मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ ऑक्टोबर || Dinvishesh 7 October ||




जन्म

१. शरद केळकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
२. अश्विनी भिडे, भारतीय शास्त्रीय गायिका (१९६०)
३. झहीर खान, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
४. निएल्स बोहर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८५)
५. फर्नांडो टेरी, पेरूचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)
६. डेस्मंड टुटू, नोबेल शांतता पुरस्कार विजेते धर्मगुरू , समाजसेवक (१९३१)
७. प्रागजी डोस्सा, भारतीय गुजराती लेखक ,नाटककार (१९०७)
८. अभिजीत सावंत, भारतीय गायक (१९८१)
९. हरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३९)
१०. वि. म. कुलकर्णी , भारतीय मराठी कवी , साहित्यिक (१९१७)
११. व्लादिमीर पुतीनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९५२)


मृत्यू

१. गुरू गोबिंद सिंग, शिखांचे दहावे धर्मगुरु (१७०८)
२. भाऊसाहेब वर्तक, भारतीय राजकीय नेते (१९९८)
३. एंटोन फिलिप्स , फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक (१९५१)
४. एडगर पो, अमेरिकन लेखक ,कवी ,साहित्यिक (१८४९)
५. आल्फ्रेड डिकिन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९१९)
६. देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा, भारतीय कन्नड लेखक, कवी (१९७५)
७. मिल्का प्लानिंक, युगोल्सावियाचे पंतप्रधान (२०१०)
८. बिक्रम देओ, भारतीय राजकीय नेते (२००९)
९. मारिओ मोलीना, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०२०)
१०. उमाकांत निमराज ठोंबरे, भारतीय मराठी साहित्यिक, लेखक (१९९९)

घटना

१. नवजीवन नावाने महात्मा गांधी यांनी नवे वृत्तपत्र सुरू केले. (१९१९)
२. फॉक्स न्यूज हे न्यूझ चॅनल सुरू झाले. (१९९६)
३. डेव्हिड ग्युॅरियाॅन हे इस्राएलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५१)
४. एअर फ्रान्स या कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९३३)
५. हेलसिंकी स्टॉक एक्सचेंजला सुरुवात झाली. (१९१२)
६. होसणी मुबारक हे इजिप्तचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपला पदभार स्वीकारला. (१९८१)
७. मुलातू तेशोम हे इथिओपियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१३)
८. पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. (१९०५)


महत्व

१. You Matter To Me Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...