मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ सप्टेंबर || Dinvishesh 13 September ||




जन्म

१. उषा नाडकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४६)
२. डॅनिएल देफो, इंग्लिश लेखक (१६६०)
३. डॉ. प्रभा अत्रे, भारतीय शास्त्रीय गायिका (१९३२)
४. महिमा चौधरी, भारतीय चित्रपट अभिनेत्री 
५. महंत स्वामी महाराज, भारतीय धर्मगुरू, स्वामीनारायण संस्थानचे महंत (१९३३)
६. राजीव शुक्ला, भारतीय राजकीय नेते, इंडियन प्रीमियर लीगचे भूतपूर्व चैरमन (१९५९)
७. आर्थर हेंडरसन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते ब्रिटिश राजकीय नेते (१८६३)
८. रॉलड डाहल, ब्रिटिश लेखक (१९१६)
९. ऑस्कर संचेझ, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९४०)
१०. अहमत सेझर, तूर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
११. शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९६९)
१२. गणेश आगाशे, भारतीय प्रतिभावंत शिक्षक (१८५२)


मृत्यू

१. लालजी पांडे, भारतीय गीतकार (१९९७)
२. श्रीधर पाठक, भारतीय हिंदी कवी , साहित्यिक (१९२८)
३. रेणे गोब्लेट, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०५)
४. जतीनंद्र दास , भारतीय क्रांतिकारक (१९२९)
५. लुईस ई. मिर्मोंट्स, गर्भनिरोधक गोळ्यांचे संशोधक (२००४)
६. नूर इनायत खान, भारतीय ब्रिटिशांची दुसऱ्या महायुद्धातील सैन्य अधिकारी (१९४४)
७. अल्बर्ट टेशियेर, फ्रेंच इतिहासकार (१९७६)
८. एस. के. अमीन ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९५)
९. केशवराव त्र्यंबक दाते, भारतीय मराठी चित्रपट, रंगभूमी अभिनेते (१९७१)
१०. मामा परमानंद, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (१८९३)
११. आचार्य आत्रेया, भारतीय तेलगू कवी ,लेखक (१९८९)


महत्व

१. भारतीय सैन्याने हैद्राबाद संस्थान भारतात विलिनीकरण करण्यासाठी हैद्राबादवर चढाई केली. याला ऑपरेशन पोलो म्हणूनही ओळखले जाते. (१९४८)
२. हॅनीबल गुडविन यांनी सेल्युलॉईड फोटोग्राफीक फिल्मचे पेटंट केले. (१८९८)
३. अडोल्फो रुइज् मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५२)
४. वर्ल्ड हॉकी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. (१९७१)
५. सुपर मारिओ गेम जपानमध्ये पहिल्यांदाच रिलिज करण्यात आली. (१९८५)
६. इराक मधील बगदाद मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्व

१. International Program's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...