मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३१ जुलै || Dinvishesh 31 July ||




जन्म

१. मोहन लाल सुखाडिया, राजस्थानचे मुख्यमंत्री (१९१६)
२. मिल्टन फ्रीडमन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१२)
३. अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री (१९४१)
४. पिटर रोसेग्गर , नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१८४३)
५. धनपट राय श्रीवास्तव तथा मुंशी प्रेमचंद, भारतीय सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक (१८८०)
६. के. शंकर पिल्लई, भारतीय लेखक , व्यंगचित्रकार (१९०२)
७. कियारा अडवाणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
८. गोपाल प्रसाद , भारतीय गणितज्ञ (१९४५)
९. पॉल डी. बॉयेर, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९१८)
१०. वैद्यनाथस्वामी संन्थनाम्, भारतीय वैज्ञानिक (१९२५)
११. जे. के. रोलिंग, इंग्लिश लेखिका (१९६५)
१२. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, संतसाहित्याचे अभ्यासक (१८७२)
१३. दामोदर धर्मानंद कोसंबी, भारतीय गणितज्ञ (१९०७)

मृत्यू

१. उधम सिंग, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९४०)
२. मोहम्मद रफी, भारतीय गायक , संगीतकार (१९८०)
३. डॅनिश दिडेरोट, फ्रेंच लेखक (१७८४)
४. धीरन चिन्नमलाई, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८०५)
५. श्रीपाद दामोदर सातवळेकर, भारतीय चित्रकार (१९६८)
६. अँड्र्यू जोहन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८७५)
७. रिचर्ड कुहन, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९६७)
८. नबरूण भट्टाचार्य, भारतीय पत्रकार (२०१४)
९. फ्रान्सिस्को गोम्स, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
१०. व्ही.  जी. सिद्धार्था, भारतीय उद्योगपती (२०१९)

घटना

१. जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश झाला. (१९९२)
२. बेंजामिन चेंबर्स यांनी ब्रीच लोडींग कॅननचे पेटंट केले. (१८४९)
३. तिबेटमध्ये चीन विरोधात आंदोलन सुरू झाली.(१९५८)
४. चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्र रेंजर ७ या अंतराळयानाने पाठवले. (१९६४)
५. अर्टुरो इल्लिया हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६३)
६. अपोलो १५ या मोहिमेत डेव्हिड स्कॉट आणि जेम्स अर्विन यांनी चंद्राच्या जमिनीवर सहा ते सात तास लूनार रोव्हर वेहिकल चालवत चंद्राच्या विवीध जागेचे नमुने गोळा केले. (१९७१)
७. नेपाळमध्ये डोंगराळ भागात झालेल्या बस दुर्घटनेत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
८. भारतीय चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२००१)

महत्व


१.  World Ranger Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...