मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३१ ऑगस्ट || Dinvishesh 31 August ||



जन्म

१. जवागल श्रीनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९६९)
२. जयवंत कुलकर्णी, भारतीय गायक (१९३१)
३. अम्रीता प्रीतम, भारतीय लेखिका (१९१९)
४. राजश्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४५)
५. रॅमन मॅगसेसे, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९०७)
६. ट्साई इंग- वेन, रिपब्लिक ऑफ चायनाच्या 7व्या राष्ट्राध्यक्षा (१९५६)
७. मकरंद देशपांडे, भारतीय लेखक, साहित्यिक (१९६०)
८. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक, कादंबरीकार (१९४०)
९. मोहम्मद बिन सलमान, सऊदी अरेबियाचे राजकुमार (१९८५)
१०. ऋतुपर्णा घोष, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक (१९६३)
११. मारिया माँटेसरी, इटालियन डॉक्टर, शिक्षणतज्ञ (१८७०)


मृत्यू

१. महावीर शाह, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०००)
२. जॉन बुण्यान, इंग्लिश लेखक (१६८८)
३. जॉन मॅककिन्ली, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१७९६)
४. अंद्रे देबिर्णे, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९४९)
५. पेंड्याल नागेश्वर राव, भारतीय गीतकार, संगीतकार (१९८४)
६. काशीराम राणा, भारतीय राजकीय नेते (२०१२)
७. नॉर्मन किरक, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९७४)
८. फ्रँक बर्नेट, नोबेल पारितोषिक विजेते जीवरेणूशास्त्रज्ञ (१९८५)
९. सरदार बियंत सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री (१९९५)
१०. उर्हो केक्कोनेन, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९८६)
११. जॉर्ज पोर्टर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००२)
१२. ताराबाई मोडक, बालमंदिराच्या निर्मात्या (१९७३)
१३. सुबय्या सिवशंकरनारायण पिल्लई, भारतीय गणितज्ञ (१९५०)
१४. जोसेफ रॉटब्लाट, नोबेल शांतता पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००५)
१५. प्रणब मुखर्जी, भारताचे १३वे राष्ट्रपती (२०२०)


घटना

१. खिलाफत चळवळीला सुरुवात झाली. (१९२०)
२. मिकाह रग यांनी नट बोल्टच्या मशीनचे पेटंट केले. (१८४२)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी कायनेटोस्कोपचे पेटंट केले. (१८९७)
४. त्रिनिदाद व टोबॅगो हे ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाले. (१९६२)
५. श्रीलंकेने संविधान स्वीकारले. (१९७८)
६. अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर रोव्हर चालवणारे पहिले व्यक्ती ठरले . (१९७१)
७. किरगिझिस्तानला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
८. मलेशियाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९५७)

महत्व

१. International Whiskey Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...