मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ जुलै || Dinvishesh 21 July ||




जन्म

१. मल्लिकार्जुन खरगे, भारतीय राजकीय नेते (१९४२)
२. थॉमस पेहलम - हॉलेस, ब्रिटीश पंतप्रधान (१६९३)
३. चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेटपटू (१९३४)
४. आनंद बक्षी, भारतीय गीतकार (१९२०)
५. वि. स. पांगे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९१०)
६. अर्नेस्ट हेमिंग्वे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८९९)
७. उमाशंकर जोशी, भारतीय गुजराती लेखक कवी (१९११)
८. जैरमादास दौलतराम, बिहारचे राज्यपाल (१८९१)
९. जॉन मिल्स, घानाचे राष्ट्राध्यक्ष (१९४४)
१०. डॉ. रा. चिं. ढेरे, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (१९३०)
११. चेतन चौहान, भारतीय क्रिकेटपटू,राजकीय नेते (१९४७)
१२. अदित्य श्रीवास्तव, भारतीय चित्रपट टेलिव्हिजन अभिनेते (१९६८)
१३. रॉबीन विल्यम्स, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९५१)
१४. स्टीफन लॉफवेन, स्वीडिश पंतप्रधान (१९५७)


मृत्यू

१. सज्जाद हुसेन, भारतीय संगीतकार (१९९५)
२. गोपाळराव बळवंतराव कांबळे, भारतीय चित्रकार (२००२)
३. रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश लेखक कवी (१७९६)
४. अल्बर्ट जे. लुठुली, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)
५. राजा राजवाडे, भारतीय साहित्यिक (१९९७)
६. गंगुबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (२००९)
७. डॉ. र. वि. हेरवाडकर ,भारतीय मराठी बखर अभ्यासक (१९९४)
८. एॅलन शेपर्ड, अमेरीकन अंतराळवीर (१९९८)
९. बी. पि. कोईराला, नेपाळचे पंतप्रधान (१९८२)
१०. शिवाजी गणेशन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (२००१)

घटना

१. अलेक्झांडर केरेंस्की हे रशियाचे पंतप्रधान झाले. (१९१७)
२. इंडोनेशिया मध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. (१९४७)
३. स्पेनमध्ये दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७२)
४. संजिवा रेड्डी हे बिनविरोध भारताचे ६वे राष्ट्रपती बनले. (१९७७)
५. सिरीमाओ बंदरणाके या श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान त्या झाल्या. (१९६०)
६. आयर्लंडमध्ये ब्रिटीश राजदुताची हत्या झाली. (१९७६)
७. भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला. (२०१८)
८. अंटार्क्टिका खंडावर व्होस्टोक येथे उणे ८९.२ सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. (१९८३)

महत्व

१. Invite An Alien To Live With You Day
२. Lowest Recorded Temperature Day
३. Take A Monkey To Lunch Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...