मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ५ ऑगस्ट || Dinvishesh 5 August ||




जन्म

१. काजोल देवगण, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
२. सुरेश मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१९३६)
३. वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेटपटू (१९६९)
४. गिरिजा देवी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९२९)
५. जेनेलिया डिसूझा- देशमुख, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
६. डिओडोरो दा फॉन्सेका, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८२७)
७. वासेल्यी लिओंतिफ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९०६)
८. वासुदेवशास्त्री खरे , भारतीय लेखक ,कवी , नाटककार (१८५८)
९. हरोल्ड हॉल्ट, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९०८)
१०. जितेंद्र आव्हाड, भारतीय राजकीय नेते (१९६५)
११. बेझवादा गोपाला रेड्डी, उत्तरप्रदेशचे राज्यपाल (१९०७)
१२. देवन नायर, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
१३. नील आर्मस्ट्राँग, अमेरीकन अंतराळवीर, चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर (१९३०)
१४. दत्तो वामन पोतदार, पद्मविभूषण पुरस्कार विजेते, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (१८९०)
१५. रमाकांत खळप, गोव्याचे उपमुख्यमंत्री (१९४७)
१६. ह्यून सेन, कंबोडियाचे पंतप्रधान (१९५२)
१७. विजया राजाध्यक्ष, भारतीय लेखिका (१९३३)

मृत्यू

१. लाला अमरनाथ भारद्वाज, भारतीय क्रिकेटपटू, स्वतंत्र भारतातील क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार (२०००)
२. फ्रेडरिक नॉर्थ, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान (१७९२)
३. हेन्रीक ऑटो वियलाॅड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५७)
४. ऑर्थर मिघेन, कॅनडाचे पंतप्रधान (१९६०)
५. सुईचिरो होंडा, होंडा कंपनीचे संस्थापक (१९९१)
६. के. पी. आर. गोपलन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९९७)
७. सिडनी हॉलंड, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९६१)
८. भगत पुरण सिंघ, भारतीय लेखक , पर्यावरणवादी (१९९२)
९. अच्युतराव पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनक , विचारवंत (१९९२)
१०. रॉबर्ट मुल्डून, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९९२)
११. ओटेमा अल्लिमदी, युगांडाचे पंतप्रधान (२००१)
१२. अरविंद आपटे, भारतीय क्रिकेटपटू (२०१४)

घटना

१. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीरचे विभाजन करून दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली, जम्मू आणि काश्मीर एक भाग तर लद्दाख दुसरा असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. (२०१९)
२. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. (२०२०)
३. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धास सुरुवात झाली. (१९६५)
४. जपानमध्ये आणिबाणी घोषीत करण्यात आली. (१८८२)
५. ओहायो येथे पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. (१९१४)
६. नेल्सन मंडेला यांना भडकावू भाषण तसेच बेकायदेशीररीत्या दक्षिण आफ्रिकेत राहणे या आरोपाखाली अटक करण्यात आली. (१९६२)
७. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक बेघर झाले. (२०१३)

महत्व

१. World Traffic Light Day
२. Work Like A Dog Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...