मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ सप्टेंबर || Dinvishesh 22 September ||




जन्म

१. डॉ. भाऊराव पाटील, भारतीय शिक्षणतज्ञ (१८८७)
२. मायकल फॅराडे , इंग्लिश शास्त्रज्ञ (१७९१)
३. शिगेरू योशिदा, जपानचे पंतप्रधान (१८७८)
४. एन. कृष्णन पिल्लई, भारतीय मल्याळम लेखक (१९१६)
५. चार्ल्स हुग्गिनस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०१)
६. अनंत माने, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९१५)
७. रामकृष्ण बजाज, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२३)
८. चेन निंग यांग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
९. पवन कुमार चामलिंग, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९५०)
१०. व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१८६९)
११. रवी जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९७१)


मृत्यू

१. गुरु नानक, शीख धर्म संस्थापक, शिखांचे पहिले गुरू (१५३९)
२. दुर्गा खोटे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९१)
३. कार्लो स्टांहबलर्ग, फिनलंडचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९५२)
४. एस. वरालक्ष्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
५. फ्रेडरिक सोद्दी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५६)
६. अडॉल्फो मटिओस, मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
७. बिभू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०११)
८. मंसूर अली खान पतौडी, भारतीय क्रिकेटपटू (२०११)
९. जॉर्ज सी. स्कॉट, अमेरिकन अभिनेते (१९९९)
१०. शरदेंदू बंधोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक (१९७०)

घटना

१. जर्मन जहाजाने हल्ला केल्यामुळे ब्रिटिश जहाज समुद्रात बुडाले , यामध्ये १५००हून अधिक ब्रिटिश लोक मृत्यूमुखी पडले. (१९१४)
२. भारत पाकिस्तानमध्ये चालू असलेले युद्ध संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर थांबले. (१९६५)
३. माली पूर्वीचे फ्रेंच सुडानने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले. (१९६०)
४. भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९८)
५. इराकने इराण पादाक्रांत केले. (१९८०)
६. इराकने संविधान स्वीकारले. (१९६८)
७. चीनने अणुबॉम्ब चाचणी लोप नोर या ठिकाणी केली. (१९६९)
८. बेसलच्या तहानंतर स्विझरलँड हा स्वतंत्र देश म्हणून ओळखला जावू लागला. (१४९९)
९. पाकिस्तान मधील चर्च मध्ये झालेल्या आत्मघात बॉम्ब स्फोटात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
१०. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमेरिकेतील ह्युस्टन या शहरात "Howdy , Modi!! " नावाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. (२०१९)

महत्व

१. International Day Of Radiant Peace
२. World Rhino Day
३. World Car Free Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...