मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ जुलै || Dinvishesh 26 July ||




जन्म

१. पंकजा मुंडे, भारतीय राजकीय नेत्या (१९७९)
२. जुगल हंसराज, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
३. मुग्धा गोडसे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
४. ऑगस्ती बीर्नर्त, बेल्जियमचे पंतप्रधान (१८२९)
५. सुरेद्रनाथ टागोर, भारतीय बंगाली लेखक (१८७२)
६. जॉर्ज बर्नार्ड शॉ, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८५६)
७. मालती चौधुरी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्त्या (१९०४)
८. पंडीत कृष्णराव शंकर पंडीत, भारतीय गायक (१८९३)
९. वासुदेव गोविंद मायदेव, भारतीय लेखक कवी (१८९४)
१०. साल्वाडोर अल्लेंडे, चीलिचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
११. गुलाबराव रामचंद, भारतीय क्रिकेटपटू (१९२७)
१२. जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९३९)
१३. थाकसिन शिनावत्रा, थायलंडचे पंतप्रधान (१९४९)
१४. वलदिमिर मेसीयर, स्लोव्हेकियाचे पंतप्रधान (१९४२)
१५. संड्रा बुलॉक, हॉलिवुड चित्रपट अभिनेत्री (१९६४)
१६. जसोन स्टॅथम, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९६७)
१७. अल्डस हक्सले, इंग्लिश लेखक (१८९४)
१८. जसिंड अर्डर्णे, न्युझीलंडच्या पंतप्रधान (१९८०)
१९. जगदीश भागवती, भारतीय वंशिय अमेरीकन अर्थतज्ञ (१९३४)
२०. असिफ अली झरदारी, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)

मृत्यू

१. भास्कर चंदावरकर, भारतीय मराठी नाट्य चित्रपट संगीतकार (२००९)
२. एलेना पिस्कॉपिया, इटालियन गणितज्ञ (१६८४)
३. कांचन दिनकरराव मैल, भारतीय गायिका (२००४)
४. गोट्टलोब फ्रेगे, जर्मन गणितज्ञ (१९२५)
५. जुत्ता हेकर, जर्मन लेखक (२००२)
६. शिवकांत तिवारी, भारतीय राजकीय नेते (२०१०)
७. मधुसुदन कानुंगो, भारतीय वैज्ञानिक (२०११)
८. ओबैद सिद्दीकी, भारतीय संशोधक (२०१३)
९. हेन्री लेबेसगुई, फ्रेंच गणितज्ञ (१९४१)
१०. बिजोय कृष्णा हांडिक, भारतीय राजकीय नेते (२०१५)

घटना

१. भारताने पाकिस्तानी सैन्याने कारगिल येथे केलेली घुसखोरी रोखत त्यांना पिटाळून लावले, भारताने कारगिल युद्ध जिंकले, (१९९९)
२. न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले. (१७८८)
३. अमेरिकेत पहिल्यांदाच साखर कारखाना सुरू करण्यात आला. (१८३५)
४. नेदरलँड आणि जर्मनी मधील युद्ध संपुष्टात आले. (१९५१)
५. महिलांचा पहिला क्रिकेट सामना गिल्फॉर्ड इंग्लंड येथे झाला. (१७४५)
६. दक्षिण कोरिया मध्ये बोईंग विमान दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
७. लायबेरिया हा देश स्वतंत्र झाला. (१८४७)
८. विश्वनाथन आनंद यांना चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९८)
९. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली यामध्ये शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
१०. मालदीव ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाले. (१९६५)

महत्व

१. कारगील विजय दिवस
२. One Voice Day
३. Aunt And Uncle's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...