल !! काय झालंय सांग तरी ??"
"मला तुझ्याशिवाय नाही मन लागणार तिथे !! मी दाखवत नाही पण मी नाही राहू शकत समीर तुझ्याशिवाय !! "
"होका !! मग नको जाऊस !!"
"हो नाही जात मी !! सांगून टाकते बाबांना नको मला काही !! मला फक्त तू हवा आहेस !! तुझ्या सोबत माझं सगळं कुटुंब मला हवं आहे !!" 
शीतल खोलीतून बाहेर जाण्यासाठी निघते समीर तिला आपल्या जवळ करत बोलू लागतो.
" शीतल !! अस भावनिक नको बोलुस !! हे बघ आयुष्यात प्रत्येक रंग हे खूप महत्त्वाचे असतात, कधी प्रेम , कधी दुरावा, कधी एकांत तर कधी गर्दी.सगळं काही हवं असतं आपल्याला. म्हणूनच तर आयुष्य जगण्याची वेगळीच मजा येते. आज भलेही आपण एकमेकांपासून दूर असू , पण यामुळेच आपल्याला आपल्या बद्दलच प्रेम कळलं, नाही का ?? उद्या पुन्हा आपण एकत्र येऊ. आणि असही मी आणि तू शरीराने दूर असू पणं आपलं मन ,ते आहेच की अगदी एकमेकांत गुंतलेलं, आहे ना ??" समीर थोड हसत म्हणाला.
शीतल गालातल्या गालात हसत समीरकडे पाहत राहिली. थोड्या वेळाने बाबांनी बाहेरून समीरला हाक मारली. समीर पटकन बाहेर गेला. समोर सदाशिवला पाहून म्हणाला,

"सदा !! अरे कधी आलास तू ?? "
"आत्ताचं आलो दादा !! "
"बरं !! चला सगळं सामान ठेवूयात गाडीत आणि निघुयात!!"

सगळं सामान गाडीत ठेवल्यानंतर समीर ,शीतल ,आई बाबा आणि त्रिशा पुण्याला निघाले. गाडी सुसाट वेगाने पुण्याकडे निघाली. गाडीत बसलेली शीतल खिडकीतून पाहता पाहता नकळत आपल्या विचारात गुंग झाली,

" सगळं कसं क्षणात नीट झालं ना ?? बाबांच्या एका निर्णयाने माझ्यातला आणि समीर मधला दुरावा , कडवटपणा क्षणात नाहीसा झाला. यापूर्वीच मी हा विषय बाबांना बोलले असते तर आजपर्यंत हे सगळं घडलच नसतं. पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते तसच काहीस झालंय माझं. पहिल्यांदा उगाच आई न होण्याचा निर्णय , पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि मी आई झाले. पुन्हा त्रिशाला एकटं सोडून यायचा निर्णय.  सगळं नकळत घडतं गेल. पण असो, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं म्हणायचं . नाहीतर मला कस कळलं असतं की हे सगळे माझ्यावर किती प्रेम करतात ते. पण आता यापुढे अजिबात अस करणार नाही मी !! आई बाबा , समीर यांना विश्वासात घेऊनच आता कोणताही निर्णय घेणार आहे. " 
शीतल त्रिशाच्या आवाजाने भाणावर आली. समोर पाहते तर बाबा आणि त्रिशा खेळण्यात दंग झाले होते, बाबा जणू लहान मुलासारखे तिच्यासोबत खेळत होते. 

संध्याकाळी गाडी पुण्याला पोहचली. सगळे सामान फ्लॅटवर ठेवून आवरा आवर करुन सगळे दमले. बाबा आणि समीर उद्या गावी परत जायचं ठरलं. शीतल ऑफिसला निघाली की ते निघणार होते. रात्री सगळे केव्हा झोपी गेले कळलही नाही.

सकाळची सुरुवात त्या एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये त्रिशाच्या दंगामस्तीने झाली. आई सगळ्या फ्लॅट मध्ये फिरून पाहणी करत होती.  शेजारी कोण आहेत त्यांच्याशी बोलत होती.  शीतलला आज त्या फ्लॅट मध्ये राहावंसं वाटतं होत. शीतल त्या गडबडीतही ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. बाबा समीरही परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी तयार होत होते. आई सर्वांसाठी नाष्टा तयार करत होती. तिला या सगळ्या नवीन गोष्टींना क्षणात जुळवून घ्यायचं होत. 

"समीर !! " शीतल सगळं आवरून बाहेर येत हाक मारू लागली.
"हा शीतल ?? बोल !!"
"अरे काही नाही !! मी निघते आता !! तुम्ही रहा ना आजुन दोन तीन दिवस , आईनाही तेवढीच सोबत होईल !! अगदीच अचानक सगळा बदल मग त्यांना करमणार नाही इथे !!"
"शीतल !! तू नको काळजी करुस !! माझी नात आहेना सोबत माझ्या !! मग मला काही वाटणार नाही !!" आई मध्येच हसत म्हणाली.
"आणि शीतल माझी आजचीच रजा आहे !! मलाही उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे !!" समीर त्रिशाला कडेवर घेत म्हणाला.
"आता मला रहा नको बर म्हणुस !! नाहीतर माझा पाय नाही निघणार इथून !!" बाबा शीतलला हसत म्हणाले.
"मग नकाना जाऊ बाबा !!"
"समीर सोबत जाव लागेल शीतल !! " बाबा आपले अश्रू लपवत म्हणाले.
"ठीक आहे बाबा !! मी येऊ आता !! तुम्ही निवांत निघा गावी !!"
"हो शीतल !!" 

शीतल ऑफीसला जायला निघाली. दारात क्षणभर अडखळली. मागून नकळत तिला एक आवाज आला,
"आई !!"
समीर ,आई , बाबा सगळे आश्चर्याने पाहू लागले.
"आऽ ... ई !!! " त्रिशा अडखळत , बोबड बोलत शीतलकडे पाहून बोलत होती. जणू तिला बोलवत होती. 
"आऽ.... ई !!!" त्रिशा पुन्हा पुन्हा अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती.
 
शीतल क्षणभर जागेवर तशीच उभा राहिली. तिला काय बोलावं काहीच कळलं नाही. क्षणात ती धावत त्रिशाकडे आली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जणू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने तिला आपल्या जवळ घेतलं. तिचे कित्येक मुके घेतले. समीर , बाबा ,आई सगळ्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. सगळे आनंदाने त्या दोघींना पाहू लागले.
"म्हण !! पुन्हा म्हण त्रिशा !! माझे कान या शब्दासाठी आसुसले आहेत !! "
त्रिशा पुन्हा पुन्हा शीतलकडे पाहून आई म्हणत होती. जणू ती तिला सोडायलाच तयार नव्हती. 
"समीर तू ऐकलस ना !! आपली त्रिशा मला आई म्हणाली !! आई तुम्ही पणं ऐकलंय ना !! "
"हो शीतल !! हो !!"  आईनी शीतलला जोरात मिठी मारली. 

सगळे या प्रसंगाने आनंदून गेले. शीतल आनंदाने आपल्या ऑफिसला निघाली. बाबा आणि समीर आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा परत एकत्र येण्यासाठी. 

* समाप्त *

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...