मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ जून || Dinvishesh 16 June ||




जन्म

१. मिथुन चक्रवर्ती, भारतीय चित्रपट अभिनेते राजकीय नेते (१९५०)
२. ऍडम स्मिथ, स्कॉटिश अर्थतज्ञ (१७२३)
३. आर्या आंबेकर, मराठी चित्रपट अभिनेत्री, गायिका (१९९४)
४. व्रजेश हिर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
५. हेमंत कुमार मुखोपाध्याय, भारतीय गायक , संगितकार (१९२०)
६. ऑर्थर मेईघेन, कॅनडाचे पंतप्रधान (१८७४)
७. इम्तियाज अली, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
८. मोहम्मद मोसाद्देघ, इराणचे पंतप्रधान (१८८२)
९. हेमंता मुखर्जी, भारतीय गायक (१९२०)
१०. मिलिंद गवळी, मराठी चित्रपट अभिनेते (१९६६)
११. स्टॅन लाॅरेल, लॉरेल आणि हार्डी मधील विनोदी अभिनेते (१८९०)
१२. अखलाक मुहम्मद खान, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू लेखक कवी (१९३६)
१३. विल्यम फॉर्सिथ शर्पे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३४)
१४. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष (१९६८)

मृत्यू

१. चित्तरंजन दास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते (१९२५)
२. मर्सेल जूनोड, स्विस भौतिकशास्त्रज्ञ (१९६१)
३. माई मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी (१९९५)
४. पि. जी. विस्वंभरण, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१०)
५. थॉमस काऊलींग, ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ (१९९०)
६. सुकुमारण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९७)
७. आचार्य प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९४४)
८. थानोम कित्तिकाचोर्न, थायलंडचे पंतप्रधान (२००४)
९. हरीश चंद्रा मुखर्जी, भारतीय पत्रकार (१८६१)
१०. इमरे नॅगी, हंगेरीचे पंतप्रधान (१९५८)

घटना

१. सहा वर्षाच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सुटका झाली. (१९१४)
२. फोर्ड या कंपनीची स्थापना हेन्री फोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. (१९०३)
३. जॉन अब्बॉट हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१८९१)
४. भूतानने तंबाखू आणि तत्सम पदार्थांनवर पुर्णतः बंदी घातली. (२०१०)
५. सून यात सेन यांनी चीन मिलिटरी अकॅडमीची स्थापना केली. (१९२३)
६. नगो दिंह दिएम् हे व्हिएतनामचे पंतप्रधान झाले. (१९५४)
७. थाबो म्बेकी हे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९९)
८. गल्वान घाटात झालेल्या भारत आणि चीन सैन्यामधील हिंसक संघर्षात भारताचे २० जवान तर चीनचे ४०हून अधिक जवान मृत्यूमुखी पडले. (२०२०)
९. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. (१९९९)

घटना

१. World Sea Turtle Day
२. International Day Of Family Remittances
३. International Day Of The African Child
४. Fresh Veggies Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...