मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ नोव्हेंबर || Dinvishesh 8 November ||




जन्म

१. लालकृष्ण आडवाणी, भारताचे ७वे उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक (१९२७)
२. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सुप्रसिद्ध मराठी लेखक, संगीतकार, दिग्दर्शक , पटकथा लेखक (१९१९)
३. उषा उत्थाप, भारतीय गायिका (१९४७)
४. एडमंड हॉले, इंग्लिश गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१६५६)
५. जिन कॅसिमिर - पेरियर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८४७)
६. ब्रेट ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९७६)
७. हर्बर्ट ऑस्टिन, ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक (१८६६)
८. अरविंद त्रिवेदी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते ,राजकीय नेते (१९३८)
९. मार्गारेट मिचेल, अमेरिकन लेखिका (१९००)
१०. जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेते इलेक्ट्रिक इंजिनियर (१९२३)
११. सितारादेवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना (१९२०)
१२. डॉ. कमल रणदिवे, कर्करोग संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञ (१९१७)


मृत्यू

१. मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचे महाराजा (१९३३)
२. जॉन मिल्टन, इंग्लिश कवी ,लेखक (१६७४)
३. विल्यम आयर्टन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
४. सुब्रतो मूकर्जी, भारतीय वायुसेना अधिकारी (१९६०)
५. ओमप्रकाश मेहरा, भारतीय एअर मार्शल (२०१५)
६. अब्राहम कुयपर, नेदरलँडचे पंतप्रधान (१९२०)
७. ऑटो फ्रेडरिक राउवेर्डर,अमेरिकन अभियंता , संशोधक (१९६०)
८. अमांची सुब्रह्मण्यम, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१३)
९. विटल्यी गिंसबर्ग, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (२००९)
१०. पीटर फाऊलर, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)

घटना

१. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
२. जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००२)
३. मोंटाना हे अमेरिकेचे ४१वे राज्य बनले. (१८८९)
४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याची घोषणा केली. (२०१६)
५. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. (१८६४)
६. चीनमध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ९००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८८)
७. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. (२०२०)
८. अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना करण्यात आली. (१९३२)

महत्व

१. World Town Planning Day
२. Intersex Day Of Remembrance
३. X-ray Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...