मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ ऑक्टोबर || Dinvishesh 27 October ||




जन्म

१. के. आर. नारायणन, भारताचे उपराष्ट्रपती , दहावे राष्ट्रपती (१९२०)
२. अनुराधा पौडवाल, भारतीय गायिका (१९५२)
३. इरफान पठाण, भारतीय क्रिकेटपटू (१९८४)
४. पूजा बत्रा,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६)
५. गिओवांनी गिओलित्ती, इटलीचे पंतप्रधान (१८४२)
६. थिऑडोर रुझवेल्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५८)
७. मोहन कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
८. डॉ. विकास आमटे, भारतीय समाजसेवक (१९४७)
९. भास्कर रामचंद्र तांबे, भारतीय कवी ,लेखक (१८७४)
१०. लुईज इनाडो लुला डा सिल्वा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४५)
११. सुदेश लेहरी, भारतीय विनोदी कलाकार (१९६८)
१२. दत्ता गायकवाड, भारतीय क्रिकेटपटू (१९२८)
१३. जतिंद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारी (१९०४)


मृत्यू

१. सी. पी. रामानुजम , भारतीय गणितज्ञ (१९७४)
२. पेशवा सवाई माधवराव (१७९५)
३. वैकुंठ मेहता, भारतीय सहकारी चळवळीचे प्रवर्तक (१९६४)
४. भा. रा. भागवत, भारतीय लेखक (२००१)
५. उस्ताद अब्दुल करीम खाँ, किराणा घराण्याचे संस्थापक (१९३७)
६. प्रदीप कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (२००१)
७. विजय मर्चंट, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
८. जॉन व्हॅन व्लेक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८०)
९. सत्येन कप्पू, भारतीय चित्रपट अभिनेते (२००७)
१०. नेस्तोर किरच्णेर, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)


घटना

१. तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
२. वॉटर स्कींगचे पेटंट फ्रेड वॉलरने केले. (१९२५)
३. सेलाल बयार हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५७)
४. मंगोलिया आणि माॅरिटानिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९६१)
५. पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लष्करी उठाव करत राष्ट्राध्यक्ष इस्कांदर मिर्झा यांना पदच्युत केले. (१९५८)
६. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
७. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्व

१. World Day For Audiovisual Heritage
२. Boxer Shorts Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...