मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ मे || Dinvishesh 25 May ||




जन्म

१. रास बिहारी बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८६)
२. करण जोहर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७२)
३. जॉन स्टुअर्ट, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान (१७१३)
४. एम. जी. श्रीकुमार , भारतीय गायक (१९५७)
५. पिर्टर झीमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७७)
६. कुणाल खेमु, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८३)
७. त्र्यंबक शंकर शेजवलकर, भारतीय इतिहासकार (१८९५)
८. जॅक स्टिनबर्जर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
९. जॉन इलियट, ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ (१८३१)
१०. धिरुबेन पटेल, गुजराती लेखिका, अनुवादक (१९२६)
११. रूसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू (१९३६)

मृत्यू

१. सुनील दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (२००५)
२. लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर, भारतीय चित्रपट संगीतकार (१९९८)
३. येवगेनिया गिंसबर्ग, रशियन लेखक (१९७७)
४. इस्माईल मर्चंट, भारतीय चित्रपट निर्माता (२००५)
५. गजानन यशवंत ताम्हणे,  कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक (१९५४)
६. रेन्झो दे फेलिस, इटालियन इतिहासकार (१९९६)
७. मुहम्मद फाढेल, इराकचे पंतप्रधान (१९९७)
८. कृष्ण चंद्र गजपती, ओरीसाचे पंतप्रधान (१९७४)
९. वोजचेच जरुझेसलकी,  पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (२०१४)
१०. बलबिर सिंघ दोसांझ, भारतीय हॉकी खेळाडू (२०२०)

घटना

१.जर्मन सैन्याने फ्रान्स मधील बाऊलोग्ने हे शहर जिंकले. (१९४०)
२. वेस्ट बंगालमध्ये झालेल्या चक्रीवादळात ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४१)
३. पेरोनिस्ट हेक्टर कँपोरा हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
४. बांगलादेश मध्ये झालेल्या चक्रीवादळाने प्रचंड हानी केली. या वादळात ११०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८५)
५. शामिया नामक मालवाहतूक जहाज बांग्लादेशच्या मेघना खाडीत बुडाले या दुर्घटनेत ६०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८६)
६. विर्गिलिओ बार्को हे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८६)
७. ऑस्कर लुइगी स्कॅल्फरो हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९२)
८. Space ड्रॅगन हे पहिले खाजगी कंपनीचे अंतराळयान international Space Station ला जोडले गेले. (२०१२)

महत्व

१. Towel Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...