मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ६ डिसेंबर || Dinvishesh 6 December ||



जन्म

१. रविंद्र जडेजा, भारतीय क्रिकेटपटू (१९८८)
२. शेखर कपूर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४५)
३. वसंत सबनीस, भारतीय लेखक, पटकथाकार (१९२३)
४. वॉरेन हस्टिंग्ज, ब्रिटिश सत्तेतील भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (१७३२)
५. R. पी. सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
६. मायकेल जोसेफ सेवेज, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८७२)
७. हरीप्रसाद शास्त्री, भारतीय संस्कृत अभ्यासक, इतिहासकार (१८५३)
८. गुंनार मुर्डल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१८९८)
९. अनुराधा भट्टाचार्य, भारतीय कवयत्री, लेखिका (१९७५)
१०. योशिहिदे सुगा, जपानचे पंतप्रधान (१९४८)
११. जसप्रीत बुम्राह, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
१२. सुचेता bhide- चापेकर, भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना (१९४८)
१३. करून नायर, भारतीय क्रिकेटपटू (१९९१)
१४. श्रेयस अय्यर, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)


मृत्यू

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (१९५६)
२. वर्नर वाॅन सिमेन्स, जर्मन संशोधक, उद्योगपती (१८९२)
३. बिना राय, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
४. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, पत्री सरकारचे संस्थापक (१९७६)
५. जोआओ गौलार्ट, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
६. वीरेंद्र सिंह, भारतीय चित्रपट अभिनेते , दिग्दर्शक (१९८८)
७. तूंकु अब्दुल रहमान, मलेशियाचे पहिले पंतप्रधान (१९९०)
८. वोल्फगांग पॉल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
९. कमलाकांत वामन केळकर, भारतीय भूविज्ञान वैज्ञानिक (१९७१)
१०. देवाण नायर, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
११. तिरुमलाई श्रीनिवासन, भारतीय क्रिकेटपटू (२०१०)
१२. रजनी बाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१०)

घटना

१. फिनलॅड या देशाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९१७)
२.  अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली, यामुळे उसळलेल्या दंगलीत १५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
३. स्पेनने नवीन संविधान स्वीकारले. (१९७८)
४. द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. (१८७७)
५. तुर्कीने सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानास मान्यता दिली. (१९२९)
६. भारताने बांगलादेश या देशास मान्यता दिल्या कारणाने पाकिस्तानने भारता सोबत राजनैतिक संबंध तोडले. (१९७१)
७. अँटोनीओ सेगणी यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६४)
८. हुगो चावेझ हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९८)


महत्व

१. महापरिनिर्वाण दिन
२. Saint Nicholas Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...