मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ ऑक्टोबर || Dinvishesh 14 October ||




जन्म

१. गौतम गंभीर , भारतीय क्रिकेटपटू, राजकीय नेते (१९८१)
२. सुभाष भेंडे , भारतीय मराठी लेखक (१९३६)
३. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक , साहित्यिक (१९२४)
४. जॉर्ज ग्रेनविल्ल, ब्रिटिश पंतप्रधान (१७१२)
५. राल्फ लाॅरेन , राल्फ लॉरेन कंपनीचे संस्थापक (१९३९)
६. उस्ताद शाहिद परवेझ, इटावा घराण्याचे सतार वादक, गायक (१९५८)
७. एमाॅन दे वलेरा, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
८. ड्वाईट आयसेनहाॅवर ,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८९०)
९. सतीश महाना, भारतीय राजकीय नेते (१९६०)
१०. रॉजर मूर, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९२७)
११. पर्मित शेठी, भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माता (१९६१)
१२. राजा नवाथे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९२४)
१३. आशर रेमंड, अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता (१९७८)
१४. निखिल बॅनर्जी, मैहर घराण्याचे सतारवादक (१९३१)


मृत्यू

१. ओम प्रकाश शर्मा , भारतीय लेखक (१९९८)
२. हेरॉल्ड रॉबिन्स, अमेरिकन कादंबरीकार (१९९७)
३. लालचंद हिराचंद दोशी, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष (१९९३)
४. अब्रम जोफ्फे, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६०)
५. बिंग क्राॅस्बी, अमेरिकन गायक, अभिनेता (१९७७)
६. दशरथ देब, त्रिपुराचे मुख्यमंत्री (१९९८)
७. मार्टिन रील, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१९८४)
८. ज्युलियस न्येरेरे, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९९)
९. राधाकृष्ण हरिराम तहलियानी, भारतीय नौसेनाधिपती (२०१५)
१०. मोहन धारिया, भारतीय राजकीय नेते (२०१३)
११. नरसिंह चिंतामण केळकर, भारतीय साहित्यसम्राट (१९४७)

घटना


१. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पदवी अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. (१९२०)
२. भारतात पंजाब विद्यापीठाची स्थापना (सध्या पश्चिम पाकिस्तान )करण्यात आली. (१८८२)
३. जॉर्ज ईस्टमॅन यांनी पेपर स्ट्रिप फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८४)
४. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (१९५६)
५. मार्टिन ल्यूथर किंग यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९६४)
६. चार्ल्स यॅगर या वैमानिकाने x १ या विमानातून ध्वनिपेक्षा जास्त वेगाने यशस्वी उड्डाण करून इतिहास रचला. (१९४७)


महत्व

१. World Standards Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...