मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३१ ऑक्टोबर || Dinvishesh 31 October ||




जन्म

१. सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान (१८७५)
२. अडाॅल्फ वाॅन बेयर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८३५)
३. सी. के. नायडू, भारतीय क्रिकेटपटू (१८९५)
४. चीअंग काई- शेक, चीनचे पंतप्रधान (१८८७)
५. ओमकार कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८६)
६. नोरोडॉम् सीहानौक, कंबोडियाचे राजा (१९२२)
७. चिराग पासवान, भारतीय राजकीय नेते (१९८२)
८. जॉन पोपले, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२५)
९. ओमेन चांडी, केरळचे मुख्यमंत्री (१९४३)
१०. रामनाथ पारकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४६)
११. दीपा परब, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)


मृत्यू

१. इंदिरा गांधी, भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान (१९८४)
२. इस्टवन टिस्जा, हंगेरीचे पंतप्रधान (१९१८)
३. अमृता प्रीतम, भारतीय पंजाबी लेखिका (२००५)
४. पोरायाठू लीला, भारतीय गायिका (२००५)
५. अँटनिओ आल्मेडा, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
६. राजचंद्रा बोस, भारतीय गणितज्ञ (१९८७)
७. सचिन देव बर्मन, भारतीय गायक, संगीतकार (१९७५)
८. राधा बर्नियर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
९. रॉबर्ट मुल्लिकेन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८६)
१०. वॉलान्स रोलिंग, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९९५)
११. मीचैल स्तासिनोपौलास, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (२००२)
१२. सुमती गुप्ते, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (२००९)

घटना

१. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. (१९८४)
२. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९६६)
३. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. (१९२०)
४. नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. (१८६४)
५. जॉन बोयड दूनलोप यांनी हवेच्या दाबावर चालणाऱ्या सायकलच्या टायरचे पेटंट केले. (१८८८)
६. ब्रिटन आणि फ्रान्सने तुर्की विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१४)
७. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या तीव्र चक्रीवादळात १०,००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६०)
८. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. (१९८४)
९. तूर्गात ओझाल हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)
१०. महाथिर बिन मोहम्मद यांनी मलेशियाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (२००३)
११. जगातील सर्वात उंच पुतळा statue Of Unity चे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी अनावरण करण्यात आले. (२०१८)


महत्व

१. World Cities Day
२. Halloween
३. National Unity Day - India

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...