मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ ऑगस्ट || Dinvishesh 23 August ||




जन्म

१. गोविंद विनायक करंदीकर तथा विंदा करंदीकर , भारतीय मराठी लेखक ,कवी, साहित्यिक (१९१८)
२. सायरा बानो, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४४)
३. केनेथ अर्रो, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२१)
४. राधा गोबिंद कार, भारतीय वैद्य ,समाजसेवक (१८७२)
५. वाणी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
६. भूपेश बघेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री (१९६१)
७. हाऊरी बाउमेडीन्स, अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२७)
८. मायकेल रोकर्ड, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३०)
९. तांगुतुरी प्रकासम, आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (१८७२)
१०. रॉबर्ट कर्ल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३३)
११. कृष्णकुमार कुंनाथ तथा केके , भारतीय गायक (१९७०)
१२. गौहार खान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८३)
१३. बलराम जाखर, मध्यप्रदेशचे राज्यपाल (१९२३)


मृत्यू

१. हंसा वाडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७१)
२. डिओडोरो दा फॉन्सेका, ब्राझीलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८९२)
३. स्टॅनफोर्ड मूरे, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९८२)
४. डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी ग्रंथकार (१९७४)
५. एरिया गेयरी, ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान (१९९७)
६. के. अय्याप्पा पनिकर, भारतीय मल्याळम लेखक ,कवी (२००६)
७. रैन्हॉर्ड सेल्टेन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१६)
८. चार्ल्स कुलॉम, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१८०६)
९. पंडित विनायकराव पटवर्धन , भारतीय शास्त्रीय गायक (१९७५)
१०. ए. एन. मूर्ति राव, भारतीय लेखक (२००३)

घटना

१. आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र देश झाला. (१९९०)
२. युनायटेड किंग्डमने हाँगकाँग ताब्यात घेतले. (१८३९)
३. चारचाकी वाहनांच्या टायरला लावण्याची चैनचे पेटंट करण्यात आले. (१९०४)
४. दुसऱ्या महायुद्धात स्टालिन ग्राडची लढाई सुरू झाली. (१९४२)
५. वर्ल्ड वाइड वेब सार्वजनिक वापरासाठी सुरू करण्यात आले. (१९९१)
६. विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२००५)
७. बाचिर गेमायेल हे लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८२)
८. मुअम्मर गद्दाफी या लिबियाच्या हुकुमशहाची सत्ता संपुष्टात आली. (२०११)
९. भारतातील राजस्थानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० लोकांचा मृत्यू झाला. (२०१२)


महत्व

१. Internaut Day
२. International Day For The Remembrance Of The Slave Trade And It's Abolition

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...