मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ जुलै || Dinvishesh 2 July ||




जन्म

१. रझा मुराद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४६)
२. विनायक आदिनाथ बुवा, भारतीय लेखक (१९२६)
३. पवन मल्होत्रा, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५८)
४. जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक (१९२३)
५. आशालता वाबगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४१)
६. गणेश गोविंद बोडस,भारतीय गायक (१८८०)
७. चार्ल्स तुप्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१८२१)
८. विल्यम हेनरी ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
९. अलेक डग्लास-होम, ब्रिटीश पंतप्रधान (१९०३)
१०. विस्लावा अझुंबोरका, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९२३)
११. कार्लोस मेनेम, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१२. शेरली सेटीया, भारतीय गायिका (१९९५)

मृत्यू

१. सिराज उद्दौला, मुघल साम्राज्याचे नवाब (१७५७)
२. नास्त्रेदमस, फ्रेंच भविषवेत्ता (१५६६)
३. स्पेन्सर कॉम्प्टन, ब्रिटीश पंतप्रधान (१७४३)
४. दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेटपटू (२००७)
५. डगलस एंगलबर्ट, कॉम्प्युटर माऊसचे संशोधक (२०१३)
६. एम. जी. राधाकृष्णन, भारतीय संगीत दिग्दर्शक (२०१०)
७. अर्नेस्ट हेमिंग्वे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९६१)
८. महेश कौल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७२)
९. इटामार फ्रँको, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
१०. एली विझेल, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१६)
११. मिशेल रोकर्ड, फ्रान्सचे पंतप्रधान (२०१६)
१२. चतुरानन मिश्रा, भारतीय राजकीय नेते (२०११)
१३. युसुफ मेहर अली, भारतीय राजकीय नेते (१९५०)

घटना

१. तामिळनाडू येथील कल्पक्कम येथे अणुऊर्जा केंद्र सुरू करण्यात आले. (१९८३)
२. सिमला करारावर भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षऱ्या केल्या. (१९७२)
३. जनरल लझारो कॉर्डन्स हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३४)
४. सुभाष चंद्र बोस यांना कलकत्ता येथे अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. (१९४०)
५. बेंजामिन लेन यांनी गॅस मास्कचे पेटंट केले. (१८५०)
६. अँड्र्यू ग्रोमीको हे सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष झाले. (१९८५)
७. थॉमस सावेरी यांनी स्टीम इंजिनचे पेटंट केले. (१६९८)

महत्व

१. World UFO Day
२. World Sports Journalists Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...