मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ ऑगस्ट || Dinvishesh 7 August ||




जन्म

१. सुरेश वाडकर, भारतीय गायक, संगीत दिग्दर्शक (१९५५)
२. एम. एस. स्वामीनाथन, पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण ,भारताचे अनुवंशशास्त्रज्ञ, हरित क्रांतीचे जनक (१९२५)
३. ओम प्रकाश जिंदल, भारतीय राजकीय नेते, उद्योगपती (१९३०)
४. अबनिंन्द्रनाथ टागोर, भारतीय चित्रकार (१८७१)
५. महेश दत्तान, भारतीय लेखक, दिग्दर्शक (१९५८)
६. रल्फ बंचे, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन मुत्सद्दी (१९०४)
७. जीन - लूक देहेणे, बेल्जियमचे पंतप्रधान (१९४०)
८. दीपक चहर, भारतीय क्रिकेटपटू (१९९२)
९. जेम्स अल्लिसन, नोबेल पारितोषिक विजेते रोगप्रतिकारकशक्ती तज्ञ (१९४८)
१०. जिमी वेल्स, विकिपीडियाचे सहसंस्थापक (१९६६)
११. देबु मित्रा, भारतीय क्रिकेटपटू (१९४८)
१२. चद्रकांत टोपीवाला, गुजराती लेखक कवी साहित्यिक (१९३६)


मृत्यू

१. रविंद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यीक, भारतीय कवी ,लेखक , विचारवंत (१९४१)
२. अंजनिबाई मालपेकर, भारतीय शास्त्रीय गायिका (१९७४)
३. फ्रेडरिक वॉन स्पी, जर्मन लेखक (१६३५)
४. मारियानो अरिस्टा, मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१८५५)
५. ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन विनोदी अभिनेते, लॉरेल आणि हार्डी मधील हार्डी (१९५७)
६. जेकब बर्जेलिअस, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ (१८४८)
७. केमिले चामौन, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष (१९८७)
८. शपुर बहतिर, इराणचे पंतप्रधान (१९९१)
९. टॉम स्कॉट, स्कॉटिश लेखक कवी (१९९५)
१०. नोबुसुके किशी, जपानचे पंतप्रधान (१९८७)

घटना

१. जर्मन सैन्याने लिजे हे बेल्जियम देशातील शहर ताब्यात घेतले. (१९१४)
२. लीन कॉक्स यांनी अमेरिका ते सोव्हिएत युनियन पोहून पार केले , असे करणारे ते पहिले व्यक्ती होत. (१९८७)
३. रिचर्ड बेडफोर्ड बेनेट हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९३०)
४. गल्फ युद्धासाठी अमेरिकन सैन्य सौदी अरेबियात पोहचले. (१९९०)
५. अपोलो १५ हे अंतराळयान पृथ्वीवर परतले. (१९७१)
६. अर्नेस्टो सम्पर यांनी कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९९४)
७. द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र १२८ वर्ष प्रकाशित झाल्यानंतर बंद झाले. (१९८१)
८. मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. (१९४७)
९. पाकिस्तानमधील कराची येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्व

१. Purple Heart Day
२. Professional Speaker's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...