मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ जुलै || Dinvishesh 13 July ||




जन्म

१. उत्पल चॅटर्जी, भारतीय क्रिकेटपटू (१९६४)
२. वॉले सोयींका, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३४)
३. हॅरिसन फोर्ड, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९४२)
४. वैरमुथू, भारतीय लेखक ,कवी (१९५३)
५. प्रकाश मेहरा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९३९)
६. केसरबाई केरकर, भारतीय गायिका (१८९२)
७. मा- यिंग- जेऊ, रिपब्लिक ऑफ चायनाचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)
८. अशले स्कॉट, अमेरीकन अभिनेत्री (१९७७)
९. पट्रिक स्टीवर्ट, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९४०)
१०. ईसाक बाबेल, रशियन लेखक (१८९४)

मृत्यू

१. निळू फुले, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (२००९)
२. बाजीप्रभू देशपांडे, हिंदवी स्वराज्य सेनापती (१६६०)
३. जेम्स ब्रॅडली, इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ (१७६२)
४. पंडीत के. जी. गिंडे, भारतीय गायक ,संगितकार (१९९४)
५. धुंडिराज शास्त्री विनोद, भारतीय तत्वज्ञ, विचारवंत (१९६९)
६. पट्रिक ब्लॅकेट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७४)
७. सेरेतसे खामा, बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष (१९८०)
८. इंदिरा संत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयत्री लेखिका (२०००)
९. मुहम्मद शहीदुल्लाह, भारतीय लेखक , विचारवंत (१९६९)
१०. लिऊ शियाबो, चायनीज लेखक (२०१७)

घटना

१. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांना सहभाग घेण्यास परवानगी देण्यात आली. (१९०८)
२. श्रीलंकेत वांशिक दंगलीत ३०००हून अधिक तमिळ लोकांची हत्या करण्यात आली तर ४००००० हून अधिक लोकांनी पलायन केले. (१९८३)
३. हेक्टर दे कॅम्पोरा हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
४. भारताची पहिली अंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मॅच इंग्लंड विरुद्ध खेळली गेली. (१९७४)
५. न्यूयॉर्क शहरात सक्तीच्या सैन्य भरती विरोधात हिंसक प्रदर्शन करण्यात आले. (१८६३)
६. मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२०११)
७. थरेसा मे या इंग्लंडच्या पंतप्रधान झाल्या. (२०१६)
८. पावनखिंडीत हिंदवी स्वराज्याचे मावळे आणि आदिलशाही सैन्यात लढाई झाली. (१६६०)

महत्व

१. International Rock Day
२. Barbershop Music Appreciation Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...