मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ मे || Dinvishesh 28 May ||




जन्म

१. विनायक दामोदर सावरकर, प्रखर राष्ट्रभक्त, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८३)
२. एन. टी. रामाराव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२३)
३. के. सच्चिदानंद, भारतीय लेखक कवी (१९४६)
४. शंतनुराव किर्लोस्कर, भारतीय उद्योगपती (१९०३)
५. बुलेंत सिवित, तुर्कीचे पंतप्रधान (१९२५)
६. बापूराव पलुस्कर, भारतीय शास्त्रीय गायक (१९२१)
७. वरदराजा वी. रमण, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३२)
८. नानासाहेब पुरोहित, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०७)
९. देवेंद्र सत्यार्थी, भारतीय लेखक ,कवी (१९०८)
१०. ज्येष्ठथराज जोशी, पद्मभूषण पुरस्कार विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४९)

मृत्यू

१. बी. विठ्ठलाचारी , भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९९)
२. जॉन रसेल, ब्रिटिश पंतप्रधान (१८७८)
३. गणपतराव नलावडे, हिंदुसभेचे नेते (१९९४)
४. रॉल्फ नेवनलिंना, गणितज्ञ (१९८०)
५. मेहबूब खान, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९६४)
६. ईलिया प्रिगोगिने, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००३)
७. मार्तंडा भैरवा तोंडाइमन, पुदुकोत्ताईचे महाराजा (१९२८)
८. जेन्स ख्रिस्टियन स्काऊ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१८)
९. जॉर्जिओ मंग्नेल्ली, लेखक (१९९०)
१०. होरी तत्सुओं, जपानी लेखक  (१९५३)

घटना

१. बेल्जियमने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पुढे शरणागती पत्करली. (१९४०)
२. नेव्हील चंबरलेन हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. (१९३७)
३. पॅलेस्टाईन लीबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. (१९६४)
४. ग्रीस मधील महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला. (१९५२)
५. अमनेस्टी इंटरनॅशनल या जागतीक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला त्यांच्या कामाबद्दल नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. (१९६१)
६. पश्चिम बंगाल येथे झालेल्या तीव्र चक्रीवादळात २०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६३)
७. लिओनार्डो दा विंची यांचे "The last Supper" हे चित्र इटलीतील मिलान या शहरात प्रदर्शनात ठेवण्यात आले. (१९९९)
८. अब्देल फत्ताह एल सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)

महत्व

१. International Burger Day
२. International Amnesty Day
३. Whooping Crane Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...