मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ ऑगस्ट || Dinvishesh 2 August ||




जन्म

१. विजय रुपाणी, गुजरातचे मुख्यमंत्री (१९५६)
२. आचार्य प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१८६१)
३. सिद्धार्थ रॉय कपूर, भारतीय चित्रपट निर्माता (१९७४)
४. जॅक एल. वॉर्नर, वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (१८९२)
५. पिंगाली वेंकय्या, भारतीय ध्वजाचे रचनाकार (१८९६)
६. बेल्लारी राघवा, भारतीय तेलगू थिएटर अभिनेते (१८८०)
७. रोमुलो गॅलेगोस, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
८. शिमोन पेरिस, इस्राएलचे पंतप्रधान (१९२३)
९. जॉन टिंडाल, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (१८२०)
१०. रमेश बाईस, झारखंडचे राज्यपाल (१९४८)
११. अर्शद अयुब, भारतीय क्रिकेटपटू (१९५८)

मृत्यू

१. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक, टेलिफोनचे संशोधक(१९२२)
२. व्ही. बालकृष्णन, भारतीय लेखक (२००४)
३. वॉरेन जी. हर्डींग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
४. व्ही. दक्षिणामूर्थी, भारतीय संगीतकार (२०१३)
५. पॉल वाॅन हिंडेनबर्ग, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९३४)
६. अँटोन नोगेस, मोनॅको ग्रांपीचे संस्थापक (१९७८)
७. विल्यम एस. बर्रौघ, अमेरिकन लेखक (१९९७)
८. मिशेल देब्रे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९९६)
९. रमकिंकर बैज, भारतीय शिल्पकार (१९८०)
१०. मीना कृसेमान, डच लेखिका (१९२२)

घटना

१. अमेरिकेत पहिल्यांदाच जनगणना करण्यास सुरुवात झाली. (१७९०)
२. सॅमुएल ब्रिग्स यांनी नेल मेकिंग मशीनचे पेटंट केले. (१७९१)
३. डच सैन्याने बेल्जियम काबिज केले. (१८३१)
४. काल्व्हिन कूलिज हे अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२३)
५. चीनमध्ये आलेल्या चक्रीवादळात  ६०,००० लोक मृत्यूमुखी पडले. (१९२२)
६. इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यानंतर गुल्फ युद्धास सुरुवात झाली. (१९९०)
७. पाकिस्तानच्या लाहोर येथे भाजी मार्केटमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट ऑफिस लॉन्च करण्यात आले. (१९८८)
९. ॲपल मॅकचे पहिले ऑफिस सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आले. (१९८९)
१०. बिटकॉइन कॅश पहिल्यांदाच वापरात आली. (२०१७)


महत्व

१. Leave A Penny Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...