मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० डिसेंबर || Dinvishesh 10 December ||




जन्म

१. रती अग्निहोत्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६०)
२. सी. राजगोपालाचारी, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, लेखक (१८७८)
३. ऍडा लोवेलेस, इंग्लिश गणितज्ञ (१८१५)
४. एस. निजलिंगप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९०२)
५. व्हिक्टर मॅकलग्लेन, इंग्लिश अभिनेता (१८८६)
६. व्यंकटेश बळवंत पेंढारकर, भारतीय रंगभूमी अभिनेते ,गायक (१८९२)
७. हेमचंद्र बारूआ ,भारतीय लेखक (१८३६)
८. मनोज कुमार, भारतीय बॉक्सर (१९८६)
९. नेली साछस, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका, साहित्यिक (१८९१)
१०. डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर, भारतीय प्राच्यविद्यातज्ञ ,संस्कृत अभ्यासक (१८८०)
११. मोहम्मद अली जौहर, भारतीय मुस्लिम धर्मगुरू, लेखक ,कवी (१८७८)
१२. स्टँको तोडोरोव, बल्गेरियाचे पंतप्रधान (१९२०)
१३. के. सी. त्यागी, भारतीय राजकीय नेते (१९५०)
१४. हॉवर्ड मार्टिन, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९३४)

मृत्यू

१. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भारतीय लेखक ,कवी (२००९)
२. कुमुदलाल गांगुली तथा अशोक कुमार , भारतीय चित्रपट अभिनेते (२००१)
३. थॉमस सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८३१)
४. आल्फ्रेड नोबेल, नोबेल पारितोषिकचे निर्माता, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ (१८९६)
५. देवी मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४७)
६. श्रीकांत ठाकरे, भारतीय संगीतकार (२००३)
७. मॅकेंझी बॉवेल, कॅनडाचे पंतप्रधान (१९१७)
८. शंकर गणेश दाते, ग्रंथसुचीकार (१९६४)
९. होरॅस डॉज, डॉज मोटर कंपनीचे सहसंस्थापक (१९२०)
१०. जोजेफ थिओ, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९७१)
११. फ्रांजो तुडमन, क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९९)
१२. जॉन बेंनेत्त फेंन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१०)
१३. लाजुद्दिन अहमद, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (२०१२)


घटना

१. संगीत स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. (१९१६)
२. फ्रांसने ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली. (१५८२)
३. भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांना संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२०१४)
४. नोबेल पारितोषिक पहिल्यांदाच वितरण करण्यात आले. (१९०१)
५. पहिले नोबेल शांतता पुरस्कार हेन्री डूनंत आणि फ्रेडरिक पॅसी यांना देण्यात आले. (१९०१)
६. अर्थशास्त्रामध्ये प्रा. अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (१९९८)
७. विल्हेल्म रोंटजेन यांना भौतिकशास्त्रात पहिले नोबेल पुरस्कार देण्यात आले. (१९०१)
८. मेरी क्युरी आणि पियरे क्युरी यांना भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक देण्यात आले. (१९०३)
९. भारतीय बंगाली लेखक ,कवी रविंद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रात त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९१३)
१०. वूड्रो विल्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (१९१९)
११. मानुएल आझन हे स्पेनचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३१)
१२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (२००९)


महत्व

१. Nobel Prize Day
२. International Animal Rights Day
३. Human Rights Day
४. Dewey Decimal System Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...