मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ जून || Dinvishesh 26 June ||




जन्म

१. राजर्षी शाहू महाराज (१८७४)
२. जिवाजीराव सिंधिया, ग्वालियरचे महाराजा (१९१६)
३. अर्जुन कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
४. चार्ल्स मेसिर, फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ (१७३०)
५. शिवम दुबे,भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
६. विल्यम थॉमसन, भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ (१८२४)
७. रॉबर्ट बोर्डेन, कॅनडाचे पंतप्रधान (१८५४)
८. मनप्रीत सिंघ, भारतीय हॉकी खेळाडू (१९९२)
९. अरियाना ग्रँनडे, अमेरिकन गायिका (१९९३)
१०. नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व, सुप्रसिद्ध मराठी संगीतनाट्य गायक नट (१८८८)
११. गौहर जान , भारतीय गायिका (१८७३)

मृत्यू

१. यश जोहर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२००४)
२. आप्पा पेंडसे, भारतीय पत्रकार (१९८०)
३. कार्ल लॅन्ड्स्टायनर, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४३)
४. वसंत पुरुषोत्तम काळे, भारतीय मराठी साहित्य लेखक कवी (२००१)
५. एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू (२००५)
६. रिचर्ड बेनेट्ट, कॅनडाचे पंतप्रधान (१९४७)
७. आल्फ्रेड डॉब्लिन, जर्मन लेखक (१९५७)
८. जोसेफ माईकेलं माँटगोल्फर, हॉट बलुनचे संशोधक (१८१०)
९. अल्गिर्दास ब्रासौस्कास, लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
१०. जहणारा इमाम, बांगलादेशच्या लेखिका (१९९४)

घटना

१. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा असलेले चलनी नाणे प्रकाशित झाले. (१९९९)
२. पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. (१९६८)
३. कार्ल बेंझ यांना पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनाचे पेटंट देण्यात आले. (१८९४)
४. चार्ल्स नीबोल्ड यांनी लोखंडी नांगराचे पेटंट केले. (१७९७)
५. न्यूयॉर्क डेली न्यूज या पेपरचे प्रकाशन करण्यास सुरुवात झाली. (१९१९)
६. सोमालिया या देशास ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
७. इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये आणीबाणीची घोषणा केल्याचे रेडिओवरून सांगितले. (१९७५)
८. भारताने बांगलादेशला तीन बिघा कॉरिडॉर भाडेतत्त्वावर वापरण्यास दिले. (१९९२)
९. उत्तराखंड येथे बचावकार्य करण्यास गेलेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन २०लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. International Day in Support Of Victims Of Torture
२. International Day Against Drug Abuse & Illicit Trafficking
३. Tropical Cocktail Day
४. Beautician's Day
५. International Forgiveness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...