मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ ऑक्टोबर || Dinvishesh 15 October ||




जन्म

१. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती , वैज्ञानिक (१९३१)
२. सेठ गोविंद दास, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९६)
३. प्रणोय राॅय , एन. डी. टी. व्हीचे संस्थापक (१९४९)
४. इटो हिरोबुमी, जपानचे पहिले पंतप्रधान (१८४१)
५.अकबर , मुघल सम्राट (१५४२)
६. जोस मीग्वेल कॅरेरा, चीलीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१७८५)
७. मुख्तार अब्बास नक्वी, भारतीय केंद्रीय मंत्री, राजकीय नेते (१९५७)
८. भाऊराव गायकवाड, भारतीय राजकीय नेते. (१९०२)
९. भारती आचरेकर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९५७)
१०. छगन भुजबळ, भारतीय केंद्रीय मंत्री ,राजकीय नेते (१९४७)
११. विल्हेल्म मिक्लस, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७२)
१२. मोशे शारेट्ट, इस्राएलचे पंतप्रधान (१८९४)
१३. पंडित संजीव अभ्यंकर, मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक (१९६९)
१४. नारायण गंगाराम सुर्वे, भारतीय कवी ,लेखक (१९२६)
१५. साली बेरिषा, अल्बेनियाचे पंतप्रधान (१९४४)


मृत्यू

१. साई बाबा, शिर्डी,  भारतीय गुरू (१९१८)
२. सूर्यकांत त्रिपाठी निराला, भारतीय हिंदी साहित्यिक (१९६१)
३. वसंत सबनीस, भारतीय लेखक ,चित्रपट पटकथालेखक (२००२)
४. ना. सं. इनामदार, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (२००२)
५. दत्ता गोर्ल, भारतीय मराठी चित्रपसृष्टीतील छायालेखक (१९९७)
६. माता हारी, पहिल्या महायुद्धातील डच नर्तिका (१९१७)
७. रेमंड पोईंवरे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९३४)
८. ओम शिवपुरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
९. बाबा कांशीराम, भारतीय कवी , लेखक , स्वातंत्र्य सेनानी (१९४३)
१०. पियररे लावल, फ्रान्सचे पंतप्रधान (१९४५)
११. नोर्डोम सिहानोक, कंबोडिया देशाचे पंतप्रधान (२०१२)

घटना

१. हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर झाला. (१९६८)
२. भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९७)
३. बांगलादेशातील रहिमा बानू ही मुलगी देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली. (१९७५)
४. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली. (१८८८)
५. टाटा एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान कराची ते मुंबई झेपावले त्यावेळी एका विमान प्रवासाचे भाडे २०,०००₹ आकारण्यात आले.  (१९३२)
६. त्रिपुरा हे राज्य भारतात विलीन झाले. (१९४९)
७. केतुमिले मासायर्स हे बोटस्वानाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९४)


महत्व

१. वाचन प्रेरणा दिवस
२. International Day Of Rural Women
३. Global Handwashing Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...